शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पीक विम्याची भरपाई होणार की यंदाही शेतकऱ्यांना १०० रुपयांची भरपाई देऊन थट्टा केली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:19 IST

Yavatmal : कृषी विभाग म्हणते, प्रक्रिया अंतिम टप्प्यात; पाच लाखांवर सूचना प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : निसर्गाने अवकृपा दाखविल्यानंतर पीक नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी शेतकरी विमा काढतात. मात्र एक रुपयात पीक विमा योजना राबविणाऱ्या सरकारने गतवर्षी शेतकऱ्यांना ५० ते १०० रुपयांची भरपाई देऊन थट्टा केली होती. त्यामुळे यंदाही घोळ घातला जाणार की, शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ दिला जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात तब्बल ९ लाख हेक्टरवर कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची लागवड करण्यात आली.

ई-केवाएसीचा खोडा सूचना केलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ दिला जाईल. केवळ आधार सिडिंग आणि ई-केवायसी नसलेल्या शेतकऱ्याची मदत प्रलंबित राहील, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

एकच सूचना ग्राह्य धरणार काही शेतकऱ्यांनी दोन ते तीन सूचना केल्या आहे. कृषी विभागाकडून पंचनामे रॅण्डम पद्धतीने लावण्याचे काम सुरू आहे. नुकसान भरपाई देण्यासाठी एकच सूचना ग्राह्य धरली जाणार आहे.

साडेसात लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली आहे. या योजनेतून साडेसात लाखांवर शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. खरीप हंगामात अतिवृष्टी व पूरपरिस्थतीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर पाच लाख ३५ हजार शेतकऱ्यांनी नुकसानीची सूचना दिली. शेतशिवारात जाऊन पंचनामे करण्यात आले. कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. शासनाने प्रीमियम दिल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून पीक विम्याचा लाभ दिला जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. गतवर्षी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. त्यामुळे यंदा योग्य भरपाई दिली जाते का, याकडे लक्ष आहे. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाYavatmalयवतमाळfarmingशेतीFarmerशेतकरी