शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

जिल्हा परिषदेला कोर्टात खेचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 21:59 IST

जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांनी आता एक जादा वेतनवाढ मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेला कोर्टात खेचण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी ३०० शिक्षकांनी एकत्र येऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अल्टीमेटमही दिला आहे.

ठळक मुद्देवेतन वाढीसाठी पुरस्कारप्राप्त गुरुजी आक्रमक : ३०० शिक्षकांचे संघटन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांनी आता एक जादा वेतनवाढ मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेला कोर्टात खेचण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी ३०० शिक्षकांनी एकत्र येऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अल्टीमेटमही दिला आहे.राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना एक जादा वेतनवाढ देण्याची तरतूद आहे. मात्र, जिल्हा परिषदेने २००६ पासून ही वेतनवाढ रद्द केली आहे. या केवळ शाल, श्रीफळ असेच आता जिल्हा पुरस्काराचे स्वरुप आहे. दरम्यान २०१४ मध्ये राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारांतील वेतनवाढीची तरतूदही शासनाने रद्द करून एकमुस्त एक लाख रुपये देण्याची तरतूद केली.दरम्यान, २०१७ मध्ये जिल्ह्यातील ७६ शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निकाल दिल्याने जिल्हा परिषदेने या ७६ शिक्षकांना वेतनवाढ लागू केली आहे. हाच न्याय इतरही ३०० पुरस्कारप्राप्त शिक्षकांना हवा आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय न घेतल्यास जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी शिक्षकांनी चालविली आहे.‘मार्गदर्शन’ प्रलंबित, पाठोपाठ ‘रद्द’चा आदेशन्यायालयात जिंकलेल्या ७६ शिक्षकांना वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्याचवेळी इतर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणे वेतनवाढ सुरू करता येईल का, याबाबत शासनाला मार्गदर्शन मागविण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र, शासनाचे मार्गदर्शन येण्यापूर्वीच ग्रामविकास विभागाने ४ सप्टेंबर रोजी वेतनवाढ देऊ नये, असे आदेश काढले आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद