शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

विनंती बदल्या होणार की नाहीत ? पोलीस निरीक्षक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 16:46 IST

महासंचालक कार्यालयाने यंदा सरसकट विनंती बदल्या न करण्याची भूमिका घेतल्याने राज्यभरातील सोईच्या पोस्टींगसाठी राजकीय मार्गाने फिल्डींग लावलेल्या शेकडो पोलीस निरीक्षकांमध्ये अस्वस्थता पहायला मिळत आहे.

ठळक मुद्दे ‘डीजीं’ची ताठर भूमिकाअनेकांची राजकीय फिल्डींग व्यर्थ जाण्याची चिन्हे

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सरकार विरुद्ध पोलीस महासंचालक कार्यालय असा सामना छुप्या पद्धतीने पहायला मिळाला. त्यातच आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएसच्या बदल्या झाल्या. त्यात ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती राहिली. काहींना पुन्हा साईड ब्रँच तर काहींना सतत यावेळीही की-पोस्ट देण्यात आली. अद्यापही १६ आयपीएस अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात अपर महासंचालक, महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आता सर्वांच्या नजरा राज्य सेवेतील बदल्यांवर लागल्या आहेत.

शिफारस पत्रे, ‘कन्सेन्ट’ मिळविलेफौजदार ते निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार महासंचालकांकडे आहेत. कित्येक पोलीस निरीक्षकांनी महाविकास आघाडी सरकारमधील राजमार्ग वापरुन सोईच्या ठिकाणी नियुक्ती मिळविण्यासाठी खूप आधीपासून मोर्चेबांधणी चालविली आहे. तशी शिफारस पत्रे आणि जिल्हास्तरावर संबंधितांचे ‘कन्सेन्ट’ही मिळविले आहे. त्यातील बहुतांश अधिकारी विनंती बदली मागणारे आहेत. महासंचालक कार्यालयातील संबंधित कनिष्ठ अधिकारी मात्र विनंती बदल्या होणारच, असा दावा करीत आहे.

परिक्षेत्र, जिल्हा बदल्याही लांबल्याबदल्यांना उशीर होत असल्याने आधीच त्यांच्या चेहºयावर अस्वस्थता पहायला मिळत आहे. बदल्यांची यादी रखडल्याने परिक्षेत्र आणि जिल्हास्तरावरील बदल्याही लांबणीवर पडल्या आहेत. त्यातच आता महासंचालक कार्यालयाने ‘यंदा सरसकट विनंती बदल्या नाहीच’ अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात असल्याने फिल्डींग लावलेल्या पोलीस निरीक्षकांच्या सोईच्या बदल्या होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

प्रशासकीय बदल्या तिनशेच्या घरातपोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांची यादी तिनशेची असल्याचे सांगितले जाते. विनंती बदल्या न झाल्यास राजकीय फिल्डींगद्वारे खर्ची केलेला वेळ व पैसा व्यर्थ जाणार आहे. अशीच काहीशी स्थिती सहायक निरीक्षक व फौजदारांचीसुद्धा आहेत.

उपअधीक्षकांना विनंती बदलीची हमीकित्येक पोलीस उपअधीक्षक, सहायक आयुक्तांनीसुद्धा महत्वाचे विभाग काबीज करण्यासाठी विनंतीच्या मार्गाने मोर्चेबांधणी चालविली. परंतु त्यांच्या विनंती बदल्यांचे अधिकार सरकारकडे असल्याने या विनंती बदल्या होण्याची शक्यता आहे. तरीही त्यांच्यात अस्वस्थता पहायला मिळते.

‘ते’ प्रशासकीय बदलीस पात्र नाहीतविशेष असे, विनंती बदलीसाठी अर्ज केलेले बहुतांश पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपअधीक्षक हे प्रशासकीय बदलीस पात्र ठरत नाहीत. त्यामुळे विनंती बदल्या न झाल्यास त्यांना आहे त्याच ठिकाणी राहावे लागणार आहे.

कमाईचे पोलीस ठाणे, क्राईम ब्रँचवर नजरबहुतांश जिल्ह्यात घटक प्रमुख बदलले आहेत. त्यामुळे तेथील पोलीस ठाणे, शाखांमध्ये बदल निश्चित मानले जातात. ही बाब डोळ्यापुढे ठेऊन अनेकांनी वरकमाईचे पोलीस ठाणे, क्राईम ब्रँच मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. जिल्हास्तरावरील ‘सरकार’ने निश्चित केलेल्या व्यक्तींच्या ‘भेटी-गाठी’ घेऊन सर्व काही ठरले आहे. आता केवळ बदली आदेशाची तेवढी प्रतीक्षा आहे. त्यातही एकाच व्यक्तीला अनेक अधिकारी भेटत असल्याने त्यांच्यात कमाईच्या जागांसाठी रस्सीखेचही पहायला मिळते.

टॅग्स :Policeपोलिस