शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

भारत जोडो यात्रा काॅंग्रेसला गतवैभव देणार का?

By विशाल सोनटक्के | Updated: November 23, 2022 16:57 IST

कार्यकर्ते काँग्रेससोबतच; नेत्यांना हेवेदावे आणि गटबाजी सोडावी लागणार

यवतमाळ : काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरल्याचे अगदी विरोधकही मान्य करीत आहेत. देशातील राजकीय वातावरण बदलू शकते, हा विश्वास१४ दिवसात राज्यातील पाच जिल्ह्यातून ३८२ किमीचा प्रवास केलेल्या या यात्रेने महाराष्ट्रातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र या यात्रेमुळे जिल्ह्यात काॅंग्रेसला खरेच गतवैभव मिळू शकते का? हा खरा प्रश्न आहे. जिल्ह्यातील नेत्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत तुटलेली नाळ पुन्हा जुळवावी लागणार आहे. या बरोबरच गटातटात विभागलेल्या पक्षाला एकसंघपणे उभे राहावे लागणार आहे. हेच आता जिल्हा काॅंग्रेसपुढे खरे आव्हान आहे.

एकेकाळी यवतमाळ जिल्हा काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता. काॅंग्रेसमुळेच जिल्ह्याला दोन मुख्यमंत्री मिळाले. एवढेच नव्हे तर काॅंग्रेसने नेहमीच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवत त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पदेही दिली. मात्र या नेत्यांनी जिल्ह्यातील काॅंग्रेसला काय दिले, असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यातून विचारला जात आहे.

१९९५ पर्यंत जिल्ह्यावर काॅंग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले. १९९५ च्या निवडणुकीत भाजपने काॅंग्रेसला पहिला हादरा दिला. राजाभाऊ ठाकरे यांच्या रूपाने जिल्ह्यात भाजपला पहिला आमदार मिळाला. त्यानंतर माणिकराव ठाकरे यांचाही २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय राठोड यांनी पराभव केला. याच वेळी दुसरे नेते शिवाजीराव मोघे यांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतर मात्र काॅंग्रेसची जिल्ह्यातील संघटनात्मक पकड सैल होत गेली. दुसरीकडे ही जागा भरून काढत भाजप-शिवसेनेने जिल्ह्यात आपले मजबूत बस्तान बांधले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तर जिल्ह्यात काॅंग्रेसचे खातेही उघडले नाही. सातपैकी पाच जागा जिंकत भाजप अव्वल ठरली. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. या दारुण पराभवानंतरही जिल्ह्यात कार्यकर्ते मात्र काॅंग्रेस सोबत असल्याचे वारंवार दिसून आले.

जानेवारी महिन्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत काॅंग्रेसने सर्वाधिक ३९ जागा मिळविल्या. तर त्यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही सर्वाधिक जागा काॅंग्रेसलाच मिळाल्या. मात्र त्यानंतरही गटातटात विभागलेल्या या पक्षाला आगामी काळात कितपत यश मिळेल, याबाबत खुद्द काॅंग्रेस कार्यकर्तेच साशंकता व्यक्त करताना दिसतात. काॅंग्रेसने जिल्ह्यातील नेत्यांना खूप काही दिले. मात्र, या नेत्यांनी काॅंग्रेसला काय दिले, जिल्ह्यातील काॅंग्रेस बळकट करण्यासाठी काय केले, ही खदखद दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे प्रकर्षाने दिसून येते.

गटबाजीच्या राजकारणातून बाहेर पडण्याची गरज

भाजप सरकारच्या कारभारावर आता हळहूळू का होईना टीकेचा सूर उमटू लागला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने पुरोगामी विचारांच्या कार्यकर्ते-नेत्यांना नवे बळ दिले आहे. ‘डरो मत’ असे सांगत लोकांच्या मनातील भीतीला या यात्रेने मोकळी वाट करून दिली आहे. या यात्रेचा आता थेट जमिनीवर लाभ मिळवायचा असेल तर काॅंग्रेस नेत्यांना इमानदारीने सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊन त्या विरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. सरकारच्या कारभाराविरोधात लोक बोलू लागले आहेत. उद्या कदाचित मतपेटीतून उत्तरही देतील. पण त्यावेळी पर्याय म्हणून काॅंग्रेस राहावी, यासाठी तरी जिल्ह्यातील काॅंग्रेस नेत्यांना गटबाजीच्या राजकारणातून बाहेर पडावे लागणार आहे.

यात्रेतून निर्माण झालेले चैतन्य कायम ठेवण्याचे आव्हान

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे राज्यातील काॅंग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. या यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांतील मरगळ झटकली गेली आहे. आता या यात्रेतून निर्माण झालेले चैतन्य कायम ठेवण्याचे आव्हान जिल्ह्यातील काॅंग्रेस नेत्यांसमोर उभे आहे. भारत जोडो यात्रेत गैरकाॅंग्रेसी नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होते. ही बाब लक्षवेधी असून नागरिक राहुल गांधी यांनी दाखविलेल्या समता-एकात्मता आणि बंधुत्वाच्या मार्गाने जाऊ इच्छितात हे दर्शविणारे आहे. अशा स्थितीत येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा टेम्पो टिकवून ठेवण्याचे खरे आव्हान जिल्ह्यातील काॅंग्रेस नेत्यांपुढे आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात, यावरच जिल्ह्यातील काॅंग्रेसचेही भवितव्य अवलंबून असेल.

टॅग्स :PoliticsराजकारणBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी