शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
3
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
4
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
5
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
6
दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
7
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
8
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
9
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
10
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
11
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
12
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
13
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
14
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
15
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
16
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
17
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
18
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
19
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
20
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:03 IST

वणी उपविभागातील जंगलामध्ये असलेले पाणवठे आटल्याने वन्यजीवांची आता पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. हे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत असून शिकारीची शक्यताही बळावली आहे, तर काही पाणवठ्यांमधील पाणी दूषित झाले असून ते कित्येक महिन्यांपासून बदलविण्यातच येत नाही.

ठळक मुद्देपाणवठे कोरडे : शिकारीची शक्यता, वनविभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी उपविभागातील जंगलामध्ये असलेले पाणवठे आटल्याने वन्यजीवांची आता पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. हे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत असून शिकारीची शक्यताही बळावली आहे, तर काही पाणवठ्यांमधील पाणी दूषित झाले असून ते कित्येक महिन्यांपासून बदलविण्यातच येत नाही. मात्र या पाणवठ्याच्या देखभालीकडे वनविभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून शासनातर्फे लाखो रूपये खर्चून जंगलामध्ये ठिकठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. मात्र या पाणवठ्यांत पाणी सोडण्यात येत नसल्यामुळे ते कोरडे ठक्क पडले आहे. परिणामी वन्यप्राण्यांना जंगलात पाणी मिळणे दुरापास्त झाले असून हे प्राणी आता पाण्याच्या शोधात गावकुसाकडे धाव घेताना दिसून येत आहे. उपविभागातील जंगलामध्ये रोही, रानडुक्कर, ससा, हरीण, वाघ, अस्वल, सांबर, मोर, नीलगाय आदी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे.हे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात आता गावाकडे असलेल्या नदी-नाल्यांकडे येत असून याचाच फायदा घेत काही शिकारी या वन्यप्राण्यांची शिकार करीत आहे. जंगलाशेजारी असलेल्या शेतांजवळ किंवा पाणवठ्यांपासून काही अंतरावर हे शिकारी वन्यप्राणी अडकविण्यासाठी जाळे टाकून ठेवतात. यात वन्यप्राणी अडकल्यावर त्यांची शिकार केली जाते. त्यानंतर हे मांस गावाशेजारी आणून त्याची छुप्या पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे. असे प्रकार अनेक नागरिकांना दिसून येतात. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही शिकार का दिसत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वन्यप्राण्यांची शिकार रोखण्याकरिता वनविभागाने पाणवठ्यात कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. काही पाणवठ्याची तर अतिशय दुरवस्था झाली असून या पाणवठ्यात पाणीसुद्धा टिकत नाही. उलट ते पाणी वाया जात असून त्यांच्या दुरूस्तीचीही गरज निर्माण झाली आहे. वनविभागाने या प्रकाराकडे लक्ष देऊन जंगलातील पाणवठ्यात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :forestजंगल