शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 22:03 IST

वणी उपविभागातील जंगलामध्ये असलेले पाणवठे आटल्याने वन्यजीवांची आता पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. हे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत असून शिकारीची शक्यताही बळावली आहे, तर काही पाणवठ्यांमधील पाणी दूषित झाले असून ते कित्येक महिन्यांपासून बदलविण्यातच येत नाही.

ठळक मुद्देपाणवठे कोरडे : शिकारीची शक्यता, वनविभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी उपविभागातील जंगलामध्ये असलेले पाणवठे आटल्याने वन्यजीवांची आता पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. हे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत असून शिकारीची शक्यताही बळावली आहे, तर काही पाणवठ्यांमधील पाणी दूषित झाले असून ते कित्येक महिन्यांपासून बदलविण्यातच येत नाही. मात्र या पाणवठ्याच्या देखभालीकडे वनविभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून शासनातर्फे लाखो रूपये खर्चून जंगलामध्ये ठिकठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. मात्र या पाणवठ्यांत पाणी सोडण्यात येत नसल्यामुळे ते कोरडे ठक्क पडले आहे. परिणामी वन्यप्राण्यांना जंगलात पाणी मिळणे दुरापास्त झाले असून हे प्राणी आता पाण्याच्या शोधात गावकुसाकडे धाव घेताना दिसून येत आहे. उपविभागातील जंगलामध्ये रोही, रानडुक्कर, ससा, हरीण, वाघ, अस्वल, सांबर, मोर, नीलगाय आदी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे.हे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात आता गावाकडे असलेल्या नदी-नाल्यांकडे येत असून याचाच फायदा घेत काही शिकारी या वन्यप्राण्यांची शिकार करीत आहे. जंगलाशेजारी असलेल्या शेतांजवळ किंवा पाणवठ्यांपासून काही अंतरावर हे शिकारी वन्यप्राणी अडकविण्यासाठी जाळे टाकून ठेवतात. यात वन्यप्राणी अडकल्यावर त्यांची शिकार केली जाते. त्यानंतर हे मांस गावाशेजारी आणून त्याची छुप्या पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे. असे प्रकार अनेक नागरिकांना दिसून येतात. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही शिकार का दिसत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वन्यप्राण्यांची शिकार रोखण्याकरिता वनविभागाने पाणवठ्यात कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. काही पाणवठ्याची तर अतिशय दुरवस्था झाली असून या पाणवठ्यात पाणीसुद्धा टिकत नाही. उलट ते पाणी वाया जात असून त्यांच्या दुरूस्तीचीही गरज निर्माण झाली आहे. वनविभागाने या प्रकाराकडे लक्ष देऊन जंगलातील पाणवठ्यात पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :forestजंगल