शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांचा पाणीप्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:35 IST

महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर केळापूर व घाटंजी तालुक्यात असलेले टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन नैसर्गिक जलस्रोत आहेत. तसेच वन्यजीव विभागाने जागोजागी सौरउर्जेवर चालणारे पाणवठे तयार केले आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे नैैसर्गिक स्रोेतांची जलपातळी वेगाने खालावत चालली आहे.

ठळक मुद्देजलपातळीत घट : केवळ तीन नैसर्गिक स्रोत

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर केळापूर व घाटंजी तालुक्यात असलेले टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन नैसर्गिक जलस्रोत आहेत. तसेच वन्यजीव विभागाने जागोजागी सौरउर्जेवर चालणारे पाणवठे तयार केले आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे नैैसर्गिक स्रोेतांची जलपातळी वेगाने खालावत चालली आहे. परिणामी पाण्याच्या शोधात वन्यजीव अभयारण्याबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नैसर्गिक स्रोतांमध्ये गोसावी नाला, कुरची कुडी नाला व नैसर्गिक तलाव, हे तीन मुख्य स्रोत आहेत. यांपैकी गोसावी नाल्यात ठिकठिकाणी बंधारे बांधल्याने वन्यजीवांसाठी पाण्याची सोय होत आहे.मात्र कुरची नाला व नैसर्गिक तलावातील जलपातळी प्रचंड खालावली आहे. या तलावावर दररोज वन्यजीव आपली तहान भागविण्यासाठी येतात. या तलावात सोलार पंपच्या साह्याने पाणी सोडल्यास ते पाणी पावसाळ्यापर्यंत टिकून वन्यजीवांना दिलासा मिळणार आहे. अभयारण्य प्रशासनाने यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे. नैसर्गिक तलाव हा वन्यजीवांचा मुख्य जलस्रोत आहे. या तलावाच्या जवळच एक जुनी विहीर असल्याचे आणि विहिरीत भरपूर पाणी असल्याचे टिपेश्वर गावच्या लोकांचे म्हणणे आहे. आता या गावाचे पुनर्वसन झाले आहे. या विहिरीवर एक मोटार बसवून ती सौरऊर्जेच्या साह्याने चालू केल्यास हजारो लीटर पाणी या तलावात सोडता येणे शक्य आहे.तर वन्यजीव सैरावैरा होऊन अभयारण्याबाहेर पडतीलआता उन्हाचा पारा ४३ अंशापार गेला आहे. त्यामुळे झपाट्याने तलावातील पाणी आटत आहे. आतातरी तातडीने त्याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सध्या राज्यभरात पाण्याअभावी वन्यजीव मानवी वस्त्यांकडे जात आहेत. काही ठिकाणी वाघाने मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरात अशीच एक वाघीण तिच्या पिल्लासह आहे. तिने केलेल्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत आहेत. टिपेश्वर परिसरातील बोथ बहात्तर गाव परिसरात मागील आठवड्या वाघाने दर्शन दिले.तलावातील जलपातळी न टिकविल्यास टिपेश्वरमधील वन्यजीव सैरावैरा होऊन अभयारण्याच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Tigerवाघ