शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांचा पाणीप्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:35 IST

महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर केळापूर व घाटंजी तालुक्यात असलेले टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन नैसर्गिक जलस्रोत आहेत. तसेच वन्यजीव विभागाने जागोजागी सौरउर्जेवर चालणारे पाणवठे तयार केले आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे नैैसर्गिक स्रोेतांची जलपातळी वेगाने खालावत चालली आहे.

ठळक मुद्देजलपातळीत घट : केवळ तीन नैसर्गिक स्रोत

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर केळापूर व घाटंजी तालुक्यात असलेले टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन नैसर्गिक जलस्रोत आहेत. तसेच वन्यजीव विभागाने जागोजागी सौरउर्जेवर चालणारे पाणवठे तयार केले आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे नैैसर्गिक स्रोेतांची जलपातळी वेगाने खालावत चालली आहे. परिणामी पाण्याच्या शोधात वन्यजीव अभयारण्याबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नैसर्गिक स्रोतांमध्ये गोसावी नाला, कुरची कुडी नाला व नैसर्गिक तलाव, हे तीन मुख्य स्रोत आहेत. यांपैकी गोसावी नाल्यात ठिकठिकाणी बंधारे बांधल्याने वन्यजीवांसाठी पाण्याची सोय होत आहे.मात्र कुरची नाला व नैसर्गिक तलावातील जलपातळी प्रचंड खालावली आहे. या तलावावर दररोज वन्यजीव आपली तहान भागविण्यासाठी येतात. या तलावात सोलार पंपच्या साह्याने पाणी सोडल्यास ते पाणी पावसाळ्यापर्यंत टिकून वन्यजीवांना दिलासा मिळणार आहे. अभयारण्य प्रशासनाने यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे. नैसर्गिक तलाव हा वन्यजीवांचा मुख्य जलस्रोत आहे. या तलावाच्या जवळच एक जुनी विहीर असल्याचे आणि विहिरीत भरपूर पाणी असल्याचे टिपेश्वर गावच्या लोकांचे म्हणणे आहे. आता या गावाचे पुनर्वसन झाले आहे. या विहिरीवर एक मोटार बसवून ती सौरऊर्जेच्या साह्याने चालू केल्यास हजारो लीटर पाणी या तलावात सोडता येणे शक्य आहे.तर वन्यजीव सैरावैरा होऊन अभयारण्याबाहेर पडतीलआता उन्हाचा पारा ४३ अंशापार गेला आहे. त्यामुळे झपाट्याने तलावातील पाणी आटत आहे. आतातरी तातडीने त्याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सध्या राज्यभरात पाण्याअभावी वन्यजीव मानवी वस्त्यांकडे जात आहेत. काही ठिकाणी वाघाने मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरात अशीच एक वाघीण तिच्या पिल्लासह आहे. तिने केलेल्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत आहेत. टिपेश्वर परिसरातील बोथ बहात्तर गाव परिसरात मागील आठवड्या वाघाने दर्शन दिले.तलावातील जलपातळी न टिकविल्यास टिपेश्वरमधील वन्यजीव सैरावैरा होऊन अभयारण्याच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Tigerवाघ