शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांचा पाणीप्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:35 IST

महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर केळापूर व घाटंजी तालुक्यात असलेले टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन नैसर्गिक जलस्रोत आहेत. तसेच वन्यजीव विभागाने जागोजागी सौरउर्जेवर चालणारे पाणवठे तयार केले आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे नैैसर्गिक स्रोेतांची जलपातळी वेगाने खालावत चालली आहे.

ठळक मुद्देजलपातळीत घट : केवळ तीन नैसर्गिक स्रोत

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर केळापूर व घाटंजी तालुक्यात असलेले टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन नैसर्गिक जलस्रोत आहेत. तसेच वन्यजीव विभागाने जागोजागी सौरउर्जेवर चालणारे पाणवठे तयार केले आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे नैैसर्गिक स्रोेतांची जलपातळी वेगाने खालावत चालली आहे. परिणामी पाण्याच्या शोधात वन्यजीव अभयारण्याबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नैसर्गिक स्रोतांमध्ये गोसावी नाला, कुरची कुडी नाला व नैसर्गिक तलाव, हे तीन मुख्य स्रोत आहेत. यांपैकी गोसावी नाल्यात ठिकठिकाणी बंधारे बांधल्याने वन्यजीवांसाठी पाण्याची सोय होत आहे.मात्र कुरची नाला व नैसर्गिक तलावातील जलपातळी प्रचंड खालावली आहे. या तलावावर दररोज वन्यजीव आपली तहान भागविण्यासाठी येतात. या तलावात सोलार पंपच्या साह्याने पाणी सोडल्यास ते पाणी पावसाळ्यापर्यंत टिकून वन्यजीवांना दिलासा मिळणार आहे. अभयारण्य प्रशासनाने यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे. नैसर्गिक तलाव हा वन्यजीवांचा मुख्य जलस्रोत आहे. या तलावाच्या जवळच एक जुनी विहीर असल्याचे आणि विहिरीत भरपूर पाणी असल्याचे टिपेश्वर गावच्या लोकांचे म्हणणे आहे. आता या गावाचे पुनर्वसन झाले आहे. या विहिरीवर एक मोटार बसवून ती सौरऊर्जेच्या साह्याने चालू केल्यास हजारो लीटर पाणी या तलावात सोडता येणे शक्य आहे.तर वन्यजीव सैरावैरा होऊन अभयारण्याबाहेर पडतीलआता उन्हाचा पारा ४३ अंशापार गेला आहे. त्यामुळे झपाट्याने तलावातील पाणी आटत आहे. आतातरी तातडीने त्याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सध्या राज्यभरात पाण्याअभावी वन्यजीव मानवी वस्त्यांकडे जात आहेत. काही ठिकाणी वाघाने मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरात अशीच एक वाघीण तिच्या पिल्लासह आहे. तिने केलेल्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत आहेत. टिपेश्वर परिसरातील बोथ बहात्तर गाव परिसरात मागील आठवड्या वाघाने दर्शन दिले.तलावातील जलपातळी न टिकविल्यास टिपेश्वरमधील वन्यजीव सैरावैरा होऊन अभयारण्याच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Tigerवाघ