शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांचा पाणीप्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:35 IST

महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर केळापूर व घाटंजी तालुक्यात असलेले टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन नैसर्गिक जलस्रोत आहेत. तसेच वन्यजीव विभागाने जागोजागी सौरउर्जेवर चालणारे पाणवठे तयार केले आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे नैैसर्गिक स्रोेतांची जलपातळी वेगाने खालावत चालली आहे.

ठळक मुद्देजलपातळीत घट : केवळ तीन नैसर्गिक स्रोत

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर केळापूर व घाटंजी तालुक्यात असलेले टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन नैसर्गिक जलस्रोत आहेत. तसेच वन्यजीव विभागाने जागोजागी सौरउर्जेवर चालणारे पाणवठे तयार केले आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे नैैसर्गिक स्रोेतांची जलपातळी वेगाने खालावत चालली आहे. परिणामी पाण्याच्या शोधात वन्यजीव अभयारण्याबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नैसर्गिक स्रोतांमध्ये गोसावी नाला, कुरची कुडी नाला व नैसर्गिक तलाव, हे तीन मुख्य स्रोत आहेत. यांपैकी गोसावी नाल्यात ठिकठिकाणी बंधारे बांधल्याने वन्यजीवांसाठी पाण्याची सोय होत आहे.मात्र कुरची नाला व नैसर्गिक तलावातील जलपातळी प्रचंड खालावली आहे. या तलावावर दररोज वन्यजीव आपली तहान भागविण्यासाठी येतात. या तलावात सोलार पंपच्या साह्याने पाणी सोडल्यास ते पाणी पावसाळ्यापर्यंत टिकून वन्यजीवांना दिलासा मिळणार आहे. अभयारण्य प्रशासनाने यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे. नैसर्गिक तलाव हा वन्यजीवांचा मुख्य जलस्रोत आहे. या तलावाच्या जवळच एक जुनी विहीर असल्याचे आणि विहिरीत भरपूर पाणी असल्याचे टिपेश्वर गावच्या लोकांचे म्हणणे आहे. आता या गावाचे पुनर्वसन झाले आहे. या विहिरीवर एक मोटार बसवून ती सौरऊर्जेच्या साह्याने चालू केल्यास हजारो लीटर पाणी या तलावात सोडता येणे शक्य आहे.तर वन्यजीव सैरावैरा होऊन अभयारण्याबाहेर पडतीलआता उन्हाचा पारा ४३ अंशापार गेला आहे. त्यामुळे झपाट्याने तलावातील पाणी आटत आहे. आतातरी तातडीने त्याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सध्या राज्यभरात पाण्याअभावी वन्यजीव मानवी वस्त्यांकडे जात आहेत. काही ठिकाणी वाघाने मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरात अशीच एक वाघीण तिच्या पिल्लासह आहे. तिने केलेल्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत आहेत. टिपेश्वर परिसरातील बोथ बहात्तर गाव परिसरात मागील आठवड्या वाघाने दर्शन दिले.तलावातील जलपातळी न टिकविल्यास टिपेश्वरमधील वन्यजीव सैरावैरा होऊन अभयारण्याच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Tigerवाघ