शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

मते मागता, मदत का देत नाहीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

सर्वेक्षणासाठी येणे अपेक्षित होते. परंतु राज्यात सरकारच अस्तित्वात नाही असे सांगून गेल्या २० दिवसांपासून ही चमू येणे टाळत आहे. वास्तविक ही चमू येऊन किमान सर्वेक्षण करू शकते, केंद्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणीही शक्य आहे. मात्र त्यानंतरही केंद्र सरकार वेळ मारुन नेत असल्याचे चित्र आहे.राज्यात लोकनियुक्त सरकार अस्तित्वात नसले तरी केंद्र सरकार अस्तित्वात आहे, त्यांचे मंत्री कार्यरत आहे.

ठळक मुद्देसंतप्त शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला सवाल : ‘एनडीआरएफ’च्या चमूची जिल्ह्याला प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात सरकार नाही असे सांगत केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत देणे टाळत आहे. त्यावर आमची मते मागता मग मदत का देत नाही असा संतप्त सवाल शेतकरी वर्ग उपस्थित करीत आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास पावसाने वाहून नेला आहे. कपाशी सुकविण्याची वेळ शेतकरी व व्यापाऱ्यांवर आली आहे. या नुकसानीची मदत मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. राज्य शासन केंद्राकडून यासाठी मदत मागणार आहे. अचानक उद्भवलेल्या या आपत्तीची भरपाई देण्याची जबाबदारी केंद्र शासनावर आहे. त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाची (एनडीआरएफ) चमू राज्यात सर्वेक्षणासाठी येणे अपेक्षित होते. परंतु राज्यात सरकारच अस्तित्वात नाही असे सांगून गेल्या २० दिवसांपासून ही चमू येणे टाळत आहे. वास्तविक ही चमू येऊन किमान सर्वेक्षण करू शकते, केंद्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणीही शक्य आहे. मात्र त्यानंतरही केंद्र सरकार वेळ मारुन नेत असल्याचे चित्र आहे.राज्यात लोकनियुक्त सरकार अस्तित्वात नसले तरी केंद्र सरकार अस्तित्वात आहे, त्यांचे मंत्री कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांना मदत देण्यासंबंधी, सर्वेक्षण, पाहणी यासाठी कोणती अडचण नाही. असे असताना केंद्र सरकार मदतीसाठी टाळाटाळ करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. खासदार, मंत्री लोकसभा निवडणुकीत मते मागायला शेतकऱ्यांच्या दारापर्यंत येतात मग आता शेतकरी संकटात असताना त्याला मदत द्यायला काय येत नाही, असा सवाल शेतकरी विचारत आहे.केंद्रीय मंत्री आहेत कुठे?महाराष्ट्रात केंद्र शासनाचे अनेक मंत्री आहे. परंतु यापैकी एकही मंत्री यवतमाळ जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी फिरकलेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारबाबत संतप्त भावना आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस