शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

मते मागता, मदत का देत नाहीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

सर्वेक्षणासाठी येणे अपेक्षित होते. परंतु राज्यात सरकारच अस्तित्वात नाही असे सांगून गेल्या २० दिवसांपासून ही चमू येणे टाळत आहे. वास्तविक ही चमू येऊन किमान सर्वेक्षण करू शकते, केंद्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणीही शक्य आहे. मात्र त्यानंतरही केंद्र सरकार वेळ मारुन नेत असल्याचे चित्र आहे.राज्यात लोकनियुक्त सरकार अस्तित्वात नसले तरी केंद्र सरकार अस्तित्वात आहे, त्यांचे मंत्री कार्यरत आहे.

ठळक मुद्देसंतप्त शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला सवाल : ‘एनडीआरएफ’च्या चमूची जिल्ह्याला प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात सरकार नाही असे सांगत केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत देणे टाळत आहे. त्यावर आमची मते मागता मग मदत का देत नाही असा संतप्त सवाल शेतकरी वर्ग उपस्थित करीत आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास पावसाने वाहून नेला आहे. कपाशी सुकविण्याची वेळ शेतकरी व व्यापाऱ्यांवर आली आहे. या नुकसानीची मदत मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. राज्य शासन केंद्राकडून यासाठी मदत मागणार आहे. अचानक उद्भवलेल्या या आपत्तीची भरपाई देण्याची जबाबदारी केंद्र शासनावर आहे. त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाची (एनडीआरएफ) चमू राज्यात सर्वेक्षणासाठी येणे अपेक्षित होते. परंतु राज्यात सरकारच अस्तित्वात नाही असे सांगून गेल्या २० दिवसांपासून ही चमू येणे टाळत आहे. वास्तविक ही चमू येऊन किमान सर्वेक्षण करू शकते, केंद्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणीही शक्य आहे. मात्र त्यानंतरही केंद्र सरकार वेळ मारुन नेत असल्याचे चित्र आहे.राज्यात लोकनियुक्त सरकार अस्तित्वात नसले तरी केंद्र सरकार अस्तित्वात आहे, त्यांचे मंत्री कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांना मदत देण्यासंबंधी, सर्वेक्षण, पाहणी यासाठी कोणती अडचण नाही. असे असताना केंद्र सरकार मदतीसाठी टाळाटाळ करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. खासदार, मंत्री लोकसभा निवडणुकीत मते मागायला शेतकऱ्यांच्या दारापर्यंत येतात मग आता शेतकरी संकटात असताना त्याला मदत द्यायला काय येत नाही, असा सवाल शेतकरी विचारत आहे.केंद्रीय मंत्री आहेत कुठे?महाराष्ट्रात केंद्र शासनाचे अनेक मंत्री आहे. परंतु यापैकी एकही मंत्री यवतमाळ जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी फिरकलेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारबाबत संतप्त भावना आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस