शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

बिनाबर्फ रस महाग का? अन्न व औषध प्रशासनाचे तपासणीकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 18:16 IST

Yavatmal : उन्हाळ्याची चाहूल लागताच रस्त्यावर रसवंती गृहे सुरू

देवेंद्र पोल्हे लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरासह ग्रामीण भागात विविध रस्त्यांवर, वर्दळीच्या ठिकाणी रसवंती गृहे थाटायला सुरुवात झाली आहे. मात्र, या ठिकाणी वापरले जाणारे पाणी शुद्ध आहे का? रसामध्ये टाकण्यात येणारा बर्फ शुद्ध पाण्यापासून तयार केला जातो का?, याबाबतच्या तपासणीकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, शक्यतो बिनाबर्फाचा रस पिणे कधीही आरोग्यासाठी चांगले असते. 

व्यावसायिकही चार महिन्यांचे सिझन म्हणून परवानगीशिवाय हा व्यवसाय सुरू करीत आहे. तालुक्यात अशी रसवंतीची दुकाने थाटली असताना, बऱ्याच व्यावसायिकांना रितसर परवानगीचा विसर पडल्याचे दिसून येते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शरीरातील दाहकता कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या थंड पेयांची दुकाने थाटली जातात. यात आईस्क्रीम, लस्सी, कोल्ड्रिंग, लिंबूपाणी आणि रसवंती इत्यादी दुकानाचा यात समावेश होतो. यातील लिंबू पाणी आणि रसवंती या ठिकाणी दिवसभरात मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर होत आहे.

प्रशासनाची परवानगी नाहीचवास्तविक रसवंतीचा व्यवसाय सुरू कारण्यापूर्वी नियमाप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या विभागाशी संबंधित अनेक व्यवसाय परवानगी न घेताच सर्रास हा व्यवसाय सुरू करतात. या व्यावसायिकांची कधी अन्न व औषध विभागाने तपासणी केल्याची अथवा कार्यवाही केल्याचेही ऐकण्यात नाही. मोजक्या दिवसांचा व्यवसाय असल्यानेही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते.

बिना बर्फाचा रस महाग काअनेकदा रस घेताना तो बर्फाचा की विना बर्फाचा हवा, असे विचारले जाते, बर्फ वितळून त्याचे पाणी होते. त्यामुळे उसाच्या एका कांडक्यात पाच ग्लास रस तयार होतो. याउलट बिना बर्फाच्या रसासाठी जास्त ऊस लागतो. सोबतच अद्रक, लिंबू वेगळे टाकावे लागते. त्यामुळे बिना बर्फ रस बर्फाच्या रसापेक्षा महाग विकला जातो. आणि शरीरासाठीही तो चांगला असतो.

बर्फाचा रस १० रुपयाला हाफ, १५ फुलसध्या बाजारात थंडपेयांची मागणी वाढत आहे. त्यातही उसाच्या रसाला नागरिकांची पसंती आहे. बर्फाचा रस एक छोटा ग्लास दहा रुपयाला मिळतो. तर बिना बर्फाचा रस एक छोटा ग्लास १५ रुपयाला मिळतो. उसाच्या तुलनेत बर्फ स्वस्त असल्याने हा फरक आहे.

बर्फ टाकलेलाच रस हवाय !

  • उन्हाची दाहकता जेव्हा वाढते, तेव्हा थंड पिण्याकडे जवळपास सर्वच व्यक्तीचा कल असतो.
  • अशावेळी नागरिक बर्फ टाकलेला उसाचा रस, लस्सी, लिंबूपाणी पिण्यासाठी पसंती देतात.

...तर पोटाचा त्रासअस्वच्छ पाण्यापासून तयार केलेला बर्फ पोटात गेल्यास घसा दुखी, जुलाब, तसेच पोटात इंन्फेक्शन होऊन पोट दुखीची समस्या उद्भवू शकते. सर्दी-खोकल्याचींही बाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी रसवंतीगृहावर रस पिताना या गोष्टींची खरबदारी घेणे गरजेचे आहे.

बर्फाची शुद्धता तपासली जाते का?खाण्यासाठी असलेला बर्फ शुद्ध पाण्यापासुन बनविणे बंधनकारक आहे. मात्र असा बर्फ महाग असल्याने अनेकदा थंड पेय विक्रेते स्वस्त पडणारा बर्फ खरेदी करतात.

"शुद्ध पाण्यापासून तयार केलेला बर्फच वापरणे बंधनकारक असून, व्यावसाय सुरू करताना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे."- अमितकुमार अप्लाप, अन्न व औषधी प्रशासन, यवतमाळ.

 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागYavatmalयवतमाळ