शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

बिनाबर्फ रस महाग का? अन्न व औषध प्रशासनाचे तपासणीकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 18:16 IST

Yavatmal : उन्हाळ्याची चाहूल लागताच रस्त्यावर रसवंती गृहे सुरू

देवेंद्र पोल्हे लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरासह ग्रामीण भागात विविध रस्त्यांवर, वर्दळीच्या ठिकाणी रसवंती गृहे थाटायला सुरुवात झाली आहे. मात्र, या ठिकाणी वापरले जाणारे पाणी शुद्ध आहे का? रसामध्ये टाकण्यात येणारा बर्फ शुद्ध पाण्यापासून तयार केला जातो का?, याबाबतच्या तपासणीकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, शक्यतो बिनाबर्फाचा रस पिणे कधीही आरोग्यासाठी चांगले असते. 

व्यावसायिकही चार महिन्यांचे सिझन म्हणून परवानगीशिवाय हा व्यवसाय सुरू करीत आहे. तालुक्यात अशी रसवंतीची दुकाने थाटली असताना, बऱ्याच व्यावसायिकांना रितसर परवानगीचा विसर पडल्याचे दिसून येते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शरीरातील दाहकता कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या थंड पेयांची दुकाने थाटली जातात. यात आईस्क्रीम, लस्सी, कोल्ड्रिंग, लिंबूपाणी आणि रसवंती इत्यादी दुकानाचा यात समावेश होतो. यातील लिंबू पाणी आणि रसवंती या ठिकाणी दिवसभरात मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर होत आहे.

प्रशासनाची परवानगी नाहीचवास्तविक रसवंतीचा व्यवसाय सुरू कारण्यापूर्वी नियमाप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या विभागाशी संबंधित अनेक व्यवसाय परवानगी न घेताच सर्रास हा व्यवसाय सुरू करतात. या व्यावसायिकांची कधी अन्न व औषध विभागाने तपासणी केल्याची अथवा कार्यवाही केल्याचेही ऐकण्यात नाही. मोजक्या दिवसांचा व्यवसाय असल्यानेही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते.

बिना बर्फाचा रस महाग काअनेकदा रस घेताना तो बर्फाचा की विना बर्फाचा हवा, असे विचारले जाते, बर्फ वितळून त्याचे पाणी होते. त्यामुळे उसाच्या एका कांडक्यात पाच ग्लास रस तयार होतो. याउलट बिना बर्फाच्या रसासाठी जास्त ऊस लागतो. सोबतच अद्रक, लिंबू वेगळे टाकावे लागते. त्यामुळे बिना बर्फ रस बर्फाच्या रसापेक्षा महाग विकला जातो. आणि शरीरासाठीही तो चांगला असतो.

बर्फाचा रस १० रुपयाला हाफ, १५ फुलसध्या बाजारात थंडपेयांची मागणी वाढत आहे. त्यातही उसाच्या रसाला नागरिकांची पसंती आहे. बर्फाचा रस एक छोटा ग्लास दहा रुपयाला मिळतो. तर बिना बर्फाचा रस एक छोटा ग्लास १५ रुपयाला मिळतो. उसाच्या तुलनेत बर्फ स्वस्त असल्याने हा फरक आहे.

बर्फ टाकलेलाच रस हवाय !

  • उन्हाची दाहकता जेव्हा वाढते, तेव्हा थंड पिण्याकडे जवळपास सर्वच व्यक्तीचा कल असतो.
  • अशावेळी नागरिक बर्फ टाकलेला उसाचा रस, लस्सी, लिंबूपाणी पिण्यासाठी पसंती देतात.

...तर पोटाचा त्रासअस्वच्छ पाण्यापासून तयार केलेला बर्फ पोटात गेल्यास घसा दुखी, जुलाब, तसेच पोटात इंन्फेक्शन होऊन पोट दुखीची समस्या उद्भवू शकते. सर्दी-खोकल्याचींही बाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी रसवंतीगृहावर रस पिताना या गोष्टींची खरबदारी घेणे गरजेचे आहे.

बर्फाची शुद्धता तपासली जाते का?खाण्यासाठी असलेला बर्फ शुद्ध पाण्यापासुन बनविणे बंधनकारक आहे. मात्र असा बर्फ महाग असल्याने अनेकदा थंड पेय विक्रेते स्वस्त पडणारा बर्फ खरेदी करतात.

"शुद्ध पाण्यापासून तयार केलेला बर्फच वापरणे बंधनकारक असून, व्यावसाय सुरू करताना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे."- अमितकुमार अप्लाप, अन्न व औषधी प्रशासन, यवतमाळ.

 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागYavatmalयवतमाळ