शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
4
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
5
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
6
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
7
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
8
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
9
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
10
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
11
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
12
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
13
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
14
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
15
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
16
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
17
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
18
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
19
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
20
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी

उन्हाळ्यात गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा का हवी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:31 IST

Yavatmal : उन्हाळ्यात टायर फुटण्याची ही आहेत प्रमुख कारणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाहनातील टायरमध्ये कॉम्प्रेसरच्या माध्यमातून भरल्या जाणारी हवा आणि नायट्रोजन हवा यात मोठा फरक आहे. कॉम्प्रेसरमधील हवेपेक्षा नायट्रोजन हवा ही सर्वाधिक थंड आहे. यामुळे वाहन कितीही वेगात आणि कितीही वेळ चालविले तर टायर गरम येत नाही. परिणामी टायर फुटण्याचा धोका नसल्यासारखाच असतो. 

यामुळे चारचाकी वाहनांच्या सुरक्षेसाठी नायट्रोजन हवा ही सर्वाधिक सुरक्षित हवा मानली जाते. त्याच प्रमाणे दुचाकी वाहनातही नायट्रोजन हवा भरली तर हवा लवकर उतरत नाही. यामुळे दुचाकी वाहनाचा टायर फुटण्याचा धोका कमी होतो. गाडी चालविताना त्यात डिझेल किंवा पेट्रोल यावर लक्ष दिले जाते. मात्र गाडीला असलेल्या टायरकडे लक्षच दिले जात नाही. त्यातली हवा उन्हाच्या पाऱ्याने झपाट्याने घटते. अनेकवेळा तर टायर फुटून अपघात होतो. मात्र त्या बाबीकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष होते. वेळीच उपाय केले तर होणारा अपघात टाळता येतो. यासाठी वाहनधारकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.

उन्हाळ्यात टायर फुटण्याची ही आहेत प्रमुख कारणेराज्य मार्गावर आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामात सिमेंटचा वापर होत आहे. सिमेंट अधिक गरम असते. अशा परिस्थितीत लांब पल्ल्याचे वाहन रस्त्यावरून धावत असेल तर टायर गरम येतो. सोबत टायरमधील हवादेखील गरम होते. यामुळे टायर फुटून अपघात होण्याचा धोका असतो.

रिमोल्ड टायरचा पर्याय

  • मोठा टायर नवीन विकत घ्यायचा असेल तर त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक ग्राहक अशा टायरला रिमोल्ड केले जाते. खासकरून ट्रॅक्टरचा टायर रिमोल्ड केला जातो. यावर काही काळ वाहन चालविता येते. मात्र त्यातून कायमस्वरूपी पर्याय निघत नाही.
  • मोठ्या टायरला रिमोल्ड करता 3 येते. मात्र दुचाकी वाहनाच्या टायरला रिमोल्ड केले तर त्याचा कुठलाही उपयोग होत नाही. असे टायर लवकरच फुटतात. दुचाकी वाहनाला रिमोल्डचा पर्याय धोकादायक आहे. यासाठी नवीन टायर शोधावे लागते.

तापमान ३६ अंशांवरहिवाळ्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्याचे तापमान ३६ अंशांपर्यंत वर चढले आहे. पुढील काळात हे ऊन अधिक तापणार आहे. अशा परिस्थितीत अधिक ऊन असल्यामुळे टायरमधील हवा कमी होते. अचानक हवा कमी झाल्यानंतर रस्त्यावरील खाच खळग्यात वाहनांचे मोठे नुकसान होते.

किती किलोमीटरनंतर बदलविणार टायर?चारचाकी वाहनामध्ये ५० हजार किलोमीटरनंतर टायर बदलणे आवश्यक आहे. त्यानंतर टायरवर अधिक दबाव पडण्यास सुरुवात होते. यामुळे एका बाजूने टायर घासल्या जातो. यातून टायर फुटण्याचा धोका वाढतो.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ