शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा का हवी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:31 IST

Yavatmal : उन्हाळ्यात टायर फुटण्याची ही आहेत प्रमुख कारणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाहनातील टायरमध्ये कॉम्प्रेसरच्या माध्यमातून भरल्या जाणारी हवा आणि नायट्रोजन हवा यात मोठा फरक आहे. कॉम्प्रेसरमधील हवेपेक्षा नायट्रोजन हवा ही सर्वाधिक थंड आहे. यामुळे वाहन कितीही वेगात आणि कितीही वेळ चालविले तर टायर गरम येत नाही. परिणामी टायर फुटण्याचा धोका नसल्यासारखाच असतो. 

यामुळे चारचाकी वाहनांच्या सुरक्षेसाठी नायट्रोजन हवा ही सर्वाधिक सुरक्षित हवा मानली जाते. त्याच प्रमाणे दुचाकी वाहनातही नायट्रोजन हवा भरली तर हवा लवकर उतरत नाही. यामुळे दुचाकी वाहनाचा टायर फुटण्याचा धोका कमी होतो. गाडी चालविताना त्यात डिझेल किंवा पेट्रोल यावर लक्ष दिले जाते. मात्र गाडीला असलेल्या टायरकडे लक्षच दिले जात नाही. त्यातली हवा उन्हाच्या पाऱ्याने झपाट्याने घटते. अनेकवेळा तर टायर फुटून अपघात होतो. मात्र त्या बाबीकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष होते. वेळीच उपाय केले तर होणारा अपघात टाळता येतो. यासाठी वाहनधारकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.

उन्हाळ्यात टायर फुटण्याची ही आहेत प्रमुख कारणेराज्य मार्गावर आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामात सिमेंटचा वापर होत आहे. सिमेंट अधिक गरम असते. अशा परिस्थितीत लांब पल्ल्याचे वाहन रस्त्यावरून धावत असेल तर टायर गरम येतो. सोबत टायरमधील हवादेखील गरम होते. यामुळे टायर फुटून अपघात होण्याचा धोका असतो.

रिमोल्ड टायरचा पर्याय

  • मोठा टायर नवीन विकत घ्यायचा असेल तर त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक ग्राहक अशा टायरला रिमोल्ड केले जाते. खासकरून ट्रॅक्टरचा टायर रिमोल्ड केला जातो. यावर काही काळ वाहन चालविता येते. मात्र त्यातून कायमस्वरूपी पर्याय निघत नाही.
  • मोठ्या टायरला रिमोल्ड करता 3 येते. मात्र दुचाकी वाहनाच्या टायरला रिमोल्ड केले तर त्याचा कुठलाही उपयोग होत नाही. असे टायर लवकरच फुटतात. दुचाकी वाहनाला रिमोल्डचा पर्याय धोकादायक आहे. यासाठी नवीन टायर शोधावे लागते.

तापमान ३६ अंशांवरहिवाळ्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्याचे तापमान ३६ अंशांपर्यंत वर चढले आहे. पुढील काळात हे ऊन अधिक तापणार आहे. अशा परिस्थितीत अधिक ऊन असल्यामुळे टायरमधील हवा कमी होते. अचानक हवा कमी झाल्यानंतर रस्त्यावरील खाच खळग्यात वाहनांचे मोठे नुकसान होते.

किती किलोमीटरनंतर बदलविणार टायर?चारचाकी वाहनामध्ये ५० हजार किलोमीटरनंतर टायर बदलणे आवश्यक आहे. त्यानंतर टायरवर अधिक दबाव पडण्यास सुरुवात होते. यामुळे एका बाजूने टायर घासल्या जातो. यातून टायर फुटण्याचा धोका वाढतो.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ