शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

उन्हाळ्यात गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा का हवी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:31 IST

Yavatmal : उन्हाळ्यात टायर फुटण्याची ही आहेत प्रमुख कारणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाहनातील टायरमध्ये कॉम्प्रेसरच्या माध्यमातून भरल्या जाणारी हवा आणि नायट्रोजन हवा यात मोठा फरक आहे. कॉम्प्रेसरमधील हवेपेक्षा नायट्रोजन हवा ही सर्वाधिक थंड आहे. यामुळे वाहन कितीही वेगात आणि कितीही वेळ चालविले तर टायर गरम येत नाही. परिणामी टायर फुटण्याचा धोका नसल्यासारखाच असतो. 

यामुळे चारचाकी वाहनांच्या सुरक्षेसाठी नायट्रोजन हवा ही सर्वाधिक सुरक्षित हवा मानली जाते. त्याच प्रमाणे दुचाकी वाहनातही नायट्रोजन हवा भरली तर हवा लवकर उतरत नाही. यामुळे दुचाकी वाहनाचा टायर फुटण्याचा धोका कमी होतो. गाडी चालविताना त्यात डिझेल किंवा पेट्रोल यावर लक्ष दिले जाते. मात्र गाडीला असलेल्या टायरकडे लक्षच दिले जात नाही. त्यातली हवा उन्हाच्या पाऱ्याने झपाट्याने घटते. अनेकवेळा तर टायर फुटून अपघात होतो. मात्र त्या बाबीकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष होते. वेळीच उपाय केले तर होणारा अपघात टाळता येतो. यासाठी वाहनधारकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.

उन्हाळ्यात टायर फुटण्याची ही आहेत प्रमुख कारणेराज्य मार्गावर आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामात सिमेंटचा वापर होत आहे. सिमेंट अधिक गरम असते. अशा परिस्थितीत लांब पल्ल्याचे वाहन रस्त्यावरून धावत असेल तर टायर गरम येतो. सोबत टायरमधील हवादेखील गरम होते. यामुळे टायर फुटून अपघात होण्याचा धोका असतो.

रिमोल्ड टायरचा पर्याय

  • मोठा टायर नवीन विकत घ्यायचा असेल तर त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक ग्राहक अशा टायरला रिमोल्ड केले जाते. खासकरून ट्रॅक्टरचा टायर रिमोल्ड केला जातो. यावर काही काळ वाहन चालविता येते. मात्र त्यातून कायमस्वरूपी पर्याय निघत नाही.
  • मोठ्या टायरला रिमोल्ड करता 3 येते. मात्र दुचाकी वाहनाच्या टायरला रिमोल्ड केले तर त्याचा कुठलाही उपयोग होत नाही. असे टायर लवकरच फुटतात. दुचाकी वाहनाला रिमोल्डचा पर्याय धोकादायक आहे. यासाठी नवीन टायर शोधावे लागते.

तापमान ३६ अंशांवरहिवाळ्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्याचे तापमान ३६ अंशांपर्यंत वर चढले आहे. पुढील काळात हे ऊन अधिक तापणार आहे. अशा परिस्थितीत अधिक ऊन असल्यामुळे टायरमधील हवा कमी होते. अचानक हवा कमी झाल्यानंतर रस्त्यावरील खाच खळग्यात वाहनांचे मोठे नुकसान होते.

किती किलोमीटरनंतर बदलविणार टायर?चारचाकी वाहनामध्ये ५० हजार किलोमीटरनंतर टायर बदलणे आवश्यक आहे. त्यानंतर टायरवर अधिक दबाव पडण्यास सुरुवात होते. यामुळे एका बाजूने टायर घासल्या जातो. यातून टायर फुटण्याचा धोका वाढतो.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ