शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

चार लाख मुलांना लसीकरण झाले की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:46 IST

गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण सुरू आहे. प्रत्येक शाळेत १०० टक्के लसीकरणाचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. तरीही आॅनलाईन नोंदींमध्ये मात्र केवळ ५९ हजार विद्यार्थ्यांनाच लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आल्याने संभ्रम वाढला आहे.

ठळक मुद्देगोवर-रुबेला मोहीम : साडेचार लाख मुलांपैकी केवळ ५९ हजारांचीच नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण सुरू आहे. प्रत्येक शाळेत १०० टक्के लसीकरणाचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. तरीही आॅनलाईन नोंदींमध्ये मात्र केवळ ५९ हजार विद्यार्थ्यांनाच लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आल्याने संभ्रम वाढला आहे. उर्वरित ४ लाख मुलांना लस देण्यात आली की नाही, याबाबत थेट शिक्षण आयुक्त स्तरावरून आता विचारणा केली जात आहे.२०२० पर्यंत गोवर-रुबेला या आजारांचे देशातून समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यासाठी २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. ९ महिने ते १५ वर्ष या वयोगटातील मुलांना लस दिली जात आहे. या वयोगटात जिल्ह्यात साधारण ८ लाख मुले-मुली आहेत. त्यातील ४ लाख ६० हजार ३६ मुले जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पहिली ते दहावीमध्ये शिकत आहेत. त्यांच्या लसीकरणाची नोंद शाळेने ‘सरल’ प्रणालीत करण्याचे निर्देश आहेत. प्रत्यक्षात शाळांकडून अत्यल्प नोंदी झाल्याने शाळांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या सहकार्याने शाळांमध्ये लसीकरण केले जात आहे. लसीकरणानंतर सरलमध्ये नोंदीची जबाबदारी शाळांची आहे. शाळांनी १३ डिसेंबरपर्यंत केवळ ५९ हजार ३०३ विद्यार्थ्यांना लसीकरण झाल्याची नोंद केली आहे.त्या हिशेबाने जिल्ह्यात लसीकरणाचे काम केवळ १५ टक्के झाल्याचे स्पष्ट होत असल्याने आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. मोहिमेचा अर्धा कालावधी संपलेला असताना अद्याप ३ लाख ९२ हजार ५२४ विद्यार्थ्यांना लसीकरण झाल्याची नोंद नाही. आता हे लसीकरणच झालेले नाही, की केवळ नोंदी झालेल्या नाही, हा प्रश्न शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरणार आहे.आठ हजार मुले लसीकरणातून सुटलीचशाळांनी आतापर्यंत केवळ ६७ हजार ५१२ विद्यार्थ्यांबाबत आॅनलाईन नोंदी केल्या आहेत. त्यात ५९ हजार ३०३ विद्यार्थ्यांना लस दिल्याचे म्हटले आहे. तर ८ हजार २०९ विद्यार्थी लसीकरणातून सुटल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, ज्या ३ लाख ९२ हजार ५२४ विद्यार्थ्यांच्या कोणत्याच प्रकारच्या नोंदी नाही, त्यांच्याबाबत नेमके काय घडले, या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे.लसीकरणातून सुटलेले तालुकानिहाय विद्यार्थी८ हजार विद्यार्थ्यांना लसीकरण झालेले नाही, अशी आॅनलाईन नोंद विविध शाळांनी केली आहे. त्यामध्ये आर्णी तालुक्यात ३६ विद्यार्थी वंचित राहिले. बाभूळगावात ८६, दारव्हा ४३२, दिग्रस ७३०, घाटंजी १९५, कळंब ६३, महागाव २३५५, मारेगाव २२०, नेर २७९, पांढरकवडा २९१, पुसद ८७२, राळेगाव ४३, उमरखेड १०८२, वणी ४३६, यवतमाळ ९४९, तर झरी तालुक्यात १४० विद्यार्थी लसीकरणातून सुटले आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य