शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चार लाख मुलांना लसीकरण झाले की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:46 IST

गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण सुरू आहे. प्रत्येक शाळेत १०० टक्के लसीकरणाचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. तरीही आॅनलाईन नोंदींमध्ये मात्र केवळ ५९ हजार विद्यार्थ्यांनाच लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आल्याने संभ्रम वाढला आहे.

ठळक मुद्देगोवर-रुबेला मोहीम : साडेचार लाख मुलांपैकी केवळ ५९ हजारांचीच नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण सुरू आहे. प्रत्येक शाळेत १०० टक्के लसीकरणाचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. तरीही आॅनलाईन नोंदींमध्ये मात्र केवळ ५९ हजार विद्यार्थ्यांनाच लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आल्याने संभ्रम वाढला आहे. उर्वरित ४ लाख मुलांना लस देण्यात आली की नाही, याबाबत थेट शिक्षण आयुक्त स्तरावरून आता विचारणा केली जात आहे.२०२० पर्यंत गोवर-रुबेला या आजारांचे देशातून समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यासाठी २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. ९ महिने ते १५ वर्ष या वयोगटातील मुलांना लस दिली जात आहे. या वयोगटात जिल्ह्यात साधारण ८ लाख मुले-मुली आहेत. त्यातील ४ लाख ६० हजार ३६ मुले जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पहिली ते दहावीमध्ये शिकत आहेत. त्यांच्या लसीकरणाची नोंद शाळेने ‘सरल’ प्रणालीत करण्याचे निर्देश आहेत. प्रत्यक्षात शाळांकडून अत्यल्प नोंदी झाल्याने शाळांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या सहकार्याने शाळांमध्ये लसीकरण केले जात आहे. लसीकरणानंतर सरलमध्ये नोंदीची जबाबदारी शाळांची आहे. शाळांनी १३ डिसेंबरपर्यंत केवळ ५९ हजार ३०३ विद्यार्थ्यांना लसीकरण झाल्याची नोंद केली आहे.त्या हिशेबाने जिल्ह्यात लसीकरणाचे काम केवळ १५ टक्के झाल्याचे स्पष्ट होत असल्याने आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. मोहिमेचा अर्धा कालावधी संपलेला असताना अद्याप ३ लाख ९२ हजार ५२४ विद्यार्थ्यांना लसीकरण झाल्याची नोंद नाही. आता हे लसीकरणच झालेले नाही, की केवळ नोंदी झालेल्या नाही, हा प्रश्न शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरणार आहे.आठ हजार मुले लसीकरणातून सुटलीचशाळांनी आतापर्यंत केवळ ६७ हजार ५१२ विद्यार्थ्यांबाबत आॅनलाईन नोंदी केल्या आहेत. त्यात ५९ हजार ३०३ विद्यार्थ्यांना लस दिल्याचे म्हटले आहे. तर ८ हजार २०९ विद्यार्थी लसीकरणातून सुटल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, ज्या ३ लाख ९२ हजार ५२४ विद्यार्थ्यांच्या कोणत्याच प्रकारच्या नोंदी नाही, त्यांच्याबाबत नेमके काय घडले, या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे.लसीकरणातून सुटलेले तालुकानिहाय विद्यार्थी८ हजार विद्यार्थ्यांना लसीकरण झालेले नाही, अशी आॅनलाईन नोंद विविध शाळांनी केली आहे. त्यामध्ये आर्णी तालुक्यात ३६ विद्यार्थी वंचित राहिले. बाभूळगावात ८६, दारव्हा ४३२, दिग्रस ७३०, घाटंजी १९५, कळंब ६३, महागाव २३५५, मारेगाव २२०, नेर २७९, पांढरकवडा २९१, पुसद ८७२, राळेगाव ४३, उमरखेड १०८२, वणी ४३६, यवतमाळ ९४९, तर झरी तालुक्यात १४० विद्यार्थी लसीकरणातून सुटले आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य