शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
7
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
8
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
9
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
10
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
11
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
12
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
13
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
14
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
16
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
17
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
18
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
19
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
20
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात पायबंद ; प्रशासनातील 'दलालराज' संपणार तर कधी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:46 IST

Yavatmal : वैयक्तिक लाभाच्या योजनांसह दाखल्यांसाठी पिळवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विविध शासकीय विभागांसह कार्यालयांमध्ये दलालांचा कायम वावर असतो. नागरिकांना कुठलेही काम दलालामार्फतच करावे लागते. जिल्ह्यात दलाल 'संस्कृती' चांगलीच रुजली आहे. सरकारने मंत्रालयातील दलालांना पायबंद घालण्यासाठी नुकताच निर्णय घेतला. शासकीय कार्यालयातील 'दलालराज' संपविण्यासाठी कधी पाऊल उचलणार, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, महावितरण, भूमिअभिलेख आदी विभागांशी नागरिकांचा थेट संबंध येतो. घरकुल, शिधापत्रिका, निराधार, कृषी साहित्य, शिलाई मशीन, शौचालय यासह विविध वैयक्तिक लाभाच्या योजना शासनाकडून राबविल्या जातात. तसेच उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलिअर, जातीचा दाखला आदी कागदपत्रेही शासकीय कार्यालयातून आणि सेतू केंद्रातून उपलब्ध होते. ही सर्व प्रक्रिया राबविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वैयक्तिक योजनांचा लाभ आणि अन्य कामे शासकीय कार्यालयातून थेट न होता, दलालामार्फतच होत असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. अनेक विभागात तर दलाल मंडळी अगदी कमर्चाऱ्याच्या रुबाबात वावरताना दिसतात. हा संपूर्ण प्रकार माहीत असूनही, अधिकारी कारवाई करीत नाही. त्यामुळे नागरिकही तक्रार करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारने मंत्रालयातील दलालांना पायबंद घालण्यासाठी पावले उचलली आहे. शासकीय विभागातील दलालांनाही चाप लावण्यासाठी कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिक करीत आहे. 

प्रत्येक कामासाठी वेगवेगळे 'रेट' जिल्ह्यात बहुतांश शासकीय कार्यालयाच्या परिसरात दलालांचा सुळसुळाट झालेला आहे. कामानुसार दलालांकडून 'रेट' आकारले जात आहे. पैसे दिल्यानंतरच झटपट कामे होत असून, अन्यथा कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. दलाल मंडळी दररोज हजारो रुपये सर्वसामान्यांकडून उकळत आहे. यात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे.

एसीबीच्या ट्रॅपमध्येही सापडले दलालजिल्ह्यात आजवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक सापळे रचून लाचखोरांना ताब्यात घेतले. यात खासगी व्यक्तींची संख्याही लक्षणीय आढळून आलेली आहे. वर्षभरात तीन खासगी व्यक्ती लाचखोरीत अडकले. यावरून प्रशासनात दलाल चांगलेच सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ