शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मंत्रालयात पायबंद ; प्रशासनातील 'दलालराज' संपणार तर कधी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:46 IST

Yavatmal : वैयक्तिक लाभाच्या योजनांसह दाखल्यांसाठी पिळवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विविध शासकीय विभागांसह कार्यालयांमध्ये दलालांचा कायम वावर असतो. नागरिकांना कुठलेही काम दलालामार्फतच करावे लागते. जिल्ह्यात दलाल 'संस्कृती' चांगलीच रुजली आहे. सरकारने मंत्रालयातील दलालांना पायबंद घालण्यासाठी नुकताच निर्णय घेतला. शासकीय कार्यालयातील 'दलालराज' संपविण्यासाठी कधी पाऊल उचलणार, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, महावितरण, भूमिअभिलेख आदी विभागांशी नागरिकांचा थेट संबंध येतो. घरकुल, शिधापत्रिका, निराधार, कृषी साहित्य, शिलाई मशीन, शौचालय यासह विविध वैयक्तिक लाभाच्या योजना शासनाकडून राबविल्या जातात. तसेच उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलिअर, जातीचा दाखला आदी कागदपत्रेही शासकीय कार्यालयातून आणि सेतू केंद्रातून उपलब्ध होते. ही सर्व प्रक्रिया राबविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वैयक्तिक योजनांचा लाभ आणि अन्य कामे शासकीय कार्यालयातून थेट न होता, दलालामार्फतच होत असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. अनेक विभागात तर दलाल मंडळी अगदी कमर्चाऱ्याच्या रुबाबात वावरताना दिसतात. हा संपूर्ण प्रकार माहीत असूनही, अधिकारी कारवाई करीत नाही. त्यामुळे नागरिकही तक्रार करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारने मंत्रालयातील दलालांना पायबंद घालण्यासाठी पावले उचलली आहे. शासकीय विभागातील दलालांनाही चाप लावण्यासाठी कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिक करीत आहे. 

प्रत्येक कामासाठी वेगवेगळे 'रेट' जिल्ह्यात बहुतांश शासकीय कार्यालयाच्या परिसरात दलालांचा सुळसुळाट झालेला आहे. कामानुसार दलालांकडून 'रेट' आकारले जात आहे. पैसे दिल्यानंतरच झटपट कामे होत असून, अन्यथा कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. दलाल मंडळी दररोज हजारो रुपये सर्वसामान्यांकडून उकळत आहे. यात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे.

एसीबीच्या ट्रॅपमध्येही सापडले दलालजिल्ह्यात आजवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक सापळे रचून लाचखोरांना ताब्यात घेतले. यात खासगी व्यक्तींची संख्याही लक्षणीय आढळून आलेली आहे. वर्षभरात तीन खासगी व्यक्ती लाचखोरीत अडकले. यावरून प्रशासनात दलाल चांगलेच सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ