शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

मंत्रालयात पायबंद ; प्रशासनातील 'दलालराज' संपणार तर कधी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:46 IST

Yavatmal : वैयक्तिक लाभाच्या योजनांसह दाखल्यांसाठी पिळवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विविध शासकीय विभागांसह कार्यालयांमध्ये दलालांचा कायम वावर असतो. नागरिकांना कुठलेही काम दलालामार्फतच करावे लागते. जिल्ह्यात दलाल 'संस्कृती' चांगलीच रुजली आहे. सरकारने मंत्रालयातील दलालांना पायबंद घालण्यासाठी नुकताच निर्णय घेतला. शासकीय कार्यालयातील 'दलालराज' संपविण्यासाठी कधी पाऊल उचलणार, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, महावितरण, भूमिअभिलेख आदी विभागांशी नागरिकांचा थेट संबंध येतो. घरकुल, शिधापत्रिका, निराधार, कृषी साहित्य, शिलाई मशीन, शौचालय यासह विविध वैयक्तिक लाभाच्या योजना शासनाकडून राबविल्या जातात. तसेच उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलिअर, जातीचा दाखला आदी कागदपत्रेही शासकीय कार्यालयातून आणि सेतू केंद्रातून उपलब्ध होते. ही सर्व प्रक्रिया राबविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वैयक्तिक योजनांचा लाभ आणि अन्य कामे शासकीय कार्यालयातून थेट न होता, दलालामार्फतच होत असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. अनेक विभागात तर दलाल मंडळी अगदी कमर्चाऱ्याच्या रुबाबात वावरताना दिसतात. हा संपूर्ण प्रकार माहीत असूनही, अधिकारी कारवाई करीत नाही. त्यामुळे नागरिकही तक्रार करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारने मंत्रालयातील दलालांना पायबंद घालण्यासाठी पावले उचलली आहे. शासकीय विभागातील दलालांनाही चाप लावण्यासाठी कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिक करीत आहे. 

प्रत्येक कामासाठी वेगवेगळे 'रेट' जिल्ह्यात बहुतांश शासकीय कार्यालयाच्या परिसरात दलालांचा सुळसुळाट झालेला आहे. कामानुसार दलालांकडून 'रेट' आकारले जात आहे. पैसे दिल्यानंतरच झटपट कामे होत असून, अन्यथा कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. दलाल मंडळी दररोज हजारो रुपये सर्वसामान्यांकडून उकळत आहे. यात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे.

एसीबीच्या ट्रॅपमध्येही सापडले दलालजिल्ह्यात आजवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक सापळे रचून लाचखोरांना ताब्यात घेतले. यात खासगी व्यक्तींची संख्याही लक्षणीय आढळून आलेली आहे. वर्षभरात तीन खासगी व्यक्ती लाचखोरीत अडकले. यावरून प्रशासनात दलाल चांगलेच सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ