शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

यवतमाळ जिल्ह्यात ओले संकट; पुराच्या भीतीने आर्णी तालुक्याने जागून काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 10:32 IST

गेल्या तीन दिवसांपासून संततधारेने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसह काही तालुक्यांना झोडपून काढले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती धरणातील पाण्याची पातळी ६८ टक्क्यांवर गेल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी गुरुवारची रात्र अक्षरश: जागून काढली.

ठळक मुद्देनदीकाठची बहुतांश गावे पाण्याखालीनाल्याचे पाणी उलटे गावात शिरलेशुक्रवारी सकाळी पाणी ओसरलेवाहतूक पूर्ववत, जनजीवन सामान्य

हरिओमसिंह बघेल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: गेल्या तीन दिवसांपासून संततधारेने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसह काही तालुक्यांना झोडपून काढले आहे. बुधवारी रात्री

पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती धरणातील पाण्याची पातळी ६८ टक्क्यांवर गेल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी गुरुवारची रात्र अक्षरश: जागून काढली. सोशल मिडियावरून सतत जागोजागीच्या अपडेटस एकमेकांसोबत शेअर करीत नागरिक एकमेकांना धीर देत सकाळ होण्याची वाट पहात जागत होते.गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघाड न दिल्याने अनेक प्रवासी जागोजागी अडकून पडले आहेत. गावागावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी शाळा, तहसील कार्यालये व मंदिरात आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. पूर येण्याची धास्ती प्रत्येकाच्या मनात असल्याने नागरिक दुकानांसमोर, बसस्थानकांवर समूहांत थांबले होते व वाढत्या पाण्याचा अंदाज घेत होते. रात्री बारानंतर पाण्याचा जोर थोडा कमी झाल्यानंतर या नागरिकांनी थोडासा सुटकेचा निश्वास टाकला.अरुणावती हे धरण आर्णी गावापासून सुमारे ३० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मंगळवारपर्यंत ३५ टक्के भरलेले होते. गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंत त्याने ६८ टक्क्यांची पातळी गाठली होती. अरुणावती व पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या राणीधानोरा, कवठाबाजार, कोसदनी, मुकींदपूर, साकूर, आसरा या गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. गावात पाणी शिरल्याने दुकाने व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.धरणातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली तर धरणाचे गेट उघडले जातील आणि पूर येऊन आपले गाव बुडेल या धास्तीने अनेक दुकानदार रात्रभर दुकानांच्या छतांवर बसून राहिले. वॉटसअप व सोशल मिडियावरून गावोगावचे नागरिक आपापल्या गावातील स्थिती व फोटो एकमेकांसोबत शेअर करीत होते.शुक्रवारी सकाळी पाण्याचा जोर बराच कमी झाला असल्याने पाणी झपाट्याने ओसरू लागले आहे. पावसानेही उघडीप दिली असून, वाहतूक सुरू झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊस