शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जपानी तंत्रज्ञानाने गणेशवाडीत विहिरी तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:53 IST

जपानी तंत्रज्ञानाच्या रिचार्ज शाप या शास्त्रशुद्ध जलपुनर्भरणाने कळंब तालुक्यातील गणेशवाडी गावातील विहिरी पहिल्याच पावसात तुडुंब भरल्या. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सहाय्याने कोरड्या विहिरींमध्ये जमिनीच्या लेव्हलपर्यंत पाणी साठवून हा अनोखा प्रयोग करण्यात आला.

ठळक मुद्दे‘रिचार्ज शाप’चा प्रयोग : जलपुनर्भरणाच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने ३० फुटांपर्यंत पाणी खेचले

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जपानी तंत्रज्ञानाच्या रिचार्ज शाप या शास्त्रशुद्ध जलपुनर्भरणाने कळंब तालुक्यातील गणेशवाडी गावातील विहिरी पहिल्याच पावसात तुडुंब भरल्या. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सहाय्याने कोरड्या विहिरींमध्ये जमिनीच्या लेव्हलपर्यंत पाणी साठवून हा अनोखा प्रयोग करण्यात आला. यामुळे गावकरी आता सुखावले असून ही पद्धत दुष्काळग्रस्त यवतमाळ जिल्ह्यासाठी फायद्याची ठरणार आहे.कळंब तालुक्यातील गणेशवाडी हे गाव कायमस्वरूपी दुष्काळी. दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय पर्याय नाही. डोंगरमाथ्यावर वसलेल्या या गावातील नागरिक दुष्काळाच्या झळांनी चांगलेच त्रस्त झाले. त्यातच टँकरने पाणी पुरवठा करताना रस्त्याचीही अडचण. अशा या गावात पाणी टंचाई कायम स्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय भूजल सर्वेक्षण विभागाने घेतला. गावातून गेलेल्या नाल्यावर भेगाळलेल्या खडकांचा शोध घेतला. त्याचा अभ्यास करण्यात आला. या खडकाच्या मदतीने गावातील भूजल स्रोतात भर घालणे शक्य होणार असल्याचे निदर्शनास आले. या नाल्यावर १६ रिचार्ज शाप तयार करण्यात आले. त्यामुळे पाण्याची पुनर्भरण झाले. याचा फायदा पहिल्याच पावसात दिसून आला. गावातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या. या विहिरीवरून आता ओलित करून सिंचन करण्याची सुविधाही केली जाणार आहे. जपानी तंत्रज्ञानात पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत खेचण्याचा हा प्रयोग यवतमाळ जिल्ह्यात यशस्वी झाल्याने त्याची अंमलबजावणी इतरही ठिकाणी केली जाणार आहे. तसेच या प्रयोगाची दखलही राज्य शासनाने घेतली आहे.काय आहे ‘रिचार्ज शाप’?रिचार्ज शाप ही जलपुर्नभरणाची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. यामध्ये ३० फुटापर्यंत खोल पाणी नेता येते. हे पाणी वाहून जाणाऱ्या खडकापर्यंत पोहोचविले जाते. यासाठी बोअरवेलचा जाळीदार केसिंग पाईप बसविला जातो. त्या भोवताल दगड आणि वाळू भरली जाते. या केसिंगला झाकण बसविले जाते. त्याला छिद्र असतात. पावसाचे पाणी या छिद्रांमधून थेट जमिनीत खेचले जाते. यामुळे पाणी वाहून न जाता थेट जमिनीत साठविले जाते.रिचार्ज शापने गणेशवाडीचा कायापालट झाला. आज गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहºयावर आनंद दिसत आहे. राज्य शासनाने याची दखल घेतली असून हे काम खर्चिक असले तरी दुष्काळावर मात करणारे आहे.-राजेश सावळेवरिष्ठ भूजल शास्त्रज्ञ, भूजल सर्वेक्षण विभाग.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानWaterपाणी