शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

जपानी तंत्रज्ञानाने गणेशवाडीत विहिरी तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:53 IST

जपानी तंत्रज्ञानाच्या रिचार्ज शाप या शास्त्रशुद्ध जलपुनर्भरणाने कळंब तालुक्यातील गणेशवाडी गावातील विहिरी पहिल्याच पावसात तुडुंब भरल्या. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सहाय्याने कोरड्या विहिरींमध्ये जमिनीच्या लेव्हलपर्यंत पाणी साठवून हा अनोखा प्रयोग करण्यात आला.

ठळक मुद्दे‘रिचार्ज शाप’चा प्रयोग : जलपुनर्भरणाच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने ३० फुटांपर्यंत पाणी खेचले

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जपानी तंत्रज्ञानाच्या रिचार्ज शाप या शास्त्रशुद्ध जलपुनर्भरणाने कळंब तालुक्यातील गणेशवाडी गावातील विहिरी पहिल्याच पावसात तुडुंब भरल्या. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सहाय्याने कोरड्या विहिरींमध्ये जमिनीच्या लेव्हलपर्यंत पाणी साठवून हा अनोखा प्रयोग करण्यात आला. यामुळे गावकरी आता सुखावले असून ही पद्धत दुष्काळग्रस्त यवतमाळ जिल्ह्यासाठी फायद्याची ठरणार आहे.कळंब तालुक्यातील गणेशवाडी हे गाव कायमस्वरूपी दुष्काळी. दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय पर्याय नाही. डोंगरमाथ्यावर वसलेल्या या गावातील नागरिक दुष्काळाच्या झळांनी चांगलेच त्रस्त झाले. त्यातच टँकरने पाणी पुरवठा करताना रस्त्याचीही अडचण. अशा या गावात पाणी टंचाई कायम स्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय भूजल सर्वेक्षण विभागाने घेतला. गावातून गेलेल्या नाल्यावर भेगाळलेल्या खडकांचा शोध घेतला. त्याचा अभ्यास करण्यात आला. या खडकाच्या मदतीने गावातील भूजल स्रोतात भर घालणे शक्य होणार असल्याचे निदर्शनास आले. या नाल्यावर १६ रिचार्ज शाप तयार करण्यात आले. त्यामुळे पाण्याची पुनर्भरण झाले. याचा फायदा पहिल्याच पावसात दिसून आला. गावातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या. या विहिरीवरून आता ओलित करून सिंचन करण्याची सुविधाही केली जाणार आहे. जपानी तंत्रज्ञानात पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत खेचण्याचा हा प्रयोग यवतमाळ जिल्ह्यात यशस्वी झाल्याने त्याची अंमलबजावणी इतरही ठिकाणी केली जाणार आहे. तसेच या प्रयोगाची दखलही राज्य शासनाने घेतली आहे.काय आहे ‘रिचार्ज शाप’?रिचार्ज शाप ही जलपुर्नभरणाची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. यामध्ये ३० फुटापर्यंत खोल पाणी नेता येते. हे पाणी वाहून जाणाऱ्या खडकापर्यंत पोहोचविले जाते. यासाठी बोअरवेलचा जाळीदार केसिंग पाईप बसविला जातो. त्या भोवताल दगड आणि वाळू भरली जाते. या केसिंगला झाकण बसविले जाते. त्याला छिद्र असतात. पावसाचे पाणी या छिद्रांमधून थेट जमिनीत खेचले जाते. यामुळे पाणी वाहून न जाता थेट जमिनीत साठविले जाते.रिचार्ज शापने गणेशवाडीचा कायापालट झाला. आज गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहºयावर आनंद दिसत आहे. राज्य शासनाने याची दखल घेतली असून हे काम खर्चिक असले तरी दुष्काळावर मात करणारे आहे.-राजेश सावळेवरिष्ठ भूजल शास्त्रज्ञ, भूजल सर्वेक्षण विभाग.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानWaterपाणी