शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

जपानी तंत्रज्ञानाने गणेशवाडीत विहिरी तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:53 IST

जपानी तंत्रज्ञानाच्या रिचार्ज शाप या शास्त्रशुद्ध जलपुनर्भरणाने कळंब तालुक्यातील गणेशवाडी गावातील विहिरी पहिल्याच पावसात तुडुंब भरल्या. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सहाय्याने कोरड्या विहिरींमध्ये जमिनीच्या लेव्हलपर्यंत पाणी साठवून हा अनोखा प्रयोग करण्यात आला.

ठळक मुद्दे‘रिचार्ज शाप’चा प्रयोग : जलपुनर्भरणाच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने ३० फुटांपर्यंत पाणी खेचले

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जपानी तंत्रज्ञानाच्या रिचार्ज शाप या शास्त्रशुद्ध जलपुनर्भरणाने कळंब तालुक्यातील गणेशवाडी गावातील विहिरी पहिल्याच पावसात तुडुंब भरल्या. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सहाय्याने कोरड्या विहिरींमध्ये जमिनीच्या लेव्हलपर्यंत पाणी साठवून हा अनोखा प्रयोग करण्यात आला. यामुळे गावकरी आता सुखावले असून ही पद्धत दुष्काळग्रस्त यवतमाळ जिल्ह्यासाठी फायद्याची ठरणार आहे.कळंब तालुक्यातील गणेशवाडी हे गाव कायमस्वरूपी दुष्काळी. दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय पर्याय नाही. डोंगरमाथ्यावर वसलेल्या या गावातील नागरिक दुष्काळाच्या झळांनी चांगलेच त्रस्त झाले. त्यातच टँकरने पाणी पुरवठा करताना रस्त्याचीही अडचण. अशा या गावात पाणी टंचाई कायम स्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय भूजल सर्वेक्षण विभागाने घेतला. गावातून गेलेल्या नाल्यावर भेगाळलेल्या खडकांचा शोध घेतला. त्याचा अभ्यास करण्यात आला. या खडकाच्या मदतीने गावातील भूजल स्रोतात भर घालणे शक्य होणार असल्याचे निदर्शनास आले. या नाल्यावर १६ रिचार्ज शाप तयार करण्यात आले. त्यामुळे पाण्याची पुनर्भरण झाले. याचा फायदा पहिल्याच पावसात दिसून आला. गावातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या. या विहिरीवरून आता ओलित करून सिंचन करण्याची सुविधाही केली जाणार आहे. जपानी तंत्रज्ञानात पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत खेचण्याचा हा प्रयोग यवतमाळ जिल्ह्यात यशस्वी झाल्याने त्याची अंमलबजावणी इतरही ठिकाणी केली जाणार आहे. तसेच या प्रयोगाची दखलही राज्य शासनाने घेतली आहे.काय आहे ‘रिचार्ज शाप’?रिचार्ज शाप ही जलपुर्नभरणाची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. यामध्ये ३० फुटापर्यंत खोल पाणी नेता येते. हे पाणी वाहून जाणाऱ्या खडकापर्यंत पोहोचविले जाते. यासाठी बोअरवेलचा जाळीदार केसिंग पाईप बसविला जातो. त्या भोवताल दगड आणि वाळू भरली जाते. या केसिंगला झाकण बसविले जाते. त्याला छिद्र असतात. पावसाचे पाणी या छिद्रांमधून थेट जमिनीत खेचले जाते. यामुळे पाणी वाहून न जाता थेट जमिनीत साठविले जाते.रिचार्ज शापने गणेशवाडीचा कायापालट झाला. आज गावातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहºयावर आनंद दिसत आहे. राज्य शासनाने याची दखल घेतली असून हे काम खर्चिक असले तरी दुष्काळावर मात करणारे आहे.-राजेश सावळेवरिष्ठ भूजल शास्त्रज्ञ, भूजल सर्वेक्षण विभाग.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानWaterपाणी