शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

दोन घासाच्या शोधात मृत्यूनेच घेतला घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 21:46 IST

गावात हाताला काम मिळत नाही, पोटाला दोन घास मिळत नाही, म्हणून मजूर परजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. काही जणांना रोजीरोटी मिळते. पण काही जणांना तेथूनही रिकाम्या हाताने परतावे लागते.

ठळक मुद्देमहागाव-वणीच्या ११ मजुरांचा चंद्रपुरात मृत्यू : गंभीर अपघाताची माहिती मिळाल्यावरही प्रशासन सुस्तच

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव/वणी : गावात हाताला काम मिळत नाही, पोटाला दोन घास मिळत नाही, म्हणून मजूर परजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. काही जणांना रोजीरोटी मिळते. पण काही जणांना तेथूनही रिकाम्या हाताने परतावे लागते. अशाच बेरोजगारांचा एक जत्था चंद्रपुरात गेला होता. तेथून परतताना या भुकेल्यांचा शनिवारी रात्री मृत्यूनेच घास घेतला. मृत्यू तर क्रूर ठरलाच, पण त्याहूनही बेमुर्वत ठरले स्थानिक प्रशासन. मजुरांच्या मृत्यूनंतरही माळवागदची वास्तपूस्त करण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही.या अपघातात महागाव तालुक्यातील माळवागदचे चार, उटीचा एक, वणीचे सहा अशा ११ जणांचा मृत्यू झाला. महागाव तालुक्यातील पाचही मृतक एकाच कुटुंबातील आहेत. अमोल दगडू हटकर, वनिता गजानन नवघरे, कुसूम अशोक हटकर, क्रिश अशोक हटकर (लहान मुलगा) सर्व रा. माळवागद, गजानन कोंडबा नवघरे रा. उटी, चंंद्रपुरातील शोभा सुभाष निब्रड (५५), पार्वतीबाई कैलास गेडाम (४५), छाया दादाजी लोहकरे (४०), हातूनबी हमीद खॉ पठाण (३५), संगीता दिनेश टेकाम (३८) रा. रंगनाथनगर, सुजित बाळू डवरे (३५) रा. लालगुडा यांचा मृत्यू झाला.‘लोकमत’चे महागाव प्रतिनिधी माळवागद गावात पोहोचले असता गावात अत्यंत शोकाकूल स्थिती आढळली. या गावातील अनेक जण रोजगारासाठी परगावी गेलेले आहेत. चंद्रपुरात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच माळवागद येथील विठ्ठल गव्हाणे, रवी कांबळे यांनी रातोरात गावकऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले. अपघाताची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरही प्रशासन मात्र जराही हलले नाही.कोरपना येथील विदर्भ कॉटन जिनिंगमध्ये काम मिळेल, या आशेने महागाव तालुक्यातील मजूरवर्ग गेला होता. तर वणी परिसरातील जिनिंगमध्ये कापसाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे येथील मजूरही एका कंत्राटदारामार्फत चंद्रपूर जिल्ह्यात मजुरीसाठी गेले होते. मात्र काम उपलब्ध नसल्याने ही मंडळी एमएच २९ टी ८५८२ क्रमांकाच्या वाहनाने स्वगावी परत येत होती. विरुद्ध दिशेने भरधाव येणाºया एमएच २९ ई १६८३ क्रमांकाच्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक अनियंत्रित होऊन मजुरांच्या वाहनावर धडकला.अपघाताचे वृत्त कळताच विदर्भभरात हळहळ व्यक्त होत असताना स्थानिक प्रशासनात मात्र कमालीची उदासीनता पाहायला मिळाली. घटनेची माहिती मिळूनही प्रशासनाने त्याबद्दल जराही खातरजमा केली नाही. रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत माळवागदला कोणताही अधिकारी, कर्मचारी फिरकला नव्हता. प्रशासनाचे कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे पाहून गावकºयांनी संताप व्यक्त केला.माळवागद येथे एकाच चितेवर मुखाग्नीमाळवागद येथील चौघांचे मृतदेह दुपारी चंद्रपुरातून गावात पोहोचले. माळवागदच्या तळ्याच्या पायथ्याशी सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. चौघांनाही एकाच चितेवर अशोक हटकर यांनी मुखाग्नी दिला. यावेळी गोपाळ समाज हित महासंघ प्रभाकर तपासे, जिल्हाध्यक्ष रमेश महाजन, ययाती नाईक, गुलाबराव जाधव, अब्दूल वहाब, अशोक जाधव, नामदेवराव जाधव, नरेंद्र जाधव, मोहन चव्हाण, सरपंच मधुकर राठोड, कान्हा चव्हाण, विठ्ठल गव्हाणे, रवी कांबळे उपस्थित होते. तर उटी येथील मृतक गजानन नवघरे यांचा मृतदेह सायंकाळपर्यंत गावात पोहचायचा होता.पाच जणांच्या मृत्यूने वणी शहर हळहळलेया भीषण अपघातात वणीच्या रंगनाथनगरातील पाच महिलांचा बळी गेला. तर लालगुडा परिसरातील इसमही दगावला. अपघाताची माहिती शनिवारी रात्री १२ वाजता मिळताच संपूर्ण वार्ड जागा झाला. मिळेल त्या वाहनाने अनेक जण चंद्रपूर जिल्ह्यातील घटनास्थळाकडे रवाना झाले. रविवारी दुपारी २ वाजता मृतदेह वणीत पोहोचले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत रंगनाथनगरातून एकामागून एक अंत्ययात्रा निघाल्या. हे दृश्य बघून वणी शहरवासीयांचे काळीज हेलावले.

टॅग्स :Accidentअपघात