शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दोन घासाच्या शोधात मृत्यूनेच घेतला घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 21:46 IST

गावात हाताला काम मिळत नाही, पोटाला दोन घास मिळत नाही, म्हणून मजूर परजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. काही जणांना रोजीरोटी मिळते. पण काही जणांना तेथूनही रिकाम्या हाताने परतावे लागते.

ठळक मुद्देमहागाव-वणीच्या ११ मजुरांचा चंद्रपुरात मृत्यू : गंभीर अपघाताची माहिती मिळाल्यावरही प्रशासन सुस्तच

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव/वणी : गावात हाताला काम मिळत नाही, पोटाला दोन घास मिळत नाही, म्हणून मजूर परजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. काही जणांना रोजीरोटी मिळते. पण काही जणांना तेथूनही रिकाम्या हाताने परतावे लागते. अशाच बेरोजगारांचा एक जत्था चंद्रपुरात गेला होता. तेथून परतताना या भुकेल्यांचा शनिवारी रात्री मृत्यूनेच घास घेतला. मृत्यू तर क्रूर ठरलाच, पण त्याहूनही बेमुर्वत ठरले स्थानिक प्रशासन. मजुरांच्या मृत्यूनंतरही माळवागदची वास्तपूस्त करण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही.या अपघातात महागाव तालुक्यातील माळवागदचे चार, उटीचा एक, वणीचे सहा अशा ११ जणांचा मृत्यू झाला. महागाव तालुक्यातील पाचही मृतक एकाच कुटुंबातील आहेत. अमोल दगडू हटकर, वनिता गजानन नवघरे, कुसूम अशोक हटकर, क्रिश अशोक हटकर (लहान मुलगा) सर्व रा. माळवागद, गजानन कोंडबा नवघरे रा. उटी, चंंद्रपुरातील शोभा सुभाष निब्रड (५५), पार्वतीबाई कैलास गेडाम (४५), छाया दादाजी लोहकरे (४०), हातूनबी हमीद खॉ पठाण (३५), संगीता दिनेश टेकाम (३८) रा. रंगनाथनगर, सुजित बाळू डवरे (३५) रा. लालगुडा यांचा मृत्यू झाला.‘लोकमत’चे महागाव प्रतिनिधी माळवागद गावात पोहोचले असता गावात अत्यंत शोकाकूल स्थिती आढळली. या गावातील अनेक जण रोजगारासाठी परगावी गेलेले आहेत. चंद्रपुरात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच माळवागद येथील विठ्ठल गव्हाणे, रवी कांबळे यांनी रातोरात गावकऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले. अपघाताची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरही प्रशासन मात्र जराही हलले नाही.कोरपना येथील विदर्भ कॉटन जिनिंगमध्ये काम मिळेल, या आशेने महागाव तालुक्यातील मजूरवर्ग गेला होता. तर वणी परिसरातील जिनिंगमध्ये कापसाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे येथील मजूरही एका कंत्राटदारामार्फत चंद्रपूर जिल्ह्यात मजुरीसाठी गेले होते. मात्र काम उपलब्ध नसल्याने ही मंडळी एमएच २९ टी ८५८२ क्रमांकाच्या वाहनाने स्वगावी परत येत होती. विरुद्ध दिशेने भरधाव येणाºया एमएच २९ ई १६८३ क्रमांकाच्या ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक अनियंत्रित होऊन मजुरांच्या वाहनावर धडकला.अपघाताचे वृत्त कळताच विदर्भभरात हळहळ व्यक्त होत असताना स्थानिक प्रशासनात मात्र कमालीची उदासीनता पाहायला मिळाली. घटनेची माहिती मिळूनही प्रशासनाने त्याबद्दल जराही खातरजमा केली नाही. रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत माळवागदला कोणताही अधिकारी, कर्मचारी फिरकला नव्हता. प्रशासनाचे कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे पाहून गावकºयांनी संताप व्यक्त केला.माळवागद येथे एकाच चितेवर मुखाग्नीमाळवागद येथील चौघांचे मृतदेह दुपारी चंद्रपुरातून गावात पोहोचले. माळवागदच्या तळ्याच्या पायथ्याशी सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. चौघांनाही एकाच चितेवर अशोक हटकर यांनी मुखाग्नी दिला. यावेळी गोपाळ समाज हित महासंघ प्रभाकर तपासे, जिल्हाध्यक्ष रमेश महाजन, ययाती नाईक, गुलाबराव जाधव, अब्दूल वहाब, अशोक जाधव, नामदेवराव जाधव, नरेंद्र जाधव, मोहन चव्हाण, सरपंच मधुकर राठोड, कान्हा चव्हाण, विठ्ठल गव्हाणे, रवी कांबळे उपस्थित होते. तर उटी येथील मृतक गजानन नवघरे यांचा मृतदेह सायंकाळपर्यंत गावात पोहचायचा होता.पाच जणांच्या मृत्यूने वणी शहर हळहळलेया भीषण अपघातात वणीच्या रंगनाथनगरातील पाच महिलांचा बळी गेला. तर लालगुडा परिसरातील इसमही दगावला. अपघाताची माहिती शनिवारी रात्री १२ वाजता मिळताच संपूर्ण वार्ड जागा झाला. मिळेल त्या वाहनाने अनेक जण चंद्रपूर जिल्ह्यातील घटनास्थळाकडे रवाना झाले. रविवारी दुपारी २ वाजता मृतदेह वणीत पोहोचले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत रंगनाथनगरातून एकामागून एक अंत्ययात्रा निघाल्या. हे दृश्य बघून वणी शहरवासीयांचे काळीज हेलावले.

टॅग्स :Accidentअपघात