शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गोखीवरून आता टँकरने आणणार टाकीपर्यंत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:26 IST

बेंबळाला तातडीचा पर्याय म्हणून लगतच्या गोखी धरणावरून शहरातील प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकली गेली. परंतु वारंवार प्रयत्न करूनही आता कुठे जेमतेम यश मिळते आहे. तर दुसरीकडे गोधनी रोड स्थित जीवन प्राधिकरणाच्या आवारातील टाकीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी टँकरची मदत घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देशिर्डीवरून बोलाविले १२ टँकर : प्रत्येकी ३५ हजार लिटर क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळाला तातडीचा पर्याय म्हणून लगतच्या गोखी धरणावरून शहरातील प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकली गेली. परंतु वारंवार प्रयत्न करूनही आता कुठे जेमतेम यश मिळते आहे. तर दुसरीकडे गोधनी रोड स्थित जीवन प्राधिकरणाच्या आवारातील टाकीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी टँकरची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येकी ३५ हजार लिटर क्षमतेचे १२ टँकर शिर्डीवरून बोलाविण्यात येत आहे. त्याद्वारे गोखी धरणातून या टाकीपर्यंत पाणी आणले जाणार आहे. तूर्त दोन टँकर शहरात दाखल झाले.यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारा चापडोह प्रकल्प कोरडा पडला. निळोणाही कोणत्याही क्षणी दगा देऊ शकतो. यामुळे शहराच्या ६० टक्के भागात भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने मोठ्या पाणी क्षमतेचे टँकर बोलाविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार १२ टँकर यवतमाळ शहरात येणार आहे. ३५ हजार लिटर क्षमता असलेले दोन टँकर बुधवारी यवतमाळात दाखल झाले आहे. या टँकरच्या माध्यमातून एमआयडीसी परिसरातील गोखी प्रकल्पाच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी उचलण्यात येईल. सदर पाणी जीवन प्राधिकरण कार्यालयातील आणि गोधनी क्षेत्रातील सममध्ये सोडले जाणार आहे. त्यानंतर पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून या पाण्याचे शहरात वितरण केले जाणार आहे.निळोणा धरणात खोदल्या बोअरवेलनिळोणा धरणाच्या क्षेत्रात तीन बोअरवेल खोदण्यात आल्या आहे. या बोअरवेलला मुबलक पाणी लागले असून तासी दहा हजार लिटर पाणी यातून उपसणे शक्य होणार आहे. या ठिकणावरूनही अधिक क्षमतेचे टँकर भरले जाणार आहे. तसेच निळोणा क्षेत्रात आणखी दोन बोअरवेल खोदण्यात येणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई