शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जलयुक्त शिवारला घोटाळ्याने माखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:44 IST

राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेतील सीमेंट नाला बांध खोलीकरणाच्या कामात मागील दोन-तीन वर्षांपूर्वी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठे घोटाळे केले. यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यात झालेल्या या घोटाळ्याची चौकशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला व त्यांच्या समितीने केली होती.

ठळक मुद्देसात तालुक्यात घोळ : संथगतीच्या कारवाईने कृषी विभागावर संशयाची सूई

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेतील सीमेंट नाला बांध खोलीकरणाच्या कामात मागील दोन-तीन वर्षांपूर्वी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठे घोटाळे केले. यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यात झालेल्या या घोटाळ्याची चौकशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला व त्यांच्या समितीने केली होती. समितीने आपला अहवाल मार्च २०१८ मध्ये अमरावती विभागीय कृषी सहसंचालकांना सादर केला आहे.एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही या प्रकरणात संबंधित दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे कृषी विभागच संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर अधिकारी संथगतीने कारवाई करून कालापव्यय करीत राहिल्याने जनतेत वेगळा संदेश गेला आहे. यात गुंतलेल्या काही संशयित कर्मचाऱ्यांवर चांगलाच ताण वाढला आहे.सचिंद्र प्रताप सिंह कृषी आयुक्त झाल्यानंतर त्यांच्यासमोर हे प्रकरण आले. योगायोगाने ते यवतमाळचे जिल्हाधिकारी असतानाच्या काळात यवतमाळ जिल्ह्यात जलयुक्तची ही कामे झालेली होती. त्यामुळे कृषी विभागाच्या काम करण्याच्या ‘पद्धती’विषयी त्यांना चांगलीच माहिती होती. मात्र त्यांच्या काळात याप्रकरणी करावयाच्या कारवाईला वेग आलेला नाही. त्यांच्या बदलीनंतर आता दोन महिन्यांपूर्वी रुजू झालेले नवे कृषी आयुक्त सुहास दिवसे हे या प्रकरणी कोणती कारवाई, किती वेगाने करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तांत्रिकदृष्ट्या चुकीची कामेयवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, नेर, आर्णी, बाभूळगाव, कळंब, घाटंजी, राळेगाव या सात तालुक्यात जलयुक्त शिवार, सीमेंट नाला बांध खोलीकरण आदी कामात दोन-तीन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. काही कृषी अधिकाºयांनी तांत्रिकदृष्ट्या चुकीची कामे केली. त्यामुळे जलसंधारण होण्याऐवजी भूगर्भातील जलसाठ्यावर अनिष्ठ परिणाम झाला. चुकीच्या कामामुळे नदीपात्रातील जैवसृष्टी व नदी परिसंस्था विस्कळीत झाला, असा धक्कादायक निष्कर्ष चौकशीतून काढण्यात आला आहे. अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला होता. मात्र त्यांना तपास करण्यापासून रोखण्याचे प्रयत्न झाले होते. चौकशीसाठी आवश्यक ते रेकॉर्ड, कागदपत्र उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. यावरून अशा प्रकारचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट होते.बीडमध्ये कारवाई यवतमाळात का नाही ?जलयुक्त शिवार अभियानास सुरूंग लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर बीड जिल्ह्यात कारवाई करण्यात आली. यवतमाळमध्ये का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कामात अनियमितता, कामे न करताच काढण्यात आलेल्या एमबी याप्रकरणी तब्बल २४ कृषी अधिकाऱ्यांवर चौकशीअंती गुन्हे दाखल झाले होते. तेथे अवघ्या दोन महिन्यात चौकशीसह विविध सोपस्कार आटोपण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात मात्र चौकशीत अडथळे व चौकशी अहवालानंतरही यवतमाळ ते पुणे मार्गात कारवाईबाबत चालढकल करून प्रकरण लांबविले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार