शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

अर्ध्या शहराला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 21:33 IST

अर्ध्या अधिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य व्हॉलच गटारात असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपिण्याच्या पाण्याचा व्हॉलच गटारात : प्राधिकरणाचे खापर वीज मंडळ, बांधकामवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अर्ध्या अधिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य व्हॉलच गटारात असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. गटारातील या व्हॉलमधून पिंपळगाव, वाघापूर, वडगाव, दर्डानगर अशा विविध भागाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पहायला मिळत आहे.आर्णी रोड स्थित शिवाजी गार्डन परिसरात हा प्रकार दृष्टीस पडला. गटारात असलेला हा व्हॉल लिकेज असल्याने त्यातून सर्रास घाण पाणी पाईपलाईनद्वारे टाकीमध्ये व तेथून घराघरात पोहोचते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच प्रचंड गटार व त्या भोवती सातत्याने वराहांचा संचार असल्याने पिण्याचे पाणी कोणत्या गुणवत्तेचे घराघरात पोहोचत असेल याची सहज कल्पना येते. याबाबत जीवन प्राधिकरणाकडे जाब विचारला असता त्यांनी थेट विकास कामे करणाऱ्या वीज वितरण कंपनी आणि बांधकाम खात्याकडे बोट दाखवून आपला बचाव करण्याचा केविलवाना प्रयत्न चालविला आहे. असेच अनेक लिकेज येथील गांधी चौक, मेन लाईन व शहराच्या विविध भागात ठिकठिकाणी आहे. त्याबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राधिकरणाकडे तक्रारीही केल्या जातात. परंतु प्राधिकरण त्याबाबत कधीच गांभीर्याने घेत नाही. पर्यायाने शहरातील लिकेज व दूषित पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे.शिवाजीनगर परिसरातील हा व्हॉल गेल्या अनेक महिन्यापासून फुटलेल्या अवस्थेत आहे. या संदर्भात नागरिकांनी जीवन प्राधिकरणाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतरही हा व्हॉल दुरुस्त झाला नाही. यातून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन तेथे डबके साचले आहे. या डबक्यातच परिसरातील सांडपाणी येऊन मिळते. तसेच यात डुकरांचा मुक्त संचार होतो. हेच दूषित पाणी नळावाटे नागरिकांच्या घरात पोहोचते. गेल्या कित्येक दिवसानंतर नळाचे आलेले पाणी नागरिक मोठ्या उत्सुकतेने भरतात. पाण्याचा रंग हिरवट पाहूनही तक्रार करीत नाही. याच पाण्यामुळे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागात हा पाणीपुरवठा होत असल्याने डायरियासारखे आजार पसरण्याची भीती आहे. जीवन प्राधिकरण मात्र दुर्लक्ष करीत आहे.शिवाजीनगर गार्डनजवळील लिकेज व्हॉल दुरुस्तीचे काम जीवन प्राधिकरणाने हाती घेतले आहे. एक-दोन दिवसात काम पूर्ण होईल.- अजय बेले,कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण