शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

अर्ध्या शहराला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 21:33 IST

अर्ध्या अधिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य व्हॉलच गटारात असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपिण्याच्या पाण्याचा व्हॉलच गटारात : प्राधिकरणाचे खापर वीज मंडळ, बांधकामवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अर्ध्या अधिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य व्हॉलच गटारात असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. गटारातील या व्हॉलमधून पिंपळगाव, वाघापूर, वडगाव, दर्डानगर अशा विविध भागाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पहायला मिळत आहे.आर्णी रोड स्थित शिवाजी गार्डन परिसरात हा प्रकार दृष्टीस पडला. गटारात असलेला हा व्हॉल लिकेज असल्याने त्यातून सर्रास घाण पाणी पाईपलाईनद्वारे टाकीमध्ये व तेथून घराघरात पोहोचते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच प्रचंड गटार व त्या भोवती सातत्याने वराहांचा संचार असल्याने पिण्याचे पाणी कोणत्या गुणवत्तेचे घराघरात पोहोचत असेल याची सहज कल्पना येते. याबाबत जीवन प्राधिकरणाकडे जाब विचारला असता त्यांनी थेट विकास कामे करणाऱ्या वीज वितरण कंपनी आणि बांधकाम खात्याकडे बोट दाखवून आपला बचाव करण्याचा केविलवाना प्रयत्न चालविला आहे. असेच अनेक लिकेज येथील गांधी चौक, मेन लाईन व शहराच्या विविध भागात ठिकठिकाणी आहे. त्याबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राधिकरणाकडे तक्रारीही केल्या जातात. परंतु प्राधिकरण त्याबाबत कधीच गांभीर्याने घेत नाही. पर्यायाने शहरातील लिकेज व दूषित पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे.शिवाजीनगर परिसरातील हा व्हॉल गेल्या अनेक महिन्यापासून फुटलेल्या अवस्थेत आहे. या संदर्भात नागरिकांनी जीवन प्राधिकरणाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतरही हा व्हॉल दुरुस्त झाला नाही. यातून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन तेथे डबके साचले आहे. या डबक्यातच परिसरातील सांडपाणी येऊन मिळते. तसेच यात डुकरांचा मुक्त संचार होतो. हेच दूषित पाणी नळावाटे नागरिकांच्या घरात पोहोचते. गेल्या कित्येक दिवसानंतर नळाचे आलेले पाणी नागरिक मोठ्या उत्सुकतेने भरतात. पाण्याचा रंग हिरवट पाहूनही तक्रार करीत नाही. याच पाण्यामुळे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागात हा पाणीपुरवठा होत असल्याने डायरियासारखे आजार पसरण्याची भीती आहे. जीवन प्राधिकरण मात्र दुर्लक्ष करीत आहे.शिवाजीनगर गार्डनजवळील लिकेज व्हॉल दुरुस्तीचे काम जीवन प्राधिकरणाने हाती घेतले आहे. एक-दोन दिवसात काम पूर्ण होईल.- अजय बेले,कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण