शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

पूस धरणातील पाणीसाठा आटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:31 IST

तालुक्याच्या दुर्गम व डोंगरी भागातील वनवार्लाजवळील पूस धरणातील पाणीसाठ दिवसेंदिवस कमी होत आहे. नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे.

ठळक मुद्देगाळ काढण्याची गरज : ४५ वर्षांपासून उपसा नाही, ४0 गावांवर पाणीसंकट

अखिलेश अग्रवाल।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्याच्या दुर्गम व डोंगरी भागातील वनवार्लाजवळील पूस धरणातील पाणीसाठ दिवसेंदिवस कमी होत आहे. नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे. गेल्या ४५ वर्षापासून या धरणातील गाळ न काढल्यामुळे धरणात पाणी कमी अन् गाळ जादा, अशी अवस्था झाली आहे.पुसदपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर वनवार्ला गावाजळ पूस धरण बांधण्यात आले. या धरणाला जवळपास ४५ वर्ष पूर्ण झाले आहे. तालुक्यातील तब्बल ४० गावांना या धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो. पुसद परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पुसद शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या धरणामुळे काही अंशी संपुष्टात आला आहे. पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने धरण भरल्यानंतर हिवाळ्यात धरणातील पाणी नदी पात्रात सोडून ते बंधाऱ्यात अडवून शेती व पिण्यासाठी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र धरणातच पाणी कमी असल्याने नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतकºयांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.यावर्षी सध्याच्या घटकेला धरणात केवळ १२ टक्के पाणीसाठ आहे. सध्या पुसदकरांना पालिका प्रशासन तीन दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. यापुढे यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सध्या पूस धरणातील पाणीसाठी कमी झाल्याने धरणामध्ये गाळ किती आहे, ते दिसू लागले आहे. या धरणामध्ये भरमसाठ गाळ साचल्याने आपोआपच त्याची जल साठवण क्षमता कमी झाली आहे. पावसाळ्यात त्यामुळेच कमी पाऊस झाल्यावरदेखील धरण भरण्यास वेळ लागत नाही. परंतु गाळ हा धरण भरण्यातील मुख्य घटक आहे.धरणामधील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी पावसाळा सुरु होण्यापूर्वी हा गाळ काढण्याची गरज आहे. धरणातील गाळाचा उपसा केल्यास जलस्त्रोतांच्या मार्गातील अडथळा दूर होऊन जल साठवण क्षमतेत वाढ होऊ शकते. धरणातून काढण्यात आलेल्या गाळाचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी करता येऊ शकतो. सध्या गाळ काढणे शक्य आहे. गाळ काढल्यास धरणाची जलक्षमता वाढून पुढील काही वर्षे तरी टंचाईपासून पुसदकरांची सुटका होऊ शकते.तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईपुसद शहर व परिसरातील ग्रामीण भागात दोन-तीन महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. सध्या तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला. शहराला पाणी पुरवठा करणाºया उर्ध्व पूस धरणातील पाण्याचा साठ संपत आहे. धरणाची निर्मिती झाल्यापासून या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. येत्या काही वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गाळ उपसावा, अशी मागणी बापू अणे स्मृती प्रतिष्ठानने जिल्हाधिकाºयांकडे केली.

टॅग्स :Damधरण