शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पूस धरणातील पाणीसाठा आटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:31 IST

तालुक्याच्या दुर्गम व डोंगरी भागातील वनवार्लाजवळील पूस धरणातील पाणीसाठ दिवसेंदिवस कमी होत आहे. नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे.

ठळक मुद्देगाळ काढण्याची गरज : ४५ वर्षांपासून उपसा नाही, ४0 गावांवर पाणीसंकट

अखिलेश अग्रवाल।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्याच्या दुर्गम व डोंगरी भागातील वनवार्लाजवळील पूस धरणातील पाणीसाठ दिवसेंदिवस कमी होत आहे. नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचू लागली आहे. गेल्या ४५ वर्षापासून या धरणातील गाळ न काढल्यामुळे धरणात पाणी कमी अन् गाळ जादा, अशी अवस्था झाली आहे.पुसदपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर वनवार्ला गावाजळ पूस धरण बांधण्यात आले. या धरणाला जवळपास ४५ वर्ष पूर्ण झाले आहे. तालुक्यातील तब्बल ४० गावांना या धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो. पुसद परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पुसद शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या धरणामुळे काही अंशी संपुष्टात आला आहे. पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने धरण भरल्यानंतर हिवाळ्यात धरणातील पाणी नदी पात्रात सोडून ते बंधाऱ्यात अडवून शेती व पिण्यासाठी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र धरणातच पाणी कमी असल्याने नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतकºयांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.यावर्षी सध्याच्या घटकेला धरणात केवळ १२ टक्के पाणीसाठ आहे. सध्या पुसदकरांना पालिका प्रशासन तीन दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. यापुढे यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सध्या पूस धरणातील पाणीसाठी कमी झाल्याने धरणामध्ये गाळ किती आहे, ते दिसू लागले आहे. या धरणामध्ये भरमसाठ गाळ साचल्याने आपोआपच त्याची जल साठवण क्षमता कमी झाली आहे. पावसाळ्यात त्यामुळेच कमी पाऊस झाल्यावरदेखील धरण भरण्यास वेळ लागत नाही. परंतु गाळ हा धरण भरण्यातील मुख्य घटक आहे.धरणामधील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी पावसाळा सुरु होण्यापूर्वी हा गाळ काढण्याची गरज आहे. धरणातील गाळाचा उपसा केल्यास जलस्त्रोतांच्या मार्गातील अडथळा दूर होऊन जल साठवण क्षमतेत वाढ होऊ शकते. धरणातून काढण्यात आलेल्या गाळाचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी करता येऊ शकतो. सध्या गाळ काढणे शक्य आहे. गाळ काढल्यास धरणाची जलक्षमता वाढून पुढील काही वर्षे तरी टंचाईपासून पुसदकरांची सुटका होऊ शकते.तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईपुसद शहर व परिसरातील ग्रामीण भागात दोन-तीन महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. सध्या तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला. शहराला पाणी पुरवठा करणाºया उर्ध्व पूस धरणातील पाण्याचा साठ संपत आहे. धरणाची निर्मिती झाल्यापासून या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. येत्या काही वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गाळ उपसावा, अशी मागणी बापू अणे स्मृती प्रतिष्ठानने जिल्हाधिकाºयांकडे केली.

टॅग्स :Damधरण