शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई उपाययोजना शून्य

By admin | Updated: May 17, 2017 00:50 IST

पावसाळा १५ दिवसांवर येऊन ठेपला तरी, पाणीटंचाई उपाययोजना शून्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या

पावसाळा तोंडावर : ४० विहिरी अधिग्रहित, पाच टँकर सुरू लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पावसाळा १५ दिवसांवर येऊन ठेपला तरी, पाणीटंचाई उपाययोजना शून्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरून ग्रामपंचायतींना धारेवर धरल्याने उपाययोजनांचे बिंग फुटले. केवळ विहीर अधिग्रहण आणि टँकर सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी बहाल केली आहे. उन्हाच्या झळा वाढताच भूजल पातळी खालावली. परिणामी मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र झाली. टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेने कृती आराखडा सादर केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आधी चौदाव्या वित्त आयोगातील निधीचा हिशेब सादर करण्याचे आदेश देताच या उपाययोजनांची पोलखोल झाली. चौदाव्या वित्त आयोगातून प्राधान्याने पाणी टंचाई निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची कोणत्याच ग्रामपंचायतींनी घेतली नसल्याचे यातून उघड झाले. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा हिशेब मागिल्याने उपाययोजनांमधील नळ आणि पाणी पुरवठ्याची कामे रखडली. यामुळे आता मे महिन्यात नागरिकांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी टंचाई निवारणासाठी तीन कोटी सात लाख ४० हजार रूपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र या निधीतून केवळ विहीर अधिग्रहीत करणे आणि टँकर सुरू करण्यासच त्यांनी परवानगी दिली. विशेष नळ योजना दुरूस्ती आणि तात्पुरत्या पूरक नळ योजनांवर निधी खर्च करण्यास मंजूरी नाकारली. नळ योजना विशेष दुरूस्ती आणि तात्पुरत्या पूरक नळ योजनेसाठी तांत्रिक मंजुरीसह प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते. हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले. आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी पंचायतच्या उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून विशेष दुरूस्ती आणि तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या कामांसाठी ग्रामपंचायतींना निर्देश देऊन निधी उपलब्ध करून देण्याची गळ घातली आहे. पावसाळा सुरू होण्यास आता जेमतेम १५ दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसांत खरच ही कामे पूर्ण होतील, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. आराखड्याला दोन कोटींची कात्री ४पाणीटंचाई निवारणासाठी तीन कोटी सात लाख ४० हजारांचा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र त्यातील नळ योजनेची विशेष दुरूस्ती व तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या एक कोटी ९४ लाख रूपयांच्या खर्चावर बंधन घातले गेले. त्यामुळे हा निधी वाचणार आहे. अत्यावश्यक ठिकाणीच टँकर गेल्यावर्षी जिल्ह्यात ११० टक्के पाऊस झाला. जलयुक्तची कामे झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक ठिकाणीच टँकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. परिणामी केवळ चार तालुक्यांनी टँकरचे प्रस्ताव सादर केले. यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ४० विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून केवळ केवळ पाचच टँकर सुरू करण्यात आले आहे.