शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
2
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
3
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
4
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
5
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
6
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
7
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
8
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
9
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
10
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
11
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
12
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
13
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
14
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
15
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
16
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
17
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
18
PHOTOS: लग्नाच्या रोमान्सनंतर थेट टेनिस कोर्टवर... ४५ वर्षांची व्हीनस विल्यम्स रचणार इतिहास
19
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
20
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:03 IST

तालुक्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेने कमी पाऊस पडला. परतीच्या पावसाने थोडी भर घातली असली तरी कोणताही पाऊस सार्वत्रिक पडला नाही.

ठळक मुद्देअत्यल्प पाऊस : ५९ गावांतील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेने कमी पाऊस पडला. परतीच्या पावसाने थोडी भर घातली असली तरी कोणताही पाऊस सार्वत्रिक पडला नाही. त्यामुळे प्रकल्पांची वाईट अवस्था आहे. अडाणसह नदी-नाले कोरडे पडले असून शहर व ग्रामीण भागावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.जून, जुलै या महत्वाच्या महिन्यात ३२० मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर २१७ मिमीची भर पडली तरी पाऊस तुरळक पडला. त्यामुळे तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हसबी प्रकल्पात केवळ २५ टक्केच जलसाठा होऊ शकला. प्रकल्पाचे पाणी नदीत न सोडल्याने अडाण कोरडी पडली. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. त्याच बरोबर ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे तलाव, सार्वजनिक, खासगी विहिरी, आटल्यामुळे आतापासूनच टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दारव्हा तालुक्यात यावर्षी ५३७ मिमी पावसाची नोंद झाली. परंतु एकही पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा पडला नाही. जून, जुलै सारख्या महिन्यात तुषार सिंचनासारख्या धारा बरसल्या. एकही झळ अनुभवता आली नाही. यावर्षी दमदार पावसाची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी एकाही प्रकल्प, तलावांना पातळी गाठता आली नाही. सर्वात मोठ्या म्हसनी प्रकल्पात केवळ २२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. कुंभारकिन्ही, गोखी, अंतरगाव या प्रकल्पाचीसुद्धा वाईट अवस्था आहे. सिंचन, पाझर तलाव, नदी, नाले कोरडे पडले आहे. सार्वजनिक खासगी विहिरी, हँडपंप आदींची पातळी कमी झाल्याने तळ गाठला आहे. अर्ध्याअधिक शहराला पाणीपुरवठा करणारी नगरपरिषदेची पेकर्डा पाणीपुरवठा योजना अडाण नदी अटल्यामुळे बंद पडली आहे. त्यामुळे अरुणावती प्रकल्पावरून नवीन वसाहत, रेल्वे स्टेशन परिसर, मुंगसाजी मंदिर रोड, उत्तरेश्वर चौक, बाराभाई मोहल्ला, मल्लिकार्जुन मंदिर रोड तर कुपटी योजनेवरून नातूवाडी, राम मंदिर परिसर, गणपती मंदिर, तेलीपुरा, अंबादेवी मंदिर परिसर, टिळकवाडी, दत्तनगर, भुरेखानगर, खाटीकपुरा, गवळीपुरा आदी भागात तीन-चार दिवसाआड पाणी सोडण्यात येत असल्याचे नगरपरिषदेच्यावतीने सांगण्यात आले. परंतु पुढे सात-आठ महिने बाकी आहे. कुंभारकिन्ही प्रकल्पाचे पाणी संपले तर शहरात भीषण स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापासूनच पर्यायी उपाययोजना शोधाव्या लागणार आहे. शहरासोबतच ग्रामीणमधील जवळपास ५९ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. काही गावातील नळ योजना तलाव विहिरीतील पाण्याची पातळी घटल्याने प्रभावित झाला आहे. हँडपंप बंद पडले आहे. सध्या हिवाळ्यात ही स्थिती असून उन्हाळ्याचे चार महिने कसे होईल याची चिंता सर्वांना लागली आहे.पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्नयावर्षी दारव्हा तालुक्यात कमी पाऊस पडल्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते. कोणत्या गावात पाणी समस्या उद्भवू शकते याची माहिती घेण्यात आली आहे. त्यासंबंधीचा कृती आराखडा तयार करून कामे केले जातील. यावर्षी भीषण स्थिती असली तरी पाणीटंचाईवर मात करण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे पंचायत समिती सभापती उषाताई प्रेमसिंग चव्हाण यांनी सांगितले.पेकर्डा पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने पूर्ण भार अरुणावती व कुपटी योजनेवर आहे. अरुणावती योजनेची अडचण नाही. परंतु कुंभारकिन्ही प्रकल्पाचे पाणी बंद झाल्यास समस्या उद्भवू नये याकरिता कुपटी योजनेजवळ बोअर मारण्यात येणार आहे. त्यामुळे मुबलक पाणी मिळेल व कोणतीही अडचण जाणार नाही.- आरिफ काजी,सभापती, पाणीपुरवठा नगरपरिषद.