शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

दारव्हा तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:03 IST

तालुक्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेने कमी पाऊस पडला. परतीच्या पावसाने थोडी भर घातली असली तरी कोणताही पाऊस सार्वत्रिक पडला नाही.

ठळक मुद्देअत्यल्प पाऊस : ५९ गावांतील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेने कमी पाऊस पडला. परतीच्या पावसाने थोडी भर घातली असली तरी कोणताही पाऊस सार्वत्रिक पडला नाही. त्यामुळे प्रकल्पांची वाईट अवस्था आहे. अडाणसह नदी-नाले कोरडे पडले असून शहर व ग्रामीण भागावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.जून, जुलै या महत्वाच्या महिन्यात ३२० मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर २१७ मिमीची भर पडली तरी पाऊस तुरळक पडला. त्यामुळे तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हसबी प्रकल्पात केवळ २५ टक्केच जलसाठा होऊ शकला. प्रकल्पाचे पाणी नदीत न सोडल्याने अडाण कोरडी पडली. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. त्याच बरोबर ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे तलाव, सार्वजनिक, खासगी विहिरी, आटल्यामुळे आतापासूनच टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दारव्हा तालुक्यात यावर्षी ५३७ मिमी पावसाची नोंद झाली. परंतु एकही पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा पडला नाही. जून, जुलै सारख्या महिन्यात तुषार सिंचनासारख्या धारा बरसल्या. एकही झळ अनुभवता आली नाही. यावर्षी दमदार पावसाची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी एकाही प्रकल्प, तलावांना पातळी गाठता आली नाही. सर्वात मोठ्या म्हसनी प्रकल्पात केवळ २२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. कुंभारकिन्ही, गोखी, अंतरगाव या प्रकल्पाचीसुद्धा वाईट अवस्था आहे. सिंचन, पाझर तलाव, नदी, नाले कोरडे पडले आहे. सार्वजनिक खासगी विहिरी, हँडपंप आदींची पातळी कमी झाल्याने तळ गाठला आहे. अर्ध्याअधिक शहराला पाणीपुरवठा करणारी नगरपरिषदेची पेकर्डा पाणीपुरवठा योजना अडाण नदी अटल्यामुळे बंद पडली आहे. त्यामुळे अरुणावती प्रकल्पावरून नवीन वसाहत, रेल्वे स्टेशन परिसर, मुंगसाजी मंदिर रोड, उत्तरेश्वर चौक, बाराभाई मोहल्ला, मल्लिकार्जुन मंदिर रोड तर कुपटी योजनेवरून नातूवाडी, राम मंदिर परिसर, गणपती मंदिर, तेलीपुरा, अंबादेवी मंदिर परिसर, टिळकवाडी, दत्तनगर, भुरेखानगर, खाटीकपुरा, गवळीपुरा आदी भागात तीन-चार दिवसाआड पाणी सोडण्यात येत असल्याचे नगरपरिषदेच्यावतीने सांगण्यात आले. परंतु पुढे सात-आठ महिने बाकी आहे. कुंभारकिन्ही प्रकल्पाचे पाणी संपले तर शहरात भीषण स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापासूनच पर्यायी उपाययोजना शोधाव्या लागणार आहे. शहरासोबतच ग्रामीणमधील जवळपास ५९ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. काही गावातील नळ योजना तलाव विहिरीतील पाण्याची पातळी घटल्याने प्रभावित झाला आहे. हँडपंप बंद पडले आहे. सध्या हिवाळ्यात ही स्थिती असून उन्हाळ्याचे चार महिने कसे होईल याची चिंता सर्वांना लागली आहे.पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्नयावर्षी दारव्हा तालुक्यात कमी पाऊस पडल्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते. कोणत्या गावात पाणी समस्या उद्भवू शकते याची माहिती घेण्यात आली आहे. त्यासंबंधीचा कृती आराखडा तयार करून कामे केले जातील. यावर्षी भीषण स्थिती असली तरी पाणीटंचाईवर मात करण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे पंचायत समिती सभापती उषाताई प्रेमसिंग चव्हाण यांनी सांगितले.पेकर्डा पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने पूर्ण भार अरुणावती व कुपटी योजनेवर आहे. अरुणावती योजनेची अडचण नाही. परंतु कुंभारकिन्ही प्रकल्पाचे पाणी बंद झाल्यास समस्या उद्भवू नये याकरिता कुपटी योजनेजवळ बोअर मारण्यात येणार आहे. त्यामुळे मुबलक पाणी मिळेल व कोणतीही अडचण जाणार नाही.- आरिफ काजी,सभापती, पाणीपुरवठा नगरपरिषद.