शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

महागाव तालुक्यातील ७० गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:13 IST

तालुक्यातील ७० गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसासह जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती आणि तहसील कार्यालय पाणीटंचाईसाठी उपाययोजना करताना दिसत नसल्यामुळे या गावातील महिला घागर मोर्चे घेऊन थेट बीडीओच्या कक्षात येत आहेत.

ठळक मुद्देप्रशासन हतबल : नागरिकांचे मोर्चे धडकतात तहसीलवर

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील ७० गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसासह जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती आणि तहसील कार्यालय पाणीटंचाईसाठी उपाययोजना करताना दिसत नसल्यामुळे या गावातील महिला घागर मोर्चे घेऊन थेट बीडीओच्या कक्षात येत आहेत.तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या फुलसावंगी या दहा हजार लोकसंख्येच्या गावात जनता पाण्यासाठी व्याकुळ आहे. शासनाने नामधारी टँकर दिला. ते दिवसभरात एकच खेप आणत असल्यामुळे अर्धे गाव तहानलेले आहे. स्थानिक प्रशासन पाणीटंचाईवर साधी मलमपट्टी करत असल्याने पंचायत समिती प्रशासनाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. याचा उद्रेक होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक स्वप्नील नाईक यांनी पुढाकार घेऊन टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.मुडाणा, डोंगरगाव येथील महिला घागर मोर्चा घेऊन बीडीओंच्या कक्षात आल्यामुळे प्रशासनाची हतबलता चव्हाट्यावर आली आहे. डोंगरगाव, मुडाणा, दगडथर, मोरथ, वाकोडी, इजनी, हिवरा, धनोडा, कासोळा, बोथा, सेनंद, बेलदरी, टेंभूरदरा, माळवागद, मोहदी, पोखरी, तुळशीनगर, साई, घोनसरा, शिरमाळ, नांदगव्हान, करंजखेड, अंबोडा, आमणी, भांब, वरोडी, कासारबेहळ, पिंपळगाव, टेंभी, राहूर, बिजोरा, घाणमुख, करंजी, पेढी, काऊरवाडी आदी गावात भीषण टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने लवकरच उपाययोजना न केल्यास मोठा जनक्षोभ उफाळण्याची भीती आहे.अधर पूसचे पाणी नदीपात्रात सोडाफुलसावंगी, टेंभुरदरा येथे टँकर सुरू आहे. परंतु पाणीपुरवठा कमी पडत आहे. अन्य गावातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच जनावराना पाणीच मिळत नाही. अधर पूस प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडण्याची मागणी गावागावातून होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई