शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

महागाव तालुक्यातील ७० गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:13 IST

तालुक्यातील ७० गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसासह जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती आणि तहसील कार्यालय पाणीटंचाईसाठी उपाययोजना करताना दिसत नसल्यामुळे या गावातील महिला घागर मोर्चे घेऊन थेट बीडीओच्या कक्षात येत आहेत.

ठळक मुद्देप्रशासन हतबल : नागरिकांचे मोर्चे धडकतात तहसीलवर

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील ७० गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसासह जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती आणि तहसील कार्यालय पाणीटंचाईसाठी उपाययोजना करताना दिसत नसल्यामुळे या गावातील महिला घागर मोर्चे घेऊन थेट बीडीओच्या कक्षात येत आहेत.तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या फुलसावंगी या दहा हजार लोकसंख्येच्या गावात जनता पाण्यासाठी व्याकुळ आहे. शासनाने नामधारी टँकर दिला. ते दिवसभरात एकच खेप आणत असल्यामुळे अर्धे गाव तहानलेले आहे. स्थानिक प्रशासन पाणीटंचाईवर साधी मलमपट्टी करत असल्याने पंचायत समिती प्रशासनाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. याचा उद्रेक होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक स्वप्नील नाईक यांनी पुढाकार घेऊन टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.मुडाणा, डोंगरगाव येथील महिला घागर मोर्चा घेऊन बीडीओंच्या कक्षात आल्यामुळे प्रशासनाची हतबलता चव्हाट्यावर आली आहे. डोंगरगाव, मुडाणा, दगडथर, मोरथ, वाकोडी, इजनी, हिवरा, धनोडा, कासोळा, बोथा, सेनंद, बेलदरी, टेंभूरदरा, माळवागद, मोहदी, पोखरी, तुळशीनगर, साई, घोनसरा, शिरमाळ, नांदगव्हान, करंजखेड, अंबोडा, आमणी, भांब, वरोडी, कासारबेहळ, पिंपळगाव, टेंभी, राहूर, बिजोरा, घाणमुख, करंजी, पेढी, काऊरवाडी आदी गावात भीषण टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने लवकरच उपाययोजना न केल्यास मोठा जनक्षोभ उफाळण्याची भीती आहे.अधर पूसचे पाणी नदीपात्रात सोडाफुलसावंगी, टेंभुरदरा येथे टँकर सुरू आहे. परंतु पाणीपुरवठा कमी पडत आहे. अन्य गावातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच जनावराना पाणीच मिळत नाही. अधर पूस प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडण्याची मागणी गावागावातून होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई