शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

महागाव तालुक्यातील ७० गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:13 IST

तालुक्यातील ७० गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसासह जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती आणि तहसील कार्यालय पाणीटंचाईसाठी उपाययोजना करताना दिसत नसल्यामुळे या गावातील महिला घागर मोर्चे घेऊन थेट बीडीओच्या कक्षात येत आहेत.

ठळक मुद्देप्रशासन हतबल : नागरिकांचे मोर्चे धडकतात तहसीलवर

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील ७० गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसासह जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पंचायत समिती आणि तहसील कार्यालय पाणीटंचाईसाठी उपाययोजना करताना दिसत नसल्यामुळे या गावातील महिला घागर मोर्चे घेऊन थेट बीडीओच्या कक्षात येत आहेत.तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या फुलसावंगी या दहा हजार लोकसंख्येच्या गावात जनता पाण्यासाठी व्याकुळ आहे. शासनाने नामधारी टँकर दिला. ते दिवसभरात एकच खेप आणत असल्यामुळे अर्धे गाव तहानलेले आहे. स्थानिक प्रशासन पाणीटंचाईवर साधी मलमपट्टी करत असल्याने पंचायत समिती प्रशासनाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. याचा उद्रेक होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक स्वप्नील नाईक यांनी पुढाकार घेऊन टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.मुडाणा, डोंगरगाव येथील महिला घागर मोर्चा घेऊन बीडीओंच्या कक्षात आल्यामुळे प्रशासनाची हतबलता चव्हाट्यावर आली आहे. डोंगरगाव, मुडाणा, दगडथर, मोरथ, वाकोडी, इजनी, हिवरा, धनोडा, कासोळा, बोथा, सेनंद, बेलदरी, टेंभूरदरा, माळवागद, मोहदी, पोखरी, तुळशीनगर, साई, घोनसरा, शिरमाळ, नांदगव्हान, करंजखेड, अंबोडा, आमणी, भांब, वरोडी, कासारबेहळ, पिंपळगाव, टेंभी, राहूर, बिजोरा, घाणमुख, करंजी, पेढी, काऊरवाडी आदी गावात भीषण टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने लवकरच उपाययोजना न केल्यास मोठा जनक्षोभ उफाळण्याची भीती आहे.अधर पूसचे पाणी नदीपात्रात सोडाफुलसावंगी, टेंभुरदरा येथे टँकर सुरू आहे. परंतु पाणीपुरवठा कमी पडत आहे. अन्य गावातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच जनावराना पाणीच मिळत नाही. अधर पूस प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडण्याची मागणी गावागावातून होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई