शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 11:42 IST

राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देचार हजार टँकरने पाणी पुरवठा२४ जिल्ह्यांची स्थिती बिकट, चारा छावण्या वाढताहेत

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. चार हजार टँकरच्या मदतीने गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर पाणी पुरवठा केला जात आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने चारा छावण्या उघडल्या जात आहे. पुढील महिन्यात या छावण्याची संख्या वाढणार आहे.पाणीटंचाईची सर्वाधिक भीषण स्थिती औरंगाबाद, नाशिक आणि पुणे विभागाची आहे. या भागामध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहे. उन्हाचा पारा सतत वाढत असल्याने जलाशयाची पातळी झपाट्याने खाली जात आहे. राज्यात उन्हाचा पारा ४५ अंशापर्यंत वर चढला आहे. चंद्रपूरमध्ये हा पारा वाढला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती अशीच आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. जनजीवनही प्रभावित झाले आहे.२४ जिल्ह्यामध्ये ही भीषण स्थिती आहे. यामध्ये औरंगाबाद विभागात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. या ठिकाणी १६२६ गावे आणि ५७० वाड्यामध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी दोन हजार १८५ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे.नाशिकमधील ७६३ गावे, ३०३९ वाड्यांना ५८४ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. पुणे विभागातील ५०६ गावे, ३३६२ वाड्यांना ५८४ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. कोकणातील ६८ गावे आणि १८८ वाड्यांना ५७ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. अमरावती विभागातील १४६ गावांना १५३ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. नागपूर विभागातील एका गावात एका टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे.यवतमाळ जिल्ह्यात चार टँकरयवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी ५ कोटींच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासानाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील चार गावांमध्ये चार टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. १२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून पुढील महिन्यात ही संख्या वाढण्याचा धोका आहे.चाऱ्याअभावी जनावरे विक्रीलाराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जनावरांना लागणारा उपयुक्त चाराच उपलब्ध नाही. यामुळे छावण्या उघडाव्या लागतील आणि चारा विकत घ्यावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीला काढली आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई