शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 11:42 IST

राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देचार हजार टँकरने पाणी पुरवठा२४ जिल्ह्यांची स्थिती बिकट, चारा छावण्या वाढताहेत

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. चार हजार टँकरच्या मदतीने गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर पाणी पुरवठा केला जात आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने चारा छावण्या उघडल्या जात आहे. पुढील महिन्यात या छावण्याची संख्या वाढणार आहे.पाणीटंचाईची सर्वाधिक भीषण स्थिती औरंगाबाद, नाशिक आणि पुणे विभागाची आहे. या भागामध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहे. उन्हाचा पारा सतत वाढत असल्याने जलाशयाची पातळी झपाट्याने खाली जात आहे. राज्यात उन्हाचा पारा ४५ अंशापर्यंत वर चढला आहे. चंद्रपूरमध्ये हा पारा वाढला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती अशीच आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. जनजीवनही प्रभावित झाले आहे.२४ जिल्ह्यामध्ये ही भीषण स्थिती आहे. यामध्ये औरंगाबाद विभागात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. या ठिकाणी १६२६ गावे आणि ५७० वाड्यामध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी दोन हजार १८५ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे.नाशिकमधील ७६३ गावे, ३०३९ वाड्यांना ५८४ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. पुणे विभागातील ५०६ गावे, ३३६२ वाड्यांना ५८४ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. कोकणातील ६८ गावे आणि १८८ वाड्यांना ५७ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. अमरावती विभागातील १४६ गावांना १५३ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. नागपूर विभागातील एका गावात एका टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे.यवतमाळ जिल्ह्यात चार टँकरयवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी ५ कोटींच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासानाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील चार गावांमध्ये चार टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. १२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून पुढील महिन्यात ही संख्या वाढण्याचा धोका आहे.चाऱ्याअभावी जनावरे विक्रीलाराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जनावरांना लागणारा उपयुक्त चाराच उपलब्ध नाही. यामुळे छावण्या उघडाव्या लागतील आणि चारा विकत घ्यावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीला काढली आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई