शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 11:42 IST

राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देचार हजार टँकरने पाणी पुरवठा२४ जिल्ह्यांची स्थिती बिकट, चारा छावण्या वाढताहेत

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील १० हजार गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. चार हजार टँकरच्या मदतीने गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर पाणी पुरवठा केला जात आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध नसल्याने चारा छावण्या उघडल्या जात आहे. पुढील महिन्यात या छावण्याची संख्या वाढणार आहे.पाणीटंचाईची सर्वाधिक भीषण स्थिती औरंगाबाद, नाशिक आणि पुणे विभागाची आहे. या भागामध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहे. उन्हाचा पारा सतत वाढत असल्याने जलाशयाची पातळी झपाट्याने खाली जात आहे. राज्यात उन्हाचा पारा ४५ अंशापर्यंत वर चढला आहे. चंद्रपूरमध्ये हा पारा वाढला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती अशीच आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. जनजीवनही प्रभावित झाले आहे.२४ जिल्ह्यामध्ये ही भीषण स्थिती आहे. यामध्ये औरंगाबाद विभागात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. या ठिकाणी १६२६ गावे आणि ५७० वाड्यामध्ये भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी दोन हजार १८५ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे.नाशिकमधील ७६३ गावे, ३०३९ वाड्यांना ५८४ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. पुणे विभागातील ५०६ गावे, ३३६२ वाड्यांना ५८४ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. कोकणातील ६८ गावे आणि १८८ वाड्यांना ५७ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. अमरावती विभागातील १४६ गावांना १५३ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. नागपूर विभागातील एका गावात एका टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे.यवतमाळ जिल्ह्यात चार टँकरयवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी ५ कोटींच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासानाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील चार गावांमध्ये चार टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा सुरू आहे. १२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून पुढील महिन्यात ही संख्या वाढण्याचा धोका आहे.चाऱ्याअभावी जनावरे विक्रीलाराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जनावरांना लागणारा उपयुक्त चाराच उपलब्ध नाही. यामुळे छावण्या उघडाव्या लागतील आणि चारा विकत घ्यावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीला काढली आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई