शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

लोहारा परिसराला पाणीटंचाईचा विळखा

By admin | Updated: May 20, 2017 02:33 IST

शहरातील सर्वात झपाट्याने वाढणारा परिसर म्हणजे लोहारा भाग होय. पूर्वी लोहारा ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती,

केवळ एक टँकर सुरू : बोअरवेल व विहिरींनीही गाठला तळ, प्राधिकरणाचे नळही नाही लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील सर्वात झपाट्याने वाढणारा परिसर म्हणजे लोहारा भाग होय. पूर्वी लोहारा ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती, परंतु आता हा भाग सुद्धा यवतमाळ नगर परिषदेत विलिन झाला आहे. मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती असलेल्या या भागात दरवर्षीच तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. परंतु आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाही. पूर्वी ग्रामपंचायत असताना काही तरी सुविधा केल्या जात होत्या. परंतु आता नगर परिषदेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप या भागातील नागरिकांचा आहे. सध्या मे महिन्यात तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. प्रकल्पातील पाण्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे नळांनाही पाणी नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आठवड्यातून दोनवेळ नळ सोडले जातात. परंतु कमी दाबाने येणाऱ्या नळामुळे नागरिकांचे चांगलेच हाल आहे. अनेक भागात नळाचे पाणी पोहचत नाही. मागील वर्षी लोहारा परिसरातील पाणीटंचाईग्रस्त भागात सात ते आठ टँकर नियमितपणे सुरू होते. यावर्षी नगर परिषदेचे केवळ एक टँकर सुरू केले असून समाजसेवी अनिल यादव यांनी नागरिकांसाठी स्वत: एक टँकर सुरू केले आहे. या दोन टँकरच्या भरोशावर मोठ्या भागात असलेल्या पाणीटंचाईवर नियंत्रण मिळविणे शक्य होताना दिसत नाही. शिवाजी नगर झोपडपट्टी, रेणुका नगर, देवी वॉर्ड, साने गुरुजी कॉलनी, मैथीली नगर, बोदड, प्रिया रेसिडन्सी, साठवणे ले-आऊट आदी भागात तीव्र पाणीटंचाई आहे. यातील बहुतांश भागात तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना बोअरवेल व विहिरींवरच अवलंबून रहावे लागते. परंतु उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये बोअरवेल, विहिरी आणि हातपंपांनीही तळ गाठला आहे. अनेकजण खासगी टँकर विकत घेत आहेत. परंतु पाचशे ते सातशे रुपयांचे टँकर घेणे प्रत्येकालाच परवडणारे नसते. तसेच पाण्याची साठवण करण्याचे साधनेही घरात नसतात. त्यामुळे गटागटाने नागरिक टँकर विकत घेतात. तीन ते चार घरांमिळून टँकर घेऊन सर्व मिळून पैसे देतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाण्याचे बिल भरल्यानंतरही अशाप्रकारे पुन्हा आर्थिक भूदंड सर्वसामान्य व गोरगरिब नागरिकांना सहन करावा लागत आहे. शिवाजी नगर, पांढरी परिसरातील हातपंपही आटल्याने येथील नागरिकांची चांगलीच कसरत सुरू आहे. या परिसरात गोरगरीब व हातमजुरी करणारे नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या नागरिकांना विकतचे पाणी घणे परवडणारे नाही. लोहारा वळणमार्गावर पाण्याची नवीन टाकी झाली आहे. या टाकीवरून काही नागरिकांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. सध्या तरी या टाकीचा लोहारा परिसरातील नागरिकांना आवश्यक तो फायदा होताना दिसत नाही. नगर परिषदेने या भागात पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरच्या फेऱ्या वाढवाव्या, अशी मागणी आहे. पाणीसमस्या कायमस्वरुपी सुटावी लोहारा परिसरातील पाणीसमस्या ही दरवर्षीचीच आहे. परंतु याकडे गांभिर्याने कुणीच लक्ष देण्यास तयार नाही. नगर परिषदेकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु नगर परिषदेनेही भ्रमनिरास केल्याचे नागरिक सांगतात. नवीन टाकी झाली, परंतु या टाकीचाही फायदा अद्याप दिसून येत नाही. काही ठराविक भागातील नागरिकांना या टाकीवरून नळजोडण्या दिल्या आहेत. या भागातील सरसकट नळजोडण्या याच टाकीवरून जोडण्याची गरज आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यापूर्वी ते शक्य होताना दिसत नाही. लोहारा परिसर मोठ्या प्रमाणात पसरला आहे. दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या प्रमाणात पाण्याची सोय होताना दिसत नाही. नगर परिषद ज्या प्रमाणात करवसुली आणि त्यासाठी मोजणी व नोंदणीवर जोर देत आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर मात्र कोणताही जोर देत नाही. त्यामुळे नागरिकांध्ये रोष निर्माण होणे सहाजिक आहे.