शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

लोहारा परिसराला पाणीटंचाईचा विळखा

By admin | Updated: May 20, 2017 02:33 IST

शहरातील सर्वात झपाट्याने वाढणारा परिसर म्हणजे लोहारा भाग होय. पूर्वी लोहारा ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती,

केवळ एक टँकर सुरू : बोअरवेल व विहिरींनीही गाठला तळ, प्राधिकरणाचे नळही नाही लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील सर्वात झपाट्याने वाढणारा परिसर म्हणजे लोहारा भाग होय. पूर्वी लोहारा ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती, परंतु आता हा भाग सुद्धा यवतमाळ नगर परिषदेत विलिन झाला आहे. मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती असलेल्या या भागात दरवर्षीच तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. परंतु आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाही. पूर्वी ग्रामपंचायत असताना काही तरी सुविधा केल्या जात होत्या. परंतु आता नगर परिषदेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप या भागातील नागरिकांचा आहे. सध्या मे महिन्यात तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. प्रकल्पातील पाण्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे नळांनाही पाणी नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आठवड्यातून दोनवेळ नळ सोडले जातात. परंतु कमी दाबाने येणाऱ्या नळामुळे नागरिकांचे चांगलेच हाल आहे. अनेक भागात नळाचे पाणी पोहचत नाही. मागील वर्षी लोहारा परिसरातील पाणीटंचाईग्रस्त भागात सात ते आठ टँकर नियमितपणे सुरू होते. यावर्षी नगर परिषदेचे केवळ एक टँकर सुरू केले असून समाजसेवी अनिल यादव यांनी नागरिकांसाठी स्वत: एक टँकर सुरू केले आहे. या दोन टँकरच्या भरोशावर मोठ्या भागात असलेल्या पाणीटंचाईवर नियंत्रण मिळविणे शक्य होताना दिसत नाही. शिवाजी नगर झोपडपट्टी, रेणुका नगर, देवी वॉर्ड, साने गुरुजी कॉलनी, मैथीली नगर, बोदड, प्रिया रेसिडन्सी, साठवणे ले-आऊट आदी भागात तीव्र पाणीटंचाई आहे. यातील बहुतांश भागात तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना बोअरवेल व विहिरींवरच अवलंबून रहावे लागते. परंतु उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये बोअरवेल, विहिरी आणि हातपंपांनीही तळ गाठला आहे. अनेकजण खासगी टँकर विकत घेत आहेत. परंतु पाचशे ते सातशे रुपयांचे टँकर घेणे प्रत्येकालाच परवडणारे नसते. तसेच पाण्याची साठवण करण्याचे साधनेही घरात नसतात. त्यामुळे गटागटाने नागरिक टँकर विकत घेतात. तीन ते चार घरांमिळून टँकर घेऊन सर्व मिळून पैसे देतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाण्याचे बिल भरल्यानंतरही अशाप्रकारे पुन्हा आर्थिक भूदंड सर्वसामान्य व गोरगरिब नागरिकांना सहन करावा लागत आहे. शिवाजी नगर, पांढरी परिसरातील हातपंपही आटल्याने येथील नागरिकांची चांगलीच कसरत सुरू आहे. या परिसरात गोरगरीब व हातमजुरी करणारे नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या नागरिकांना विकतचे पाणी घणे परवडणारे नाही. लोहारा वळणमार्गावर पाण्याची नवीन टाकी झाली आहे. या टाकीवरून काही नागरिकांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. सध्या तरी या टाकीचा लोहारा परिसरातील नागरिकांना आवश्यक तो फायदा होताना दिसत नाही. नगर परिषदेने या भागात पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरच्या फेऱ्या वाढवाव्या, अशी मागणी आहे. पाणीसमस्या कायमस्वरुपी सुटावी लोहारा परिसरातील पाणीसमस्या ही दरवर्षीचीच आहे. परंतु याकडे गांभिर्याने कुणीच लक्ष देण्यास तयार नाही. नगर परिषदेकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु नगर परिषदेनेही भ्रमनिरास केल्याचे नागरिक सांगतात. नवीन टाकी झाली, परंतु या टाकीचाही फायदा अद्याप दिसून येत नाही. काही ठराविक भागातील नागरिकांना या टाकीवरून नळजोडण्या दिल्या आहेत. या भागातील सरसकट नळजोडण्या याच टाकीवरून जोडण्याची गरज आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यापूर्वी ते शक्य होताना दिसत नाही. लोहारा परिसर मोठ्या प्रमाणात पसरला आहे. दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या प्रमाणात पाण्याची सोय होताना दिसत नाही. नगर परिषद ज्या प्रमाणात करवसुली आणि त्यासाठी मोजणी व नोंदणीवर जोर देत आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर मात्र कोणताही जोर देत नाही. त्यामुळे नागरिकांध्ये रोष निर्माण होणे सहाजिक आहे.