शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

लोहारा परिसराला पाणीटंचाईचा विळखा

By admin | Updated: May 20, 2017 02:33 IST

शहरातील सर्वात झपाट्याने वाढणारा परिसर म्हणजे लोहारा भाग होय. पूर्वी लोहारा ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती,

केवळ एक टँकर सुरू : बोअरवेल व विहिरींनीही गाठला तळ, प्राधिकरणाचे नळही नाही लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील सर्वात झपाट्याने वाढणारा परिसर म्हणजे लोहारा भाग होय. पूर्वी लोहारा ही स्वतंत्र ग्रामपंचायत होती, परंतु आता हा भाग सुद्धा यवतमाळ नगर परिषदेत विलिन झाला आहे. मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती असलेल्या या भागात दरवर्षीच तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. परंतु आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाही. पूर्वी ग्रामपंचायत असताना काही तरी सुविधा केल्या जात होत्या. परंतु आता नगर परिषदेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप या भागातील नागरिकांचा आहे. सध्या मे महिन्यात तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. प्रकल्पातील पाण्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे नळांनाही पाणी नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आठवड्यातून दोनवेळ नळ सोडले जातात. परंतु कमी दाबाने येणाऱ्या नळामुळे नागरिकांचे चांगलेच हाल आहे. अनेक भागात नळाचे पाणी पोहचत नाही. मागील वर्षी लोहारा परिसरातील पाणीटंचाईग्रस्त भागात सात ते आठ टँकर नियमितपणे सुरू होते. यावर्षी नगर परिषदेचे केवळ एक टँकर सुरू केले असून समाजसेवी अनिल यादव यांनी नागरिकांसाठी स्वत: एक टँकर सुरू केले आहे. या दोन टँकरच्या भरोशावर मोठ्या भागात असलेल्या पाणीटंचाईवर नियंत्रण मिळविणे शक्य होताना दिसत नाही. शिवाजी नगर झोपडपट्टी, रेणुका नगर, देवी वॉर्ड, साने गुरुजी कॉलनी, मैथीली नगर, बोदड, प्रिया रेसिडन्सी, साठवणे ले-आऊट आदी भागात तीव्र पाणीटंचाई आहे. यातील बहुतांश भागात तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळ नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना बोअरवेल व विहिरींवरच अवलंबून रहावे लागते. परंतु उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये बोअरवेल, विहिरी आणि हातपंपांनीही तळ गाठला आहे. अनेकजण खासगी टँकर विकत घेत आहेत. परंतु पाचशे ते सातशे रुपयांचे टँकर घेणे प्रत्येकालाच परवडणारे नसते. तसेच पाण्याची साठवण करण्याचे साधनेही घरात नसतात. त्यामुळे गटागटाने नागरिक टँकर विकत घेतात. तीन ते चार घरांमिळून टँकर घेऊन सर्व मिळून पैसे देतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाण्याचे बिल भरल्यानंतरही अशाप्रकारे पुन्हा आर्थिक भूदंड सर्वसामान्य व गोरगरिब नागरिकांना सहन करावा लागत आहे. शिवाजी नगर, पांढरी परिसरातील हातपंपही आटल्याने येथील नागरिकांची चांगलीच कसरत सुरू आहे. या परिसरात गोरगरीब व हातमजुरी करणारे नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या नागरिकांना विकतचे पाणी घणे परवडणारे नाही. लोहारा वळणमार्गावर पाण्याची नवीन टाकी झाली आहे. या टाकीवरून काही नागरिकांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. सध्या तरी या टाकीचा लोहारा परिसरातील नागरिकांना आवश्यक तो फायदा होताना दिसत नाही. नगर परिषदेने या भागात पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरच्या फेऱ्या वाढवाव्या, अशी मागणी आहे. पाणीसमस्या कायमस्वरुपी सुटावी लोहारा परिसरातील पाणीसमस्या ही दरवर्षीचीच आहे. परंतु याकडे गांभिर्याने कुणीच लक्ष देण्यास तयार नाही. नगर परिषदेकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु नगर परिषदेनेही भ्रमनिरास केल्याचे नागरिक सांगतात. नवीन टाकी झाली, परंतु या टाकीचाही फायदा अद्याप दिसून येत नाही. काही ठराविक भागातील नागरिकांना या टाकीवरून नळजोडण्या दिल्या आहेत. या भागातील सरसकट नळजोडण्या याच टाकीवरून जोडण्याची गरज आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यापूर्वी ते शक्य होताना दिसत नाही. लोहारा परिसर मोठ्या प्रमाणात पसरला आहे. दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या प्रमाणात पाण्याची सोय होताना दिसत नाही. नगर परिषद ज्या प्रमाणात करवसुली आणि त्यासाठी मोजणी व नोंदणीवर जोर देत आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर मात्र कोणताही जोर देत नाही. त्यामुळे नागरिकांध्ये रोष निर्माण होणे सहाजिक आहे.