शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

घाटंजी शहराची भिस्त वाघाडी धरणावर; ५० टक्के पाणी शिल्लक पण वापर जपूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 16:37 IST

घाटंजी तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणीप्रश्न आहे. विविध उपाययोजना करून यावरही मात करण्याचा तालुका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

विठ्ठल कांबळे

घाटंजी (यवतमाळ) : सूर्य आग ओकतो आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. याचा जलसाठ्यावरही परिणाम झाला आहे; मात्र पावसाळ्यात भरपूर पाणी झाल्याने गतवर्षीपेक्षा यावेळी पाणीटंचाईची तीव्रता थोडीफार कमी आहे.

घाटंजी शहराला वाघाडी मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. या प्रकल्पाची साठवण क्षमता ३५.३६ दलघमी आहे. सद्यस्थितीत १७.७४ दलघमी म्हणजे ५० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. घाटंजी शहरासाठी दोन एमएमक्यु दशलक्षघनमीटर पाणी आरक्षित आहे. घाटंजी तहसील ग्रामीणसाठी ४.५० दशलक्ष घनमीटर, यवतमाळ तहसील ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी दोन एमएमक्यु दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे, तसेच १८किलोमीटरपर्यंत शेतीसाठी पाणी पुरवठा होतो. आतापर्यंत दोन रोटेशन झाले असून, तिसरे रोटेशन शेतीसाठी ४ मे पासून आहे.

वाघाडी धरणातून शहराला जलशुधद्धीकरण केंद्रामार्फत दररोज १७ लाख लीटर पाणी पुरवठा होतो. शहरात २३० हातपंप, २५ विंधन विहिरी, सात सार्वजनिक विहिरीमधून पाणीपुरवठा होतो. तसेच काही भागात एका टँकरव्दारे सार्वजनिक विहिरीत पाणी घेतले जाते. काही भागात दररोज दोन वेळा तर काही भागात एक दिवस आड दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. शहरात २३०० नळ कनेक्शन आहेत. पाणीपट्टी थकबाकी ५१लाख रुपयांपैकी २७ लाख रुपये वसुली करण्यात आली.

नामापूर गावाला होतोय टँकरने पाणीपुरवठा

ग्रामीण भागात नामापूर येथे टँकरव्दारा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वासरी, देवधरी, येडशी, कोळी बु., सोनखास, विरुळ,कवठा, येडशी, कोळी खु.,ससानी,मांडवा,वाढोणा या १२ गावांसाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यावर होणाऱ्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठ्यात अडचणी

घाटंजी शहरात पाण्याचे अनेक स्रोत आहे. विहिरी, हातपंपाला भरपूर पाणी आहे. त्यामुळे सद्यातरी पाण्याची समस्या नाही. मात्र, इतर काही ठिकाणचा अनुभव पाहता वीज पुरवठा नियमित न राहिल्यास योजनेच्या पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण शक्यता नाकारता येत नाही. गर्मी वाढल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. अशावेळी पाण्याची अडचण निर्माण होऊ नये याकरिता यंत्रणेने आतापासूनच उपाययोजना करण्यात याव्या, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. 

घाटंजी तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणीप्रश्न आहे. विविध उपाययोजना करून यावरही मात करण्याचा तालुका प्रशासनाचा प्रयत्न आहे. नदी, नाले आटले असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. ही जनावरे घरी आल्यानंतर त्यांना पिण्यासाठी पाणी साठवून ठेवावे लागते.

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याची ओरड आहे. वारंवार वीज गूल होते. काही ठिकाणी अर्धा तास, तर काही ठिकाणी तासनतास वीज बंद राहते. त्यामुळे पाण्याच्या टाक्या भरण्यात अडचणी निर्माण होतात. अशावेळी पाणीपुरवठा विस्कळीत होतो. यासाठी काही ग्रामपंचायत स्तरावर पाठपुरावाही केला जाणार आहे. विद्युत कंपनीने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

जलजीवन मिशनमधून अधिकाअधिक कामे घेणार

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत असून भारनियमनामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. परंतु, काही दिवसातच लोडशेडिंगची समस्या सुटेल व पाणी पुरवठा नियमित सुरू होईल. प्रकल्पात पाणी भरपूर असले तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.

अमोल माळकर, मुख्याधिकारी नगर परिषद, घाटंजी

गतवर्षीपेक्षा यावर्षी प्रस्ताव कमी आले आहेत. या मे महिन्यात कदाचित ते वाढतील. पाणी टंचाई कृती आराखडा व जलजीवन मिशन कृती आराखड्यातून जास्तीत जास्त कामे करून तालुक्यात पाणी टंचाई भासणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहे

सोनाली माडकर, गटविकास अधिकारी, घाटंजी

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई