शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

घाटंजी शहराची भिस्त वाघाडी धरणावर; ५० टक्के पाणी शिल्लक पण वापर जपूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 16:37 IST

घाटंजी तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणीप्रश्न आहे. विविध उपाययोजना करून यावरही मात करण्याचा तालुका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

विठ्ठल कांबळे

घाटंजी (यवतमाळ) : सूर्य आग ओकतो आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. याचा जलसाठ्यावरही परिणाम झाला आहे; मात्र पावसाळ्यात भरपूर पाणी झाल्याने गतवर्षीपेक्षा यावेळी पाणीटंचाईची तीव्रता थोडीफार कमी आहे.

घाटंजी शहराला वाघाडी मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. या प्रकल्पाची साठवण क्षमता ३५.३६ दलघमी आहे. सद्यस्थितीत १७.७४ दलघमी म्हणजे ५० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. घाटंजी शहरासाठी दोन एमएमक्यु दशलक्षघनमीटर पाणी आरक्षित आहे. घाटंजी तहसील ग्रामीणसाठी ४.५० दशलक्ष घनमीटर, यवतमाळ तहसील ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी दोन एमएमक्यु दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे, तसेच १८किलोमीटरपर्यंत शेतीसाठी पाणी पुरवठा होतो. आतापर्यंत दोन रोटेशन झाले असून, तिसरे रोटेशन शेतीसाठी ४ मे पासून आहे.

वाघाडी धरणातून शहराला जलशुधद्धीकरण केंद्रामार्फत दररोज १७ लाख लीटर पाणी पुरवठा होतो. शहरात २३० हातपंप, २५ विंधन विहिरी, सात सार्वजनिक विहिरीमधून पाणीपुरवठा होतो. तसेच काही भागात एका टँकरव्दारे सार्वजनिक विहिरीत पाणी घेतले जाते. काही भागात दररोज दोन वेळा तर काही भागात एक दिवस आड दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. शहरात २३०० नळ कनेक्शन आहेत. पाणीपट्टी थकबाकी ५१लाख रुपयांपैकी २७ लाख रुपये वसुली करण्यात आली.

नामापूर गावाला होतोय टँकरने पाणीपुरवठा

ग्रामीण भागात नामापूर येथे टँकरव्दारा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वासरी, देवधरी, येडशी, कोळी बु., सोनखास, विरुळ,कवठा, येडशी, कोळी खु.,ससानी,मांडवा,वाढोणा या १२ गावांसाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यावर होणाऱ्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठ्यात अडचणी

घाटंजी शहरात पाण्याचे अनेक स्रोत आहे. विहिरी, हातपंपाला भरपूर पाणी आहे. त्यामुळे सद्यातरी पाण्याची समस्या नाही. मात्र, इतर काही ठिकाणचा अनुभव पाहता वीज पुरवठा नियमित न राहिल्यास योजनेच्या पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण शक्यता नाकारता येत नाही. गर्मी वाढल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. अशावेळी पाण्याची अडचण निर्माण होऊ नये याकरिता यंत्रणेने आतापासूनच उपाययोजना करण्यात याव्या, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. 

घाटंजी तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणीप्रश्न आहे. विविध उपाययोजना करून यावरही मात करण्याचा तालुका प्रशासनाचा प्रयत्न आहे. नदी, नाले आटले असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. ही जनावरे घरी आल्यानंतर त्यांना पिण्यासाठी पाणी साठवून ठेवावे लागते.

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याची ओरड आहे. वारंवार वीज गूल होते. काही ठिकाणी अर्धा तास, तर काही ठिकाणी तासनतास वीज बंद राहते. त्यामुळे पाण्याच्या टाक्या भरण्यात अडचणी निर्माण होतात. अशावेळी पाणीपुरवठा विस्कळीत होतो. यासाठी काही ग्रामपंचायत स्तरावर पाठपुरावाही केला जाणार आहे. विद्युत कंपनीने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

जलजीवन मिशनमधून अधिकाअधिक कामे घेणार

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत असून भारनियमनामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. परंतु, काही दिवसातच लोडशेडिंगची समस्या सुटेल व पाणी पुरवठा नियमित सुरू होईल. प्रकल्पात पाणी भरपूर असले तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.

अमोल माळकर, मुख्याधिकारी नगर परिषद, घाटंजी

गतवर्षीपेक्षा यावर्षी प्रस्ताव कमी आले आहेत. या मे महिन्यात कदाचित ते वाढतील. पाणी टंचाई कृती आराखडा व जलजीवन मिशन कृती आराखड्यातून जास्तीत जास्त कामे करून तालुक्यात पाणी टंचाई भासणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहे

सोनाली माडकर, गटविकास अधिकारी, घाटंजी

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई