शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

राळेगावात पाण्याचे वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

सुमारे २० हजार लोकसंख्येच्या शहराला आज हिवाळ्यातच ४०-४० दिवस पाणीपुरवठा होऊ शकत नाही. उन्हाळ्यात तर या शहरातील नागरिकांना शहर सोडण्याची वेळ तर येणार नाही, अशी साधार भीती व्यक्त होऊ लागली आहे. पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. यात इतक्या प्रदीर्घ कालावधीकरिता झालेली हयगय गंभीर बाब आहे.

ठळक मुद्देदिवाळीतही नागरिकांची भटकंती : नगर पंचायतच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुका व उपविभागाचे मुख्यालय असलेल्या राळेगाव शहरात पिण्याच्या पाण्याचे वांदे सुरू आहे. नळ योजनेचा पाणीपुरवठा तब्बल ४० दिवसाने झाला. विधानसभेची निवडणूक आणि दिवाळीतही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. यावरून नगरपंचायतीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सुमारे २० हजार लोकसंख्येच्या शहराला आज हिवाळ्यातच ४०-४० दिवस पाणीपुरवठा होऊ शकत नाही. उन्हाळ्यात तर या शहरातील नागरिकांना शहर सोडण्याची वेळ तर येणार नाही, अशी साधार भीती व्यक्त होऊ लागली आहे. पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. यात इतक्या प्रदीर्घ कालावधीकरिता झालेली हयगय गंभीर बाब आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यातील कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.आठ कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना सुरू होऊन पुरते दोन वर्षही झाले नाही, तरी या नळ योजनेचा परिपूर्ण उपयोग शहरवासीयांना झालेला नाही. ५५ लाखांचे फिल्टर प्लांट पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आले. मागीलवर्षी १२ लाख रुपये पुन्हा त्यावर खर्च करण्यात आले. तरी राळेगावकरांना नियमित शुद्ध पाणी मिळत नाही. गत एक वर्षापासून पाणीपुरवठा होणारी पाईपलाईन सिमेंट रोडखाली दबल्याने एक पाण्याची टाकी निरूपयोगी झाली आहे. प्रभाग क्र.१४, १५, १६, १७ आदी भागांमध्ये चार-पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा कायमचा बंद आहे.कळमनेर येथील पाण्याच्या टाकीवर लावलेल्या ४० हॉर्सपॉवरच्या दोन मोटारी दोनदा क्रमाक्रमाने जळाल्या. आठ-आठ दिवस दुरुस्तीकरिता व त्यानंतर खोलफिटिंगकरिता वेळ लागला. वीज विभागाद्वारे पुरेशा प्रमाणात आवश्यक दाबाने वीजपुरवठा न झाल्याने मोटारी जळाल्या. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला, असे नगरपंचायतीद्वारे सांगून वेळ मारून नेण्यात आली. मागील दोन वर्षांपासून शहरात सरासरी आठ-दहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. दुसरीकडे पाणीपट्टी मात्र पूर्ण बाराही महिन्याची सक्तीने वसूल करण्यात येत आहे. नागरिकांना पूर्ण पाणीपट्टी भरल्यानंतरही पाण्याकरिता भटकंती करावी लागते. पाण्याचे जार, टँकरद्वारे पाणी बोलवावे लागते. बोअरिंग विहिरीवरील पाण्यासाठी अतिरिक्त वीज खर्च सोसावा लागतो.रोगराईत वाढखोल हातपंप, बोअर, विहिरीतून काढलेल्या पाण्याच्या सेवनाने शहरातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. फ्लोराईडची मात्रा या पाण्यात अधिक राहात असल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. घरोघरी, कार्यालयात जारच्या पाण्याचा वापर वाढला आहे. जारचे अशुद्ध व थंड पाण्याचा वापरही अनेक प्रकारच्या रोगराईस वाढ ठरण्यास कारणीभूत ठरत आहे. पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांची मात्र चांगलीच चांदी झाली आहे.वीज अभियंत्याचा नगरपंचायतला सल्लाकळमनेर येथे वीज पुरवठा यवतमाळ ४५ किमी दूरवरच्या लाईनवरून होतो. त्यामुळे वीज पुरवठ्यात व पूर्ण दाबात कधीकधी अडचणी येतात. बरडगाव येथील १३२ केव्ही स्टेशन क्रियान्वित होताच या समस्या कायमच्या दूर होतील. नगरपंचायतीने कळमनेर येथेच आणखी एक ४० हॉर्स पॉवरची मोटार स्पेअरमध्ये ठेवल्यास अशाप्रसंगी वेळ वाचेल, असा सल्ला विद्युत कंपनीचे उपकार्यकारी अभियंता जितेश गजबे यांनी दिला.नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रपाणीपुरवठ्याच्या कामात हयगय करणाऱ्या संबंधितांवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे, असे नगरपंचायतच्या अध्यक्ष माला खसाळे यांनी सांगितले. कमी-अधिक विजेच्या दाबामुळे मोटारी जळाल्या आहेत. नगरपंचायतचे बहुतांश कर्मचारी निवडणूक ड्यूटीवर होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या कामात दुर्लक्ष झाले, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :water shortageपाणीकपात