शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावात पाण्याचे वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

सुमारे २० हजार लोकसंख्येच्या शहराला आज हिवाळ्यातच ४०-४० दिवस पाणीपुरवठा होऊ शकत नाही. उन्हाळ्यात तर या शहरातील नागरिकांना शहर सोडण्याची वेळ तर येणार नाही, अशी साधार भीती व्यक्त होऊ लागली आहे. पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. यात इतक्या प्रदीर्घ कालावधीकरिता झालेली हयगय गंभीर बाब आहे.

ठळक मुद्देदिवाळीतही नागरिकांची भटकंती : नगर पंचायतच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुका व उपविभागाचे मुख्यालय असलेल्या राळेगाव शहरात पिण्याच्या पाण्याचे वांदे सुरू आहे. नळ योजनेचा पाणीपुरवठा तब्बल ४० दिवसाने झाला. विधानसभेची निवडणूक आणि दिवाळीतही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. यावरून नगरपंचायतीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सुमारे २० हजार लोकसंख्येच्या शहराला आज हिवाळ्यातच ४०-४० दिवस पाणीपुरवठा होऊ शकत नाही. उन्हाळ्यात तर या शहरातील नागरिकांना शहर सोडण्याची वेळ तर येणार नाही, अशी साधार भीती व्यक्त होऊ लागली आहे. पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. यात इतक्या प्रदीर्घ कालावधीकरिता झालेली हयगय गंभीर बाब आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यातील कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.आठ कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना सुरू होऊन पुरते दोन वर्षही झाले नाही, तरी या नळ योजनेचा परिपूर्ण उपयोग शहरवासीयांना झालेला नाही. ५५ लाखांचे फिल्टर प्लांट पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आले. मागीलवर्षी १२ लाख रुपये पुन्हा त्यावर खर्च करण्यात आले. तरी राळेगावकरांना नियमित शुद्ध पाणी मिळत नाही. गत एक वर्षापासून पाणीपुरवठा होणारी पाईपलाईन सिमेंट रोडखाली दबल्याने एक पाण्याची टाकी निरूपयोगी झाली आहे. प्रभाग क्र.१४, १५, १६, १७ आदी भागांमध्ये चार-पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा कायमचा बंद आहे.कळमनेर येथील पाण्याच्या टाकीवर लावलेल्या ४० हॉर्सपॉवरच्या दोन मोटारी दोनदा क्रमाक्रमाने जळाल्या. आठ-आठ दिवस दुरुस्तीकरिता व त्यानंतर खोलफिटिंगकरिता वेळ लागला. वीज विभागाद्वारे पुरेशा प्रमाणात आवश्यक दाबाने वीजपुरवठा न झाल्याने मोटारी जळाल्या. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला, असे नगरपंचायतीद्वारे सांगून वेळ मारून नेण्यात आली. मागील दोन वर्षांपासून शहरात सरासरी आठ-दहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. दुसरीकडे पाणीपट्टी मात्र पूर्ण बाराही महिन्याची सक्तीने वसूल करण्यात येत आहे. नागरिकांना पूर्ण पाणीपट्टी भरल्यानंतरही पाण्याकरिता भटकंती करावी लागते. पाण्याचे जार, टँकरद्वारे पाणी बोलवावे लागते. बोअरिंग विहिरीवरील पाण्यासाठी अतिरिक्त वीज खर्च सोसावा लागतो.रोगराईत वाढखोल हातपंप, बोअर, विहिरीतून काढलेल्या पाण्याच्या सेवनाने शहरातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. फ्लोराईडची मात्रा या पाण्यात अधिक राहात असल्याने त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. घरोघरी, कार्यालयात जारच्या पाण्याचा वापर वाढला आहे. जारचे अशुद्ध व थंड पाण्याचा वापरही अनेक प्रकारच्या रोगराईस वाढ ठरण्यास कारणीभूत ठरत आहे. पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांची मात्र चांगलीच चांदी झाली आहे.वीज अभियंत्याचा नगरपंचायतला सल्लाकळमनेर येथे वीज पुरवठा यवतमाळ ४५ किमी दूरवरच्या लाईनवरून होतो. त्यामुळे वीज पुरवठ्यात व पूर्ण दाबात कधीकधी अडचणी येतात. बरडगाव येथील १३२ केव्ही स्टेशन क्रियान्वित होताच या समस्या कायमच्या दूर होतील. नगरपंचायतीने कळमनेर येथेच आणखी एक ४० हॉर्स पॉवरची मोटार स्पेअरमध्ये ठेवल्यास अशाप्रसंगी वेळ वाचेल, असा सल्ला विद्युत कंपनीचे उपकार्यकारी अभियंता जितेश गजबे यांनी दिला.नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रपाणीपुरवठ्याच्या कामात हयगय करणाऱ्या संबंधितांवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे, असे नगरपंचायतच्या अध्यक्ष माला खसाळे यांनी सांगितले. कमी-अधिक विजेच्या दाबामुळे मोटारी जळाल्या आहेत. नगरपंचायतचे बहुतांश कर्मचारी निवडणूक ड्यूटीवर होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या कामात दुर्लक्ष झाले, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :water shortageपाणीकपात