शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

पैनगंगा नदी काठालगतच्या ५० गावांचा पाणी प्रश्न तीव्र

By admin | Updated: June 4, 2015 02:14 IST

इसापूर धरणातील पिण्याच्या पाण्यासाठीचा कोटा आरक्षित असतानाही सिंचन विभाग वेगवेगळे निकष लावत आहेत.

उमरखेड : इसापूर धरणातील पिण्याच्या पाण्यासाठीचा कोटा आरक्षित असतानाही सिंचन विभाग वेगवेगळे निकष लावत आहेत. नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी वेळोवेळी मागणी करूनही नदी काठालगतच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे. पाणी समस्या गंभीर झाली असल्याने या भागातील तहानलेल्या लोकांचा संयम सुटला आहे. पाणी समस्या सोडविण्यासोबतच या भागातील रखडलेल्या विकासकामांना गती मिळण्यासाठी माजी आमदार तथा वसंत साखर कारखाना अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यात सध्या दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असताना याकडे प्रशासनाचे बिलकुल लक्ष नाही. पावसाळ््याच्या दिवसांमध्ये नदीला मोठा पूर येतो, या पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतजमिनीचे दरवर्षी प्रचंड नुकसान होते. ही बाब सर्वश्रृत असताना उन्हाळ््यात मात्र नदीकाठच्या ५० हून अधिक गावांना पाण्यासाठी भटकावे लागते. दरवर्षी हा प्रकार सुरू असताना यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नच होत नसल्याचे दिसून येते. नागरिकांचे प्रश्न वेळेत निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी इतर कामांना बगल देऊन या कामांना प्राधान्य द्यावे, जनतेला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नये असा देखील इशारा नागरिकांनी दिला आहे. लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेऊन कामे केल्यास विकासकामे अधिक गतिमान होऊ शकतात. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून नव्हे तर जनतेच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याची शिवसेनेची तयारी आहे. त्यासाठी समन्वयाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अ‍ॅड़ बळीराम मुटकुळे, जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पांढरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबूराव कदम, हिमायतनगरचे किसनराव वानखडे, भगवंत चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत चव्हाण, संचालक बळवंत नाईक, प्रवीण सूर्यवंशी, उत्तम देवकते, सुदर्शन रावते, प्रवीण मिरासे, रमेश गायकवाड, धनंजय माने, विनायक कदम, रंजीत नलावडे, बबन कदम, प्रशांत पत्तेवार, कैलास वानखेडे, अविनाश कदम यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)