शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
4
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
5
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
6
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
7
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
8
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
9
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
10
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
11
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
12
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
13
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
14
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
15
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
16
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
17
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
18
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
19
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
20
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

३०० गावांत जलयुक्त शिवार

By admin | Updated: December 31, 2014 23:30 IST

अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या ३०० गावांत ‘जलयुक्त शिवार’ कार्यक्रम राबविला जाणार आहे.

दिलासा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवा संकल्पयवतमाळ : अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या ३०० गावांत ‘जलयुक्त शिवार’ कार्यक्रम राबविला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध योजना गावांमध्ये राबविल्या जाणार असून त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.‘जलयुक्त शिवार’ कार्यक्रमांतर्गत विहिरीचे अधिग्रहण आणि टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची निवड केली जाणार आहे. सिमेंट पोत्याचे बंधारे, ढाळीचे बंधारे, साखळी बंधारे आदींच्या माध्यमातून पाणी अडवून जिरविले जाईल. तालुका पातळीवर गावांची निवड करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली आहे. वनविभाग, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदींच्या माध्यमातून ही योजना यशस्वी करण्यात येईल. यासाठी स्वतंत्र निधी मिळणार नाही. मात्र संबंधित एजंसीला निधी निश्चितच वाढवून मिळणार आहे.सदर कार्यक्रम राबविण्यासाठी लोकप्रतिनिधींचीही मदत घेतली जाणार आहे. योजनेचे काम योग्यरीत्या होत आहे, की नाही यावर समितीच्या अध्यक्षांचे लक्ष राहणार असून दोषपूर्ण कामे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पाण्यासाठीचा खर्च पाण्यात जाणार नाही, यासाठी अधिकारी स्तरावर पूर्ण प्रयत्न केले जाणार आहे. यावर्षीचा पाणी टंचाई कृती आराखडा १० कोटींचा आहे. लोकांना पाण्यासाठी त्रास होणार नाही, यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेतले जाणार आहे.राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाला गती दिली जाणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिलेल्या सर्व विहिरी जून अखेरपर्यंत पूर्ण होतील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. कुठल्याही योजनेत गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी राजेश अडपावार, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते. (वार्ताहर)