शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

३०० गावांत जलयुक्त शिवार

By admin | Updated: December 31, 2014 23:30 IST

अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या ३०० गावांत ‘जलयुक्त शिवार’ कार्यक्रम राबविला जाणार आहे.

दिलासा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवा संकल्पयवतमाळ : अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या ३०० गावांत ‘जलयुक्त शिवार’ कार्यक्रम राबविला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध योजना गावांमध्ये राबविल्या जाणार असून त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.‘जलयुक्त शिवार’ कार्यक्रमांतर्गत विहिरीचे अधिग्रहण आणि टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची निवड केली जाणार आहे. सिमेंट पोत्याचे बंधारे, ढाळीचे बंधारे, साखळी बंधारे आदींच्या माध्यमातून पाणी अडवून जिरविले जाईल. तालुका पातळीवर गावांची निवड करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली आहे. वनविभाग, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदींच्या माध्यमातून ही योजना यशस्वी करण्यात येईल. यासाठी स्वतंत्र निधी मिळणार नाही. मात्र संबंधित एजंसीला निधी निश्चितच वाढवून मिळणार आहे.सदर कार्यक्रम राबविण्यासाठी लोकप्रतिनिधींचीही मदत घेतली जाणार आहे. योजनेचे काम योग्यरीत्या होत आहे, की नाही यावर समितीच्या अध्यक्षांचे लक्ष राहणार असून दोषपूर्ण कामे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पाण्यासाठीचा खर्च पाण्यात जाणार नाही, यासाठी अधिकारी स्तरावर पूर्ण प्रयत्न केले जाणार आहे. यावर्षीचा पाणी टंचाई कृती आराखडा १० कोटींचा आहे. लोकांना पाण्यासाठी त्रास होणार नाही, यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेतले जाणार आहे.राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाला गती दिली जाणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिलेल्या सर्व विहिरी जून अखेरपर्यंत पूर्ण होतील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. कुठल्याही योजनेत गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी राजेश अडपावार, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते. (वार्ताहर)