शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

वणी तालुक्यात खरिपाची ३० टक्के पेरणी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:33 IST

यंदा मॉन्सून अगदी वेळेवर दाखल झाल्याने व सुरूवातीच्या चार दिवसांत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने त्या बळावर शेतकऱ्यांनी कपाशीची टोबणी केली खरी; पण गेल्या तीन दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : कपाशी उदरातच करपण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा मॉन्सून अगदी वेळेवर दाखल झाल्याने व सुरूवातीच्या चार दिवसांत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने त्या बळावर शेतकऱ्यांनी कपाशीची टोबणी केली खरी; पण गेल्या तीन दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. येत्या २४ तासांत पाऊस न आल्यास टोबणी केलेले कपाशीचे बी धरित्रीच्या उदरातच करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मृग नक्षत्रावर पावसाचे आगमन झाले. सुरूवातीचे चार दिवस १०८ मि.मी.पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. हा पाऊस कायम राहील, या आशेवर शेतकºयांनी कपाशीच्या लागवडीला प्रारंभ केला. आजच्या तारखेत जवळपास ३० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. वणी तालुक्यात ६४ हजार ३० हेक्टर जमिन वहितीखाली आहे. त्यातील १३ हजार ७४० हेक्टरवर आजपर्यंत कपाशीची लागवड आटोपली आहे. ८६३ हेक्टरवर तूर पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत शेतात ओल असल्याने या पिकांची स्थिती उत्तम होती. बुधवारी पाऊस येईल, अशी आस लावून शेतकरी बसले होते. मात्र दिवसभर तीव्र उन्हं होते. वाढत्या तापमानाने जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. कर्ज काढून शेतात पेरलेले बियाणे करपून तर जाणार नाही ना, ही भीती शेतकºयांच्या मनात आहे. अद्याप शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीला सुरूवात केली नाही. मात्र आठ ते नऊ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार असल्याचा अंदाज तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Farmerशेतकरी