शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वणी तालुक्यात खरिपाची ३० टक्के पेरणी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:33 IST

यंदा मॉन्सून अगदी वेळेवर दाखल झाल्याने व सुरूवातीच्या चार दिवसांत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने त्या बळावर शेतकऱ्यांनी कपाशीची टोबणी केली खरी; पण गेल्या तीन दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : कपाशी उदरातच करपण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा मॉन्सून अगदी वेळेवर दाखल झाल्याने व सुरूवातीच्या चार दिवसांत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने त्या बळावर शेतकऱ्यांनी कपाशीची टोबणी केली खरी; पण गेल्या तीन दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. येत्या २४ तासांत पाऊस न आल्यास टोबणी केलेले कपाशीचे बी धरित्रीच्या उदरातच करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मृग नक्षत्रावर पावसाचे आगमन झाले. सुरूवातीचे चार दिवस १०८ मि.मी.पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. हा पाऊस कायम राहील, या आशेवर शेतकºयांनी कपाशीच्या लागवडीला प्रारंभ केला. आजच्या तारखेत जवळपास ३० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. वणी तालुक्यात ६४ हजार ३० हेक्टर जमिन वहितीखाली आहे. त्यातील १३ हजार ७४० हेक्टरवर आजपर्यंत कपाशीची लागवड आटोपली आहे. ८६३ हेक्टरवर तूर पिकाची पेरणी करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत शेतात ओल असल्याने या पिकांची स्थिती उत्तम होती. बुधवारी पाऊस येईल, अशी आस लावून शेतकरी बसले होते. मात्र दिवसभर तीव्र उन्हं होते. वाढत्या तापमानाने जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. कर्ज काढून शेतात पेरलेले बियाणे करपून तर जाणार नाही ना, ही भीती शेतकºयांच्या मनात आहे. अद्याप शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीला सुरूवात केली नाही. मात्र आठ ते नऊ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार असल्याचा अंदाज तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Farmerशेतकरी