शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेतून दीड काेटी लुटणाऱ्या चौघांच्या अटकेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

आर्णी शाखेतील प्राथमिक लेखापरीक्षणात ८९ लाख २७ हजार ५०१ रुपयांचा अपहार निष्पन्न झाला आहे. त्याबाबत बुधवारी उशिरा रात्री व्यवस्थापक रणजित गिरी यांच्या फिर्यादीवरून भादंविचे कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७७ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला गेला. आर्णी शाखेच्या व्यवस्थापक याेगिता पुसनायके (यवतमाळ), लेखापाल अमोल मुजमुले (जवळा), रोखपाल विजय गवई (यवतमाळ) व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे (सुकळी) यांना आरोपी बनविले गेले.

ठळक मुद्देफिर्याद ८९ लाखांची : आकडा आणखी वाढण्याचा अंदाज, ‘लाभा’चे नेमके ‘वाटेकरी’ किती आणि कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहार प्रकरणात आधी निलंबन कारवाई व बुधवारी उशिरा रात्री फौजदारी गुन्हे दाखल झाल्याने आता अपहार करणाऱ्या आरोपींच्या अटकेची तेवढी प्रतीक्षा आहे. आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव या आरोपींच्या मुसक्या केव्हा आवळतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आर्णी शाखेतील प्राथमिक लेखापरीक्षणात ८९ लाख २७ हजार ५०१ रुपयांचा अपहार निष्पन्न झाला आहे. त्याबाबत बुधवारी उशिरा रात्री व्यवस्थापक रणजित गिरी यांच्या फिर्यादीवरून भादंविचे कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७७ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला गेला. आर्णी शाखेच्या व्यवस्थापक याेगिता पुसनायके (यवतमाळ), लेखापाल अमोल मुजमुले (जवळा), रोखपाल विजय गवई (यवतमाळ) व कंत्राटी कर्मचारी अंकित मिरासे (सुकळी) यांना आरोपी बनविले गेले. आता त्यांच्या अटकेची फसवणूक झालेल्या खातेदारांना प्रतीक्षा आहे. यातील तिघांना आधीच निलंबित केले गेले होते, तर अंकितची सेवा कंत्राटी असल्याने संपुष्टात आणण्यात आली. जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेत गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानेरक्कम सुरक्षित आहे की नाही, हे तपासण्यासाठी खातेदारांची गर्दी होत आहे. गुरुवारीही बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. बँकेबाहेर खातेदारांना रांग लावावी लागली. फिर्याद ८९ लाखांच्या अपहाराची दिली गेली असली तरी प्रत्यक्षात गुरुवारीसुद्धा आणखी डझनभर खातेदारांनी तक्रारी केल्या. त्यांच्या तक्रारीनुसार ११ लाख १० हजारांच्या रकमेचा अपहार झाल्याचा आकडा जुळतो आहे.  गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण ७० तक्रारी बॅंकेला प्राप्त झाल्या असून त्यात सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम गहाळ असल्याचे आढळून आले, अशी माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली. आणखीही तक्रारी बँकेला प्राप्त होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. कारण बँकेत पोत्यामधून रोकड घेऊन येताना काही चेहरे दिसतात. सीसीटीव्हीमध्येही संचालक मंडळाने त्यांच्या हालचाली टिपल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही आरोपी बनविले  जावू शकते.  जिल्हा बँक अध्यक्षांनी शब्द पाळला आर्णी शाखेतील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. संचालक मंडळ बैठकीतही एका-दोघांचा विरोध झुगारून संबंधित तिघांना तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला. केवळ निलंबनावरच कारवाई थांबणार नसून, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, अशी घोषणा कोंगरे यांनी केली होती. अखेर बुधवारी गुन्हे दाखल झाले आणि कोंगरे यांनी आपला शब्द खरा केला. गुन्हे दाखल व्हावे म्हणून त्यांनी काही अनुभवी संचालकांना सोबत घेऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेत त्यांना तीव्रता पटवून दिली.  

आरोपींचे बॅंक खाते, लाॅकर ‘सील’ करण्याचे आदेश आर्णी शाखेतील गैरव्यवहाराचे प्रकरण केवळ निलंबन व फौजदारीवर थांबणार नाही, तर खातेदारांचा एक-एक रुपया त्यांना परत केला जाईल, त्यासाठी आरोपींची मालमत्ता जप्त करून त्यातून ही वसुली केली जाईल, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गहाळ रक्कम चौघांकडूनही वसूल करायची असल्याने त्यांची सर्व बँक खाती सील करण्यात आली आहेत. जिल्हा बँकेच्या सर्व शाखांना त्याबाबत पत्र देण्यात आले. या चौघांनाही आर्णी शाखेत येण्यास मनाई असून, ते आल्यास त्यांच्यावर कायम वॉच राहणार असल्याचेही कोंगरे यांनी सांगितले. हा गैरव्यवहार आर्णी शाखेपुरताच मर्यादित आहे. त्यामुळे इतर शाखेच्या खातेदारांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांच्या रकमा सुरक्षित असल्याचे प्रा. टिकाराम कोंगरे यांनी स्पष्ट केले. 

‘लोकमत’चा दणका आर्णी शाखेतील लाखो रुपयांचा गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या वृत्तमालिकेमुळे नागरिकांना आपल्या खात्यातील रकमा गहाळ झाल्याचे कळले. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळेच या गैरव्यवहारातील दोषींचे निलंबन व त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकली. आरोपींची अटक, त्यांच्या मालमत्तेची जप्ती, त्यातून वसुली व खातेदारांचे गेलेेले पैसे परत मिळेपर्यंत ‘लोकमत’चा हा पाठपुरावा कायम राहणार आहे.

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे जाणार - जाधव आर्णीचे ठाणेदार पितांबरराव जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आर्णी शाखेतील ८९ लाखांच्या अपहाराचा तपास सध्या माझ्याकडे आहे. परंतु आर्थिक गुन्हा असल्याने व त्याची व्याप्ती मोठी असल्याने हा तपास यवतमाळच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाईल. आरोपी अद्याप अटक नसून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. 

संचालक पोलीस अधीक्षकांना भेटले आर्णी शाखेतील गैरव्यवहार प्रकरणी फिर्याद दाखल करण्यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम काेंगरे यांच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांची भेट घेतली. अशा प्रकरणात पोलीस सहसा ऑडिट रिपोर्टची मागणी करतात व नंतरच गुन्हा दाखल करतात. परंतु, आर्णी प्रकरणात प्राथमिक अंकेक्षण अहवालावरून गुन्हा नोंदविण्याची विनंती करताना एसपींना या प्रकरणाची व्याप्ती पटवून देण्यात आली. त्यानुसार, फिर्याद येताच तत्काळ गुन्हा नोंदविला गेला. या शिष्टमंडळात बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, माजी अध्यक्ष मनीष पाटील, संचालक राजुदास जाधव, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांचा समावेश होता. 

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी