शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

तीन लाख चिमुकल्यांची प्रतीक्षा संपली, पहिलीचेही वर्ग भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 5:00 AM

सध्या शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. मात्र, शहरी भागातील पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग अद्यापही बंदच आहेत. याबाबत गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा ठेवला. त्यात १ डिसेंबरपासून प्राथमिकचे सर्वच वर्गही सुरू करण्याचा निर्णय झाला. 

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सलग पावणेदोन वर्षापासून घरातच बंदिस्त झालेल्या पहिली-दुसरीच्या  चिमुकल्यांसाठी खुशखबर आहे. येत्या बुधवारपासून प्राथमिक शाळेचे वर्गही ऑफलाइन सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ३ लाख १४  हजार विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वर्गमित्रांच्या गोतावळ्यात रममाण होण्याची संधी मिळणार आहे. सध्या शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. मात्र, शहरी भागातील पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग अद्यापही बंदच आहेत. याबाबत गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा ठेवला. त्यात १ डिसेंबरपासून प्राथमिकचे सर्वच वर्गही सुरू करण्याचा निर्णय झाला. या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्राथमिक आणि उच्च प्राथमिकचे सर्वच वर्ग बुधवारपासून प्रत्यक्ष सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. सध्या हे वर्ग बंद असले तरी दररोज शिक्षकांची शाळेत ड्यूटी लावण्यात आली आहे. आता बुधवारपासून प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात केली जाणार आहे. 

आश्रमशाळांचा मात्र निर्णय नाही - राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्य मंडळाच्या शाळांमधील प्राथमिकचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू केले जाणार आहेत. त्यासोबतच सीबीएसई शाळांचेही वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, आश्रमशाळांमधील प्राथमिकचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या शाळा निवासी स्वरूपाच्या असल्याने त्याबाबत आदिवासी विकास विभाग, तसेच समाजकल्याण विभागाच्या स्वतंत्र निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे.

वसतिगृहांचा निर्णय कधी होणार ? - पहिलीपासूनचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिकचे वर्ग आधीच सुरू झाले आहे. मात्र एसटीचा संप आणि बंद असलेली वसतिगृहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. याबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वसतिगृह सुरू करण्याबाबतही निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

शासन आदेशानुसार वर्ग सुरू करण्याची आपली सर्व तयारी झाली आहे. या वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांना सोशल डिस्टन्स, मास्क या नियमांचे पालन करावे लागेल. आपल्या सर्व शाळा यापूर्वीच सॅनिटायइझ झाल्या आहेत. तरीही हात धुण्यासाठी प्रत्येक शाळेत साबण व पाण्याची व्यवस्था केली आहे. तापमापी, पल्स ऑक्सिमीटर ठेवले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. -प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी प्राथमिक

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या