शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

तीन लाख चिमुकल्यांची प्रतीक्षा संपली, पहिलीचेही वर्ग भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

सध्या शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. मात्र, शहरी भागातील पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग अद्यापही बंदच आहेत. याबाबत गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा ठेवला. त्यात १ डिसेंबरपासून प्राथमिकचे सर्वच वर्गही सुरू करण्याचा निर्णय झाला. 

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सलग पावणेदोन वर्षापासून घरातच बंदिस्त झालेल्या पहिली-दुसरीच्या  चिमुकल्यांसाठी खुशखबर आहे. येत्या बुधवारपासून प्राथमिक शाळेचे वर्गही ऑफलाइन सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ३ लाख १४  हजार विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वर्गमित्रांच्या गोतावळ्यात रममाण होण्याची संधी मिळणार आहे. सध्या शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. मात्र, शहरी भागातील पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग अद्यापही बंदच आहेत. याबाबत गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा ठेवला. त्यात १ डिसेंबरपासून प्राथमिकचे सर्वच वर्गही सुरू करण्याचा निर्णय झाला. या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्राथमिक आणि उच्च प्राथमिकचे सर्वच वर्ग बुधवारपासून प्रत्यक्ष सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. सध्या हे वर्ग बंद असले तरी दररोज शिक्षकांची शाळेत ड्यूटी लावण्यात आली आहे. आता बुधवारपासून प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात केली जाणार आहे. 

आश्रमशाळांचा मात्र निर्णय नाही - राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्य मंडळाच्या शाळांमधील प्राथमिकचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू केले जाणार आहेत. त्यासोबतच सीबीएसई शाळांचेही वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, आश्रमशाळांमधील प्राथमिकचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या शाळा निवासी स्वरूपाच्या असल्याने त्याबाबत आदिवासी विकास विभाग, तसेच समाजकल्याण विभागाच्या स्वतंत्र निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे.

वसतिगृहांचा निर्णय कधी होणार ? - पहिलीपासूनचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिकचे वर्ग आधीच सुरू झाले आहे. मात्र एसटीचा संप आणि बंद असलेली वसतिगृहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. याबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वसतिगृह सुरू करण्याबाबतही निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

शासन आदेशानुसार वर्ग सुरू करण्याची आपली सर्व तयारी झाली आहे. या वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांना सोशल डिस्टन्स, मास्क या नियमांचे पालन करावे लागेल. आपल्या सर्व शाळा यापूर्वीच सॅनिटायइझ झाल्या आहेत. तरीही हात धुण्यासाठी प्रत्येक शाळेत साबण व पाण्याची व्यवस्था केली आहे. तापमापी, पल्स ऑक्सिमीटर ठेवले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. -प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी प्राथमिक

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या