शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विधान परिषदेसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने परिषदेची यवतमाळातील ही जागा रिक्त झाली. त्यासाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने नागपुरातील माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांना रिंगणात उतरविले आहे. तर भाजपने सुमित बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे.

ठळक मुद्दे४८९ मतदार : सात मतदान केंद्र, महाविकास आघाडी-भाजपात थेट लढत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत असून शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी त्याकरिता मतदान घेतले जाणार आहे.प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने परिषदेची यवतमाळातील ही जागा रिक्त झाली. त्यासाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने नागपुरातील माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांना रिंगणात उतरविले आहे. तर भाजपने सुमित बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. चार अपक्षांनीही या रिंगणात उडी घेतली होती. परंतु त्यांना हा उत्साह अखेरपर्यंत टिकविता आला नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये थेट लढत पहायला मिळणार आहे.जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपरिषदा, नगर पंचायतींचे सदस्य आणि १६ पंचायत समित्यांचे सभापती असे मिळून एकूण ४८९ मतदार या मतदारसंघात आहे. उपविभागीय मुख्यालय असलेल्या सात ठिकाणी मतदान केंद्रे राहणार आहेत. शुक्रवारी सकाळपासून या मतदानाला सुरुवात होईल. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.विधान परिषदेच्या रिंगणातील या दोन्ही उमेदवारांच्या नेत्यांनी आपल्याकडे तीनशे पेक्षा अधिक मतदार असल्याचा दावा केला आहे. यापैकी कुणाचा दावा खरा ठरतो हे ४ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना अशा तीन पक्षांचे मतदार सांभाळताना महाविकास आघाडीचे नेते वनमंत्री संजय राठोड यांची कसरत होताना पहायला मिळत आहे. भाजपची कमांड माजी राज्यमंत्री तथा यवतमाळचे आमदार मदन येरावार यांच्या हाती आहे. भाजपच्या उमेदवाराने आपल्या पक्षाचे व समर्थक मतदारांना एकसंघ ठेवण्यासोबतच अन्य पक्षातील काठावरच्या व अस्थिर मतदारांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न केले. त्यात बऱ्यापैकी त्यांना यश आल्याचेही सांगितले जाते.दोन्ही प्रमुख उमेदवारांनी आपले मतदार दुसºयाच्या गळ्याला लागू नये म्हणून खास खबरदारी घेतली आहे. त्यासाठी बहुतांश मतदारांना राज्याबाहेर देवदर्शन व पर्यटनाला पाठविण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी किंवा शुक्रवारी सकाळी हे मतदार यवतमाळात परतणार आहेत. विधान परिषदेच्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ‘घोडेबाजार’ झाला आहे. अर्थकारणातून दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. क्रॉस व्होटींग सिद्ध करणे कठीण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने दोन्ही बाजूकडून पक्षाच्या अधिकृत मतदारांना क्रॉस व्होटींगसाठी जोर दिला जात आहे.अवैध मतदान, क्रॉस व्होटींग टाळण्याचे आव्हानविधान परिषदेच्या या निवडणुकीत अवैध ठरणारे मतदान आणि क्रॉस व्होटींग टाळण्याचे आव्हान दोन्ही उमेदवारांपुढे प्रकर्षाने राहणार आहे. त्यातही महाविकास आघाडीत तीन पक्ष असल्याने त्यांच्यापुढील हे आव्हान आणखी गडद आहे. अवैध मतांचा फटका उमेदवारांंना बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषद