शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गावोगावी श्रमदान, श्रमाला प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:20 PM

दुष्काळाचा सामना करणाऱ्या तालुक्यात अनेक गावांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत गाव पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. या गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंगळवारी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शिवारात पोहचून श्रमदान केले. त्यांच्या श्रमदानाने सर्वसामान्य गावकऱ्यांना नवा हुरूप आला आहे.

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनचे तुफान : महिला शिक्षणाधिकारी राबल्या शिरोली, ससानी, कुंभारीत

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : दुष्काळाचा सामना करणाऱ्या तालुक्यात अनेक गावांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत गाव पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. या गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंगळवारी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शिवारात पोहचून श्रमदान केले. त्यांच्या श्रमदानाने सर्वसामान्य गावकऱ्यांना नवा हुरूप आला आहे.पाणी फाऊंडेशन अंतर्गत ‘सत्यमेव-जयते’ वॉटर कप स्पर्धा सुरु आहे. यात घाटंजी तालुक्यातून ४८ गावांनी सहभाग घेतला आहे. या सर्व गावांमध्ये श्रमदानाचे एकप्रकारे तुफान आले आहे. प्रत्येक गावातील आबालवृद्ध, सर्व नागरिक, विविध संघटना सहभाग नोंदवून स्वयंस्फूर्तपणे श्रमदान करीत आहे. त्यातच जिल्ह्याच्या ठिकाणावरुन येऊन शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी गावकºयांना नवा उत्साह दिला. त्यांच्या सोबत शिक्षक आणि विद्यार्थीही श्रमदानात सहभागी झाले आहे. शिक्षणाधिकारी डॉ. पाटेकर यांनी ससानीे, कुंभारी येथे हातात टिकास-पावडे घेऊन श्रमदान केले. शिरोली येथे तर भरदुपारी त्यांनी श्रमदान केले. उन्हाची तमा न बाळगता महिला अधिकारी गावापासून ते श्रमदानाच्या ठिकाणापर्यंत एक ते दीड किलोमीटर पायी चालत गेल्या. हे पाहून गावकऱ्यांचा उत्साह वाढला.येणाऱ्या पिढीसाठी जलसाठे भरपूर असावे. आपल्या चिमुकल्यांची पाण्यासाठीची पायपीट थांबावी म्हणून राबणाऱ्या हाताना आपल्या मदतीची जोड मिळावी असे मत शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी व्यक्त केले. शिक्षणाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आॅनलाईन लिंक तयार करून शिक्षकांना या श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी घाटंजी तालुक्यात विविध गावांमध्ये शिक्षणाधिकारी पोहचल्या असता शिक्षकांनीही त्या-त्या ठिकाणी धाव घेवून श्रमदान केले. विशेष म्हणजे, शिक्षणाधिकारी डॉ. पाटेकर यांनी मागील वर्षीही राळेगाव तालुक्यात श्रमदान केले होते.दारव्हा शहरवासीयांनी काढली ‘वॉटर कप रॅली’दारव्हा : वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दारव्हा शहरात मंगळवारी वॉटर कप रॅली काढण्यात आली. या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव-जयते’ वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ५५ गावे सहभागी झाली आहे. गावकरी श्रमदानाद्वारे गावाच्या विकासासाठी झटत आहे. विविध प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परंतु गावकºयांचा उत्साह कायम राहावा तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, शहरातील नागरिकांचा सुद्धा या कार्यात सहभाग वाढावा यासाठी जनजागृतीची गरज आहे. त्या दृष्टीने तहसीलदार कार्यालयातून रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत रॅलीचा तहसील परिसरात समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. पाण्याचे महत्व लक्षात घेता या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी दारव्हा शहरवासीयांना केले. पानठेल्याभोवती गर्दी करणाºया युवकांना उद्देशून ते म्हणाले भविष्यात पानठेल्या ऐवजी पाणी ठेले निर्माण झाले पाहिजे असे कार्य करा. सूत्रसंचालन गणेश भोयर यांनी केले. या रॅलीत मॉर्निंग वॉक ग्रुप, चैतन्य ग्रुप, व्यापारी संघटना, वकील संघटना, डॉक्टर संघटना, मेडीकल असोसिएशन, पत्रकार संघ, ज्येष्ठ नागरिक, महिला मंच यासह अधिकारी, कर्मचारी, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.