शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गटातटाच्या राजकारणात विकासाला ग्रहण; ढाणकीत नगर पंचायत होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 14:54 IST

ढाणकीचा विकास राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे खुंटल्याची ओरड आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

यवतमाळ : खेड्याचे शहर झाले की, प्रत्येकालाच गावाचा विकास होईल, असे वाटते. मात्र, ही बाब प्रत्येक गावाला लागू होईल, असे नाही. येथेही तसेच झाले. ढाणकीत नगर पंचायत स्थापन होऊनही केवळ गटातटाच्या राजकारणामुळे विकासाला ग्रहण लागले आहे.

ढाणकी ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर होऊन आता दोन वर्षांचा कालावधी लोटला. तरीही गावाची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. गावात कोणताही नवीन उपक्रम राबविण्यात आलेला नाही. केवळ नगर पंचायत कर्मचारी कर वसुलीसाठी येतात, तेव्हाच पावतीवर बघून आपण ढाणकी शहरात आहोत, असे शहरवासीयांना वाटते. शहराचा विकास राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे खुंटल्याची ओरड आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

नगर पंचायतीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळलेले नाही. त्यामुळे आपली सत्ता नगर पंचायतीमध्ये यावी म्हणून प्रत्येक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे. मंगळवारी झालेल्या विषय समिती सभापतींच्या निवडणुकीत हेच चित्र दिसून आले. या निवडीतून भाजपने सपशेल माघार घेतल्याने केवळ दोनच समित्या गठित होऊ शकल्या. महाविकास आघाडीनेसुद्धा ताठर भूमिका घेतल्याने शहरामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहराला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. मात्र, राजकारणी केवळ सत्तेसाठी झगडत असल्याचे नागरिकांचे मत आहे. शहरात एकही सार्वजनिक शौचालय नाही. नगर पंचायत होऊन दोन वर्षे झाली तरी कोणत्याही नगरसेवकाने याकडे लक्ष दिलेले नाही. स्वच्छ भारत मोहीम सुरू असताना प्रभाग क्रमांक १४ मध्ये महिलांची आजही उघडी ‘गोदरी’ आहे. तेथे नगर पंचायतीच्यावतीने सार्वजनिक शौचालय बांधणे अत्यंत गरजेचे असताना नगर पंचायत त्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होत आहे.

महिलांना जावे लागते उघड्यावर

शहरात शौचालयांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक प्रभागांतील महिलांना उघड्यावरच प्रात:विधीसाठी जावे लागत आहे. नगरसेवक सभागृहात या प्रश्नांवर का बोलत नाहीत, हाच मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. सत्ता केवळ कमाईचे साधन झाले असून, नागरिकांचे प्रश्न आहेत तसेच कायम आहेत. विकासाला कोणी वाली मिळणार की, गटातटाच्या राजकारणात पाच वर्षे निघून जाणार, असा प्रश्न आहे. मात्र, पक्षीय राजकारणात सामान्य नागरिकांचा बळी जात आहे, हे मात्र खरे.

टॅग्स :PoliticsराजकारणRural Developmentग्रामीण विकास