शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

गटातटाच्या राजकारणात विकासाला ग्रहण; ढाणकीत नगर पंचायत होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 14:54 IST

ढाणकीचा विकास राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे खुंटल्याची ओरड आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

यवतमाळ : खेड्याचे शहर झाले की, प्रत्येकालाच गावाचा विकास होईल, असे वाटते. मात्र, ही बाब प्रत्येक गावाला लागू होईल, असे नाही. येथेही तसेच झाले. ढाणकीत नगर पंचायत स्थापन होऊनही केवळ गटातटाच्या राजकारणामुळे विकासाला ग्रहण लागले आहे.

ढाणकी ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर होऊन आता दोन वर्षांचा कालावधी लोटला. तरीही गावाची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. गावात कोणताही नवीन उपक्रम राबविण्यात आलेला नाही. केवळ नगर पंचायत कर्मचारी कर वसुलीसाठी येतात, तेव्हाच पावतीवर बघून आपण ढाणकी शहरात आहोत, असे शहरवासीयांना वाटते. शहराचा विकास राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे खुंटल्याची ओरड आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

नगर पंचायतीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळलेले नाही. त्यामुळे आपली सत्ता नगर पंचायतीमध्ये यावी म्हणून प्रत्येक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहे. मंगळवारी झालेल्या विषय समिती सभापतींच्या निवडणुकीत हेच चित्र दिसून आले. या निवडीतून भाजपने सपशेल माघार घेतल्याने केवळ दोनच समित्या गठित होऊ शकल्या. महाविकास आघाडीनेसुद्धा ताठर भूमिका घेतल्याने शहरामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहराला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. मात्र, राजकारणी केवळ सत्तेसाठी झगडत असल्याचे नागरिकांचे मत आहे. शहरात एकही सार्वजनिक शौचालय नाही. नगर पंचायत होऊन दोन वर्षे झाली तरी कोणत्याही नगरसेवकाने याकडे लक्ष दिलेले नाही. स्वच्छ भारत मोहीम सुरू असताना प्रभाग क्रमांक १४ मध्ये महिलांची आजही उघडी ‘गोदरी’ आहे. तेथे नगर पंचायतीच्यावतीने सार्वजनिक शौचालय बांधणे अत्यंत गरजेचे असताना नगर पंचायत त्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होत आहे.

महिलांना जावे लागते उघड्यावर

शहरात शौचालयांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक प्रभागांतील महिलांना उघड्यावरच प्रात:विधीसाठी जावे लागत आहे. नगरसेवक सभागृहात या प्रश्नांवर का बोलत नाहीत, हाच मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. सत्ता केवळ कमाईचे साधन झाले असून, नागरिकांचे प्रश्न आहेत तसेच कायम आहेत. विकासाला कोणी वाली मिळणार की, गटातटाच्या राजकारणात पाच वर्षे निघून जाणार, असा प्रश्न आहे. मात्र, पक्षीय राजकारणात सामान्य नागरिकांचा बळी जात आहे, हे मात्र खरे.

टॅग्स :PoliticsराजकारणRural Developmentग्रामीण विकास