शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

फार्मर कप स्पर्धेतून विदर्भातील तालुके वगळले

By रूपेश उत्तरवार | Updated: May 30, 2023 11:28 IST

पाणीदार गावे झाली उजाड : गावकरी म्हणतात आमचे चुकले कुठे

रूपेश उत्तरवार

यवतमाळ : गावांमध्ये जलसमृद्धी आणण्याचे काम वॉटर कप स्पर्धेने हाती घेतले होते. यामध्ये वाहते पाणी थांबविणे आणि ते जमिनीत मुरविणे या दोन मुख्य बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. राज्यातील अनेक गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. पाणी टंचाई भासणारी गावे यातून पाणीदार होण्यास सुरुवात झाली होती. जलसमृद्ध गावे विकासाच्या दिशेने पाऊल टाकत असताना यंदा मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक तालुक्यांना यातून वगळण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे.

कृषी विभाग आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात तीन वर्षांपासून वॉटर कप स्पर्धा घेतली जात होती. २०१७ ते २०२१ या कालावधीत ही योजना गाव पातळीवर राबविण्यात आली. या योजनेला नागरिकांचा प्रचंड लोकसहभाग मिळाला. यातील अनेक गावांना १० लाख रुपयांचे प्रथम बक्षिसही मिळाले. यातून गावात विकासकामे झाली. पाणी बचतीवर नागरिकांनी भर दिला. गावे पाणीदार होण्यास मदतही मिळाली.

आता वॉटर कप स्पर्धेचे स्वरूप बदलले आहे. या स्पर्धेला यंदा ‘फार्मर कप’ असे नाव देण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांसोबत ‘पाणी बचत’ या विषयावर काम केले जात आहे. १८ महिन्यांच्या या स्पर्धेत सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, जैविक कीड नियंत्रण या विषयांवर भर देण्यात आला. ही स्पर्धा शेतकऱ्यांनी आपल्या पातळीवर राबवायची आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतानाही या स्पर्धेतून या ठिकाणच्या अनेक जिल्ह्यांना, काही तालुक्यांना वगळण्यात आले आहे. परिणामी, विदर्भ आणि मराठवाड्यातील वॉटर कप स्पर्धेत विजयी झालेली गावे या स्पर्धेत राहिली नाहीत.

या गावांना फार्मर कप स्पर्धेत सहभागी केले असते, तर काही नवे बदल घडविता आले असते. त्यातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असता. आता या स्पर्धेत या गावांचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

असे आहेत वगळलेले जिल्हे

या स्पर्धेतून संपूर्ण यवतमाळ आणि नांदेड जिल्हा वगळण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांतील तालुके यात नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये अमरावतीमधील वरूड, वर्धेतील आर्वी, अकोलामधील बार्शीटाकळी आणि वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर, कारंजा तालुका घेण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांचा यात समावेश आहे. इतर तालुक्यांना वगळण्यात आले आहे. यामुळे स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गावांची निराशा झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील ५४७ गावांकडे पाठ

या योजनेत तीन वर्षांत यवतमाळ जिल्ह्यातील ५४७ गावांनी सहभाग नोंदविला होता. यात सहा तालुक्यांतील ४६ गावे विजयी झाली होती. त्यांना प्रत्येकी १० लाखांची बक्षीस रक्कम मिळाली. ही सर्व गावे नवीन स्पर्धेतून वगळण्यात आली आहेत.

वॉटर कप स्पर्धेत सर्वच ठिकाणचा उत्तम प्रतिसाद राहिला. अनेक ठिकाणी पाण्याची साठवण क्षमता वाढली. आजही या ठिकाणी काम होत आहे. आता नवीन स्पर्धेत या गावांचा समावेश नाही.

- अशोक बगाडे, माजी जिल्हा समन्वयक, वॉटर कप स्पर्धा.

टॅग्स :agricultureशेतीYavatmalयवतमाळWaterपाणी