शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आरटीईतील बदलाने विदर्भाला झाला फायदा

By अविनाश साबापुरे | Updated: May 17, 2024 17:00 IST

चार हजार जागा वाढल्या : गडचिरोली वगळता सर्वत्र शाळाही वाढल्या

यवतमाळ : यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत सरकारने केलेले बदल न्यायालयाने स्थगित केले. आता शुक्रवारपासून सुधारित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या उलथापालथीत विदर्भातील गोरगरीब विद्यार्थ्यांचा घसघशीत फायदा होणार आहे. कारण बदललेल्या प्रक्रियेत मोफत शाळा प्रवेशासाठी विदर्भात तब्बल चार हजार जागा मागील वर्षीच्या तुलनेत वाढल्या आहेत. तर गडचिरोली वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये शाळांची संख्याही वाढली आहे.

मागील वर्षी म्हणजेच २०२३-२४ या सत्रात आरटीई अंतर्गत मोफत शाळा प्रवेशासाठी विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये दोन हजार १८२ शाळांनी सहभाग घेतला होता. परंतु, यंदा २०२४-२५ या सत्राच्या प्रवेश प्रक्रियेत विदर्भातील दोन हजार २४८ शाळांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी १७ हजार ७१७ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव करण्यात आल्या होत्या. त्यातुलनेत यंदा राखीव जागा तीन हजार ९७१ इतक्या वाढून एकूण राखीव जागांची संख्या २१ हजार ६८८ इतकी झाली आहे.

हीच बाब विदर्भाव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातही घडली आहे. यंदा राज्य शासनाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला खासगी अनुदानित, स्वयंअर्थसहायित शाळांसोबतच शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचीही नोंदणी बंधनकारक केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल ७६ हजार ५३ शाळांची नोंदणी झाली होती. तर आठ लाख ८६ हजार ४११ इतक्या जागा राखीव दाखविण्यात आल्या होत्या. परंतु, अर्ज भरताना खासगी स्वयअर्थसहायित शाळांच्या जागाच दिसत नसल्याने पालकांचा रोष वाढला होता. या प्रकरणात न्यायालयाने शासनाने केलेल्या बदलांना स्थगिती दिली. आता १७ ते ३१ मेपर्यंत जुन्यात पद्धतीने पालकांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अनुदानित, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा वगळल्याने आता शाळांची संख्याही घटली आहे. परंतु, मागील वर्षीचा विचार करता शाळांची ही संख्या अधिक आहे. यंदा महाराष्ट्रातील नऊ हजार १३९ शाळांनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन एक लाख दोन हजार ४३६ जागा राखीव ठेवल्या आहेत. तर मागील वर्षी आठ हजार ८२८ शाळांनी नोंदणी करुन एक लाख एक हजार ९६९ जागा राखीव ठेवल्या होत्या. त्यामुळे यंदा ३११ शाळा आणि ४६७ जागा वाढलेल्या आहेत.

विदर्भात असा झाला फायदाजिल्हा : मागील शाळा/जागा : यंदाच्या शाळा/जागाअकोला : १९०/१२१५                 : १९६/२०१०अमरावती : २३६/१९९८              : २३१/२३६९बुलडाणा : २२७/१७७८               : २३४/२५८१यवतमाळ : १९४/२४४०                : २१०/१९६६वाशिम : ९९/९५०                         : १०९/९५३चंद्रपूर : १८६/१८४६                      : १९९/१५१६गडचिरोली : ६६/१५७४                : ६६/४८४भंडारा : ८९/९५५                           : ९१/७७२गोंदिया : १३१/१२२५                     : १३२/९०३नागपूर : ६५३/२६१८                     : ६५५/६९२०वर्धा : १११/१११८                              : १२६/१२१४एकूण : २१८२/१७,७१७                  : २२४९/२१,६८८

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाVidarbhaविदर्भYavatmalयवतमाळ