शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांकडून मातीमोल दरात भाजीपाल्याची खरेदी होते आणि ग्राहकांना चढ्या दरात विकून व्यापारी दोन पैसे मिळवितात. या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होते. भाजीपाला दोन पैसे मिळवण्यासाठी लावला असताना खिशातूनच सर्व पैसे जातात. त्यात बदलत्या हवामानाने कीड नियंत्रण करणेही अशक्य होत आहे. व्यापारी नफा ठेवून शेतमालाची विक्री करतात. हा नियम शेतकऱ्यांसाठी मात्र पायदळी तुडवण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परंपरागत पिकाला पर्याय म्हणून नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवड करण्यात येते. तत्काळ पैसे हातात येतात. या मोहापायी अनेक जण भाजीपाला लावतात, मात्र विक्रीसाठी गेल्यावर हातात पैसे येत नाहीत. उलट खिशातून पैसे जातात. शेतकऱ्यांकडून मातीमोल दरात भाजीपाल्याची खरेदी होते आणि ग्राहकांना चढ्या दरात विकून व्यापारी दोन पैसे मिळवितात. या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होते. भाजीपाला दोन पैसे मिळवण्यासाठी लावला असताना खिशातूनच सर्व पैसे जातात. त्यात बदलत्या हवामानाने कीड नियंत्रण करणेही अशक्य होत आहे. व्यापारी नफा ठेवून शेतमालाची विक्री करतात. हा नियम शेतकऱ्यांसाठी मात्र पायदळी तुडवण्यात आला आहे. वाटेल त्या दरात शेतमालाची खरेदी करायची आणि ग्राहकांना नफा ठेवून विक्री करायची, असेच समीकरण आहे.  

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना... 

यावर्षी मी अडीच एकरमध्ये भाजीपाला लावला होता. वांगे दोन वेळेस जळाले. बरबटी दीड एकरामध्ये लावली आहे. त्याचा तोडण्याचा खर्च ७०० रुपये होता. हातात ५०० रुपयांची पट्टी आली. - प्रवीण ठाकरे

भाजीपाला लावणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. साधा निंदणाचा खर्चही निघत नाही. हातात पाच पैसे पडत नाहीत. एखाद्या वेळेस भाव मिळतो, मात्र बारमाही भाजीपाल्याचे दर पडलेलेच असतात. याचा फायदा व्यापाऱ्यांनाच होतो. - अविनाश तिडके

ग्राहकांना परवडेना 

कोरोनामुळे रोजगार गेला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक पैसा महत्त्वाचा असताना महागड्या दरात भाजीपाला खरेदी करणे परवडत नाही. प्रत्येकांस आहारामध्ये विविध जीवनसत्त्व मिळविण्यासाठी भाजी घ्यावी लागते.        - रोशनी देवकते

मुख्य बाजारपेठेतील शेतमालाचे दर आणि भाजी मंडीतील शेतमालाचे दर यामध्ये दरवेळेस मोठी तफावत पाहायला मिळते. याच प्रमुख कारणाने मोठ्या मंडीतून भाजीपाल्याची खरेदी होते. - प्रियंका वानखडे

भावात एवढा फरक का?भाजीपाल्याची खरेदी करताना त्याची बोली लावली जाते. ही बोली कमीत कमी किती रुपयांची असावी, याबाबत कुठलेही निर्बंध नाहीत. यामुळे व्यापारी वाटेल तितक्या दरापासून खरेदीसाठी सर्रास सुरू करतात. खरेदी झालेला शेतमाल विक्रीसाठी निर्बंध नाही. नफा ठरवून विक्री होते.

 

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या