लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या माथी बोगस बीटी बियाणे थोपविण्यासाठी अनधिकृत विक्रेत्यांनी नामांकित कंपनीच्या नावाचा वापर सुरू केला आहे. याच्या विक्रीसाठी स्थानिकांची मदत घेतली जात आहे. यामुळे शेतकरी बुचकळ्यात सापडले आहे.
जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर यावर्षी कापसाची लागवड होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २५ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. अद्याप ७५ टक्के क्षेत्रावरील लागवड बाकी आहे. तीन लाख ७५ हजार हेक्टरवरील कापसाची लागवड बाकी आहे. या लागवडीसाठी एचटीबीटी हे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी अनधिकृत विक्रेत्यांनी विविध योजना हाती घेतल्या आहेत.
गावातील सुशिक्षित बेरोजगारांना आणि शेतकऱ्यांना हाताशी धरून ही विक्री केली जात आहे. यामुळे बोगस बीटी बियाण्याची विक्री सुलभ होण्यास मदत झाली आहे. हे बियाणे थेट गावात पोहचविले जात आहे. त्यासाठी आलिशान वाहनांचा, दुचाकीचा आणि मालवाहू गाडीचा वापर केला जात आहे.
१५ लाखांचे बियाणे, खत पकडलेगुजरात आणि तेलंगणा प्रांतातून अवैधरित्या शिरलेले हे बियाणे विविध तालुक्यांत पोहचले आहे. या बियाण्याचे एक हजार ३८ पॅकेट आतापर्यंत पोलिसांनी जप्त केले असले तरी मोठ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध झाले आहे. याशिवाय विक्रीसाठी विविध वाहनाचा वापर केला आहे. १४ लाख ७१ हजार रुपयांचे बियाणे आणि खत या कारवाईत जप्त करण्यात आले. भरारी पथकांनी अवैध बियाणे जप्त करण्यासाठी आतापर्यंत ८ कारवाया केल्या आहेत. २० दिवसांतील या कारवाया सुन्न करणाऱ्या आहेत. यावरून अवैध बियाण्याचे जाळे किती पसरले हे लक्षात येते.
२० दिवसांत आठ कारवायापोलिस प्रशासन आणि कृषी विभागाने सापळा रचून गत २० दिवसांत आठ कारवाया केल्या. यामध्ये सापडेल्या बियाण्याच्या पॉकिटावर नामांकित बियाणे कंपन्याचे नाव टाकले होते. मात्र, याचे पॅकिंग कुठे झाले, त्याचे उत्पादन कुठे झाले. याचे मालक कोण याची कुठलीच माहिती या पॅकेटवर नव्हती. याची किंमत त्याची कुठलीही पावती शेतकऱ्यांना दिली गेली नाही. यातून शेतकऱ्यांना सतर्क राहावे लागणार आहे. अन्यथा मोठी फसवणूक होण्याचा धोका आहे.
चेकपोस्ट चुकवून शिरतात वाहनेबोगस बीटीवर बंदी आहे. यामुळे अशा बियाण्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या सूचना आहेत. यानंतरही चेकपोस्ट चुकवून ही वाहने राज्यात शिरली आहे. आता ही वाहने गावामध्ये शिरत आहे. यामुळे शासकीय यंत्रणेपुढे आणि पोलिस प्रशासनापुढे मोठे आवाहन उभे ठाकले आहे.