शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जिल्ह्यातील रेतीघाट असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:19 IST

जिल्ह्यातील रेतीघाटांची मुदत सप्टेंबरमध्ये संपली. त्यानंतर नव्याने रेतीघाटांचा लिलाव झाला. त्यालाही न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत रेतीघाटांची सुरक्षा करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेवर आहे.

ठळक मुद्देलिलाव लांबणीवर : रेतीचे दर गगनाला भिडले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील रेतीघाटांची मुदत सप्टेंबरमध्ये संपली. त्यानंतर नव्याने रेतीघाटांचा लिलाव झाला. त्यालाही न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत रेतीघाटांची सुरक्षा करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेवर आहे. याच संधीचा फायदा घेत रेतीमाफिया रेतीचा चोरून उपसा करीत आहे. ही रेती शहरात तिप्पट दराने विकली जात आहे.यावर्षी बरसलेल्या धुवाधार पावसामुळे रेतीघाट खचाखच भरले आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत रेतीघाटामध्ये मुबलक रेती आहे. यातून जिल्हा प्रशासनाला मोठा महसूल मिळणार आहे. तरी ही लिलाव प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगित करण्यात आली. तोपर्यंत या रेतीघाटांची सुरक्षा करण्याचे काम महसूल यंत्रणेवर आहे. महसूल यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडे कामाचा प्रचंड व्याप आहे. यामुळे रेतीघाटांवर पाळत ठेवण्याच्या कामात दिरंगाई होत आहे. यातून रेती मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. चोरीच्या मार्गाने उपसा करण्यात आलेली रेती शहर आणि ग्रामीण भागात रात्री पोहोचते. त्याकरिता विशेष दर आकारले जात आहेत. हे दर पूर्वीच्या तुलनेत तिप्पट आहे.अंधाराचा फायदादिवसा रेतीची वाहतूक केली तर ती सर्वांच्या नजरेत येते. यामुळे रात्री रेतीचे ट्रक भरले जातात. छुप्या मार्गाने संबंधितांच्या घरापर्यंत पोहोचविले जातात अथवा शेतामध्ये साठा केला जात आहे. गावापासून दूर ठिकाणावर या रेतीचे छुपे ढिगारे आहेत.असे आहेत रेतीचे दर३० सप्टेंबरपर्यंत ६ हजार रूपये ट्रक१५ आॅक्टोबरपर्यंत १२ हजार रूपये ट्रकसध्या १५ हजार रूपये ट्रक

टॅग्स :sandवाळू