शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

जिल्ह्याला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST

खरिपातील नुकसान भरून काढता यावे, म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची लागवड केली. या स्थितीत कॅनॉल क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. हे वेळापत्रक लांबले. यातून रब्बीचे पीक काढणीला येण्याचा कालावधी लांबला. याच लांबलेल्या कालावधीत अवकाळी पावसाने झडप घातली. एक वेळेस पाऊस येऊन थांबला नाही. पाच दिवस पाऊस बरसला आहे. पाच दिवसांमध्ये सरासरी १२ मिमी  पावसाची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्देज्वारी, गहू काळवंडणार : भाजीपाला, हळद उत्पादकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अवकाळी पावसाने शेत शिवारात मोठे नुकसान झाले आहे. यात हळद, गहू, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान विभागाने आणखी दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहे. सततचे नुकसान होत असताना शेत शिवारातून नुकसानीचा अहवाल अद्यापही पुढे आला नाही. यामुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळणार किंवा नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात या वर्षी खरिपाच्या पेरणीपासूनच कृषी क्षेत्रावर मोठे संकट घोंगावत आहे. खरिपातील नुकसान भरून काढता यावे, म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीची लागवड केली. या स्थितीत कॅनॉल क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. हे वेळापत्रक लांबले. यातून रब्बीचे पीक काढणीला येण्याचा कालावधी लांबला. याच लांबलेल्या कालावधीत अवकाळी पावसाने झडप घातली. एक वेळेस पाऊस येऊन थांबला नाही. पाच दिवस पाऊस बरसला आहे. पाच दिवसांमध्ये सरासरी १२ मिमी  पावसाची नोंद करण्यात आली. सतत झडी स्वरूपाच्या पावसाने गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवेच्या वेगाने गहू आडवा झाला. पडलेल्या पावसाने गहू काळा पडण्याची दाट शक्यता आहे. असाच फटका रब्बीच्या ज्वारीला बसण्याचा धोका आहे. ज्वारी परिपक्व अवस्थेत आहे. त्या सुमारास पाऊस बरसल्याने ही ज्वारी काळी पडण्याचा धाेका वाढला आहे. मक्याच्या पिकाचे पावसाने नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड झाली. हळद काढणीच्या अवस्थेत आहे. शेतात हळद शिजविण्याचे काम सुरू आहे. ही हळद शेत शिवारातच वाळू घातली जाते. मधातच पाऊस बरसल्याने हळदीला डाग पडण्याची शक्यता आहे. पावसाने भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालेभाज्या सडत आहे. यामुळे भाजीपाल्याचे क्षेत्र नुकसान आले आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण अद्यापही झाले नाही.

मजूर टंचाई आणि यंत्राच्या कमतरतेने धोका  जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी यंदा गव्हाची पेरणी उशिरा केली होती. त्यामुळे अनेकांचा गहू सोंगणी अभावी शेतातच आहे. या पिकाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. तर गहू काढणीसाठी अनेकांना मजूर मिळाले नाही. तर अनेक शेतकरी हार्वेस्टरची प्रतीक्षा करीत आहे. त्यातच अचानक आलेल्या पावसाने हाताशी आलेले पीक उद्‌ध्वस्त केले. गव्हासह हरभरा, आंबा, भाजीपाला या पिकांसह खेड्यातील घरादारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊस