शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

दारव्हा तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा

By विलास गावंडे | Updated: February 27, 2024 21:29 IST

तुरळक गारपीट : ४५० हेक्टर क्षेत्रातील रब्बीचे नुकसान

दारव्हा (यवतमाळ) : अवकाळी पावसासह गारपिटीचा दारव्हा तालुक्यातील ४५० हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांना फटका बसला आहे. ऐन काढणीस आलेल्या गहू, हरभऱ्यासह भाजीपाला व फळझाडांना याचा तडाखा बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान कोरडे असताना सोमवारी मध्यरात्री अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली.

गहू, हरभरा, टरबूज, खरबूज यासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार खोपडी, चोपडी, भांडेगाव, तेलगव्हाण, कुंड, चोरखोपडी, राजीवनगर, वागद बुद्रुक, कुऱ्हाड बुद्रुक, निळोणा, ब्रह्मनाथ, तळेगाव, मांगकिन्ही, कुंभार किन्ही, लोही, रामगाव रामेश्वर, सावंगी रेल्वे, हातोला, माहुली, ब्रह्मी, धामणगाव खुर्द, धामणगाव बुद्रुक, कुऱ्हाड खुर्द, वरुड, कोहळा, बोदेगाव, करजगाव, कोलवाई, मानकी इमामपूर, इस्रामपूर, तरनोळी, नखेगाव, बरबडी, दारव्हा, भोपापूर, बोरगाव, इरथळ, भुलाई, घाटकिन्ही, हनुमान नगर, हातनी, दुधगाव, पिंपळखुटा, वागद, नांदगव्हाण आदी गावांतील पिकांचे नुकसान झाले. तसा प्राथमिक अहवाल कृषी सहायक आणि तलाठ्यांच्या माध्यमातून महसूल विभागाला देण्यात आला आहे. काही ठिकाणी जनावरे जखमी झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :RainपाऊसYavatmalयवतमाळ