शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर अनियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 21:11 IST

शहरातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. त्यानंतरही ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर थेट रस्त्याच्या मधोमध तासंतास वाहने उभी ठेऊन प्रवाशांची चढ-उतार केली जाते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

ठळक मुद्देदारव्हा मार्गावर वाहतूक कोंडी : रस्त्यावरच लागतात प्रवासी वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. त्यानंतरही ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर थेट रस्त्याच्या मधोमध तासंतास वाहने उभी ठेऊन प्रवाशांची चढ-उतार केली जाते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नियमांची पायमल्ली करून येथे रस्त्यावर वाहने उभी ठेवली जातात.बसस्थानक चौकापासून काही मीटर अंतरावर दारव्हा मार्गावर ट्रॅव्हल्स पॉर्इंट आहे. या पॉर्इंटसमोरूनच वाहतुकीसाठी यू-टर्न ठेवण्यात आला आहे. अर्धाअधिक रस्ता ट्रॅव्हल्सने व्यापलेला असतो. कुणी साधे हटकले तरी थेट मारहाण केली जाते. वाहतूक शाखेचे अधिकारी वाहन घेऊन या मार्गावरून घिरट्या घालतात. सोपस्कार म्हणून कधी तरी रस्त्यावरची ट्रॅव्हल्स बाजूला करण्याची तसदी घेतात. मात्र येथे अपवादानेच ट्रॅव्हल्स मालकांना मेमो अथवा दंड केला जातो. ग्रामीण भागातून आलेल्या किंवा रुग्ण घेऊन असलेल्या दुचाकी, चारचाकी चालकांना नियमांची भलीमोठी लिस्ट वाहतूक शाखेकडून दाखविली जाते. अक्षरश: जाचक पद्धतीने दंड वसूल केला जातो. मात्र रस्ता रोखून धरणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांना खुले अभय दिले जाते. ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रवासी मिळविण्यासाठी जागेवरच ट्रॅव्हल्स उभ्या ठेऊन सतत मागेपुढे हलविल्या जातात. ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. वाहतुकीची कोंडी झाल्याने एका नव्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानक चौकातील सिग्नल हा पाच मार्गांचा होता. तो आता चार मार्गांचा करण्यात आला. मात्र रस्त्यावरील ट्रॅव्हल्सचे अतिक्रमण, प्रवासी घेण्यासाठी लागणारे आॅटो हे नेहमीचेच चित्र झाले आहे. वाहतूक शाखेतील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या वरिष्ठांना या समस्येचे कठोर भूमिकेतून चुटकीसरशी निरसन करता येणे शक्य आहे. मात्र येथे प्रशासकीय अधिकार वापरण्यात कुचराई केली जात असल्याचे दिसते. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणTrafficवाहतूक कोंडी