शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘पात्रते’त बेरोजगार पास, गुरुजी नापास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 04:58 IST

टीईटीचा तिढा; अनुत्तीर्णांचे पगार थांबणार

- अविनाश साबापुरे यवतमाळ : विद्यार्थी परीक्षेत नापास होऊ नये म्हणून शिक्षक झटत असतात. पण ‘टीईटी’ परीक्षेत हजारो शिक्षकच नापास झाल्याचे वास्तव आहे. एक दोनदा नव्हे, तब्बल १८ वेळा गुरुजींना संधी मिळाली, तरी टीईटी पास होऊ शकले नाही. उलट, याच परीक्षांमधून आतापर्यंत ६९ हजार बेरोजगार डीएड, बीएडधारक मात्र उत्तीर्ण झाले. टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या सेवासमाप्तीचे आदेश देताना खुद्द शिक्षण संचालकांनीच ही आकडेवारी जाहीर केली आहे.राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या निर्देशानुसार, कोणत्याही शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्यांना ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. १३ फेब्रुवारी २०१३ पासून राज्यात ही सक्ती करण्यात आली आहे. मात्र २०१३ नंतर रुजू झालेल्यांपैकी जवळपास ८ हजार शिक्षक आजवर टीईटी उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत. आता अशा शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी २४ डिसेंबर रोजी बजावले आहेत. तर ज्या खासगी शिक्षण संस्था अशा शिक्षकांना यापुढे कायम ठेवतील, त्यांचे शासकीय अनुदान १ जानेवारीपासून थांबविण्याचा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे. हा आदेश मागे घेऊन शिक्षकांच्या नोकºया वाचविण्याची मागणी शिक्षण मंत्र्यांकडे केली जात आहे. तर दुसरीकडे शिक्षकांना पुरेशा प्रमाणात संधी देण्यात आल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात आहे.गुरुजींनी गमावल्या १८ संधी२ फेब्रुवारी २०१३ पासून प्राथमिक शिक्षकांना टीईटी बंधनकारक करण्यात आली. तेव्हापासून आजवर १८ वेळा टीईटी परीक्षा झाली. यात पाच वेळा राज्यस्तरीय टीईटी झाली. तर १३ वेळा केंद्रीय टीईटी (सी-टीईटी) पार पडली. दुसरीकडे ६९ हजार ७०६ बेरोजगार विद्यार्थी मात्र टीईटी उत्तीर्ण झाले आहेत.टीईटीचा लेखाजोखापरीक्षेची तारीख : उत्तीर्ण विद्यार्थी१५ डिसेंबर २०१३ : ३१ हजार ७२१४ डिसेंबर २०१४ : ९ हजार ५९५१६ जानेवारी २०१६ : १९ हजार ३६२२२ जुलै २०१७ : ९ हजार ६७७२०१६ मध्ये फेरपरीक्षा झाली होती.