शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

दागिने चमकविण्याच्या बहाण्याने गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

चांदीचे कडे चमकल्याने वृद्धेने हातातील चांदीच्या पाटल्या चमकविण्यासाठी भामट्यांकडे देण्याची तयारी केली. त्याचवेळी वृद्धेची सून तेथे आली. तिने वृद्धेच्या कड्याकडे बघताच कडे हिरवे झाल्याचे आढळले. त्यामुळे सुनेला संशय आला. तिने वृद्धेकडून चांदीच्या पाटल्या स्वत:कडे घेतल्या. आरडाओरड करून ग्रामस्थांना गोळा केले. ग्रामस्थांनी तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले. एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील सावंगा (बु) येथे एका ६० वर्षीय वृद्धेला दागिने चमकवून देण्याच्या नावाखाली भामट्यांनी गंडविले. भामट्यांच्या टोळीतील दोघांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. एकजण फरार आहे.सावंगा येथील वृद्ध महिलेकडे तीन भामटे आले. त्यांनी वृद्धेला अंगावरील  सोन्या-चांदीचे दागिने चमकवून देण्याचे आमिष दाखविले. वृद्धा धुरपताबाई भिका जाधव यांना हातातील चांदीचे कडे भामट्यांनी मागितले. मात्र, वृद्धेने कडे देण्यास नकार दिला. त्यामुळे भामट्यांनी हातातीलच कड्याला पावडर लावून चमकविले. ते चमकल्याचे बघून धुरपताबाई यांनी दोन्ही हातातील चांदीचे कडे भामट्यांकडे दिले. त्यांनी ते लगेच एका डब्यात टाकून त्यावर काही तरी मिश्रण टाकून पाॅलिश केले नंतर दोन्हीकडे वृद्धेला परत दिले. चांदीचे कडे चमकल्याने वृद्धेने हातातील चांदीच्या पाटल्या चमकविण्यासाठी भामट्यांकडे देण्याची तयारी केली. त्याचवेळी वृद्धेची सून तेथे आली. तिने वृद्धेच्या कड्याकडे बघताच कडे हिरवे झाल्याचे आढळले. त्यामुळे सुनेला संशय आला. तिने वृद्धेकडून चांदीच्या पाटल्या स्वत:कडे घेतल्या. आरडाओरड करून ग्रामस्थांना गोळा केले. ग्रामस्थांनी तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले. एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. रवींद्रकुमार सदानंद यादव (२५), बिपीनकुमार राजेंद्रप्रसाद यादव (३०) आणि विक्रम यादव (२३, सर्व रा. लतरा जि. भागलपूर (बिहार) अशी भामट्यांची नावे आहे. यापैकी दोघांना गावकऱ्यांनी पकडून बांधून ठेवले. लगेच पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार सोनाजी आमले, पीएसआय नरेंद्र मानकर, विशाल बोरकर, गुणवंत गोटे, सचिन राऊत, दीपक ढगे यांनी सावंगा येथे पोहोचून दोन भामट्यांना साहित्यासह ताब्यात घेतले.  त्यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. 

नागरिकांनी बिहारी टोळीपासून सावध राहावेसोने, चांदीचे दागिने चमकवून देण्याच्या बहाण्याने दागिने लुटणारी टोळी बिहारमधून जिल्ह्यात दाखल झाली आहे. पाण्यात तेजाब टाकून ते दागिने विरघळवितात नंतर तेजाब टाकलेले पाणी घेऊन पळ काढतात. त्यातून सोने व चांदी मिळवितात, अशी माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांना गंडविणारी ही टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा टोळीपासून सावध राहण्याचे आवाहन ठाणेदार सोनाजी आमले यांनी केले.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस