शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

दागिने चमकविण्याच्या बहाण्याने गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

चांदीचे कडे चमकल्याने वृद्धेने हातातील चांदीच्या पाटल्या चमकविण्यासाठी भामट्यांकडे देण्याची तयारी केली. त्याचवेळी वृद्धेची सून तेथे आली. तिने वृद्धेच्या कड्याकडे बघताच कडे हिरवे झाल्याचे आढळले. त्यामुळे सुनेला संशय आला. तिने वृद्धेकडून चांदीच्या पाटल्या स्वत:कडे घेतल्या. आरडाओरड करून ग्रामस्थांना गोळा केले. ग्रामस्थांनी तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले. एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील सावंगा (बु) येथे एका ६० वर्षीय वृद्धेला दागिने चमकवून देण्याच्या नावाखाली भामट्यांनी गंडविले. भामट्यांच्या टोळीतील दोघांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. एकजण फरार आहे.सावंगा येथील वृद्ध महिलेकडे तीन भामटे आले. त्यांनी वृद्धेला अंगावरील  सोन्या-चांदीचे दागिने चमकवून देण्याचे आमिष दाखविले. वृद्धा धुरपताबाई भिका जाधव यांना हातातील चांदीचे कडे भामट्यांनी मागितले. मात्र, वृद्धेने कडे देण्यास नकार दिला. त्यामुळे भामट्यांनी हातातीलच कड्याला पावडर लावून चमकविले. ते चमकल्याचे बघून धुरपताबाई यांनी दोन्ही हातातील चांदीचे कडे भामट्यांकडे दिले. त्यांनी ते लगेच एका डब्यात टाकून त्यावर काही तरी मिश्रण टाकून पाॅलिश केले नंतर दोन्हीकडे वृद्धेला परत दिले. चांदीचे कडे चमकल्याने वृद्धेने हातातील चांदीच्या पाटल्या चमकविण्यासाठी भामट्यांकडे देण्याची तयारी केली. त्याचवेळी वृद्धेची सून तेथे आली. तिने वृद्धेच्या कड्याकडे बघताच कडे हिरवे झाल्याचे आढळले. त्यामुळे सुनेला संशय आला. तिने वृद्धेकडून चांदीच्या पाटल्या स्वत:कडे घेतल्या. आरडाओरड करून ग्रामस्थांना गोळा केले. ग्रामस्थांनी तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले. एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. रवींद्रकुमार सदानंद यादव (२५), बिपीनकुमार राजेंद्रप्रसाद यादव (३०) आणि विक्रम यादव (२३, सर्व रा. लतरा जि. भागलपूर (बिहार) अशी भामट्यांची नावे आहे. यापैकी दोघांना गावकऱ्यांनी पकडून बांधून ठेवले. लगेच पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार सोनाजी आमले, पीएसआय नरेंद्र मानकर, विशाल बोरकर, गुणवंत गोटे, सचिन राऊत, दीपक ढगे यांनी सावंगा येथे पोहोचून दोन भामट्यांना साहित्यासह ताब्यात घेतले.  त्यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. 

नागरिकांनी बिहारी टोळीपासून सावध राहावेसोने, चांदीचे दागिने चमकवून देण्याच्या बहाण्याने दागिने लुटणारी टोळी बिहारमधून जिल्ह्यात दाखल झाली आहे. पाण्यात तेजाब टाकून ते दागिने विरघळवितात नंतर तेजाब टाकलेले पाणी घेऊन पळ काढतात. त्यातून सोने व चांदी मिळवितात, अशी माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांना गंडविणारी ही टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा टोळीपासून सावध राहण्याचे आवाहन ठाणेदार सोनाजी आमले यांनी केले.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस