शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

दागिने चमकविण्याच्या बहाण्याने गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

चांदीचे कडे चमकल्याने वृद्धेने हातातील चांदीच्या पाटल्या चमकविण्यासाठी भामट्यांकडे देण्याची तयारी केली. त्याचवेळी वृद्धेची सून तेथे आली. तिने वृद्धेच्या कड्याकडे बघताच कडे हिरवे झाल्याचे आढळले. त्यामुळे सुनेला संशय आला. तिने वृद्धेकडून चांदीच्या पाटल्या स्वत:कडे घेतल्या. आरडाओरड करून ग्रामस्थांना गोळा केले. ग्रामस्थांनी तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले. एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील सावंगा (बु) येथे एका ६० वर्षीय वृद्धेला दागिने चमकवून देण्याच्या नावाखाली भामट्यांनी गंडविले. भामट्यांच्या टोळीतील दोघांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. एकजण फरार आहे.सावंगा येथील वृद्ध महिलेकडे तीन भामटे आले. त्यांनी वृद्धेला अंगावरील  सोन्या-चांदीचे दागिने चमकवून देण्याचे आमिष दाखविले. वृद्धा धुरपताबाई भिका जाधव यांना हातातील चांदीचे कडे भामट्यांनी मागितले. मात्र, वृद्धेने कडे देण्यास नकार दिला. त्यामुळे भामट्यांनी हातातीलच कड्याला पावडर लावून चमकविले. ते चमकल्याचे बघून धुरपताबाई यांनी दोन्ही हातातील चांदीचे कडे भामट्यांकडे दिले. त्यांनी ते लगेच एका डब्यात टाकून त्यावर काही तरी मिश्रण टाकून पाॅलिश केले नंतर दोन्हीकडे वृद्धेला परत दिले. चांदीचे कडे चमकल्याने वृद्धेने हातातील चांदीच्या पाटल्या चमकविण्यासाठी भामट्यांकडे देण्याची तयारी केली. त्याचवेळी वृद्धेची सून तेथे आली. तिने वृद्धेच्या कड्याकडे बघताच कडे हिरवे झाल्याचे आढळले. त्यामुळे सुनेला संशय आला. तिने वृद्धेकडून चांदीच्या पाटल्या स्वत:कडे घेतल्या. आरडाओरड करून ग्रामस्थांना गोळा केले. ग्रामस्थांनी तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले. एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. रवींद्रकुमार सदानंद यादव (२५), बिपीनकुमार राजेंद्रप्रसाद यादव (३०) आणि विक्रम यादव (२३, सर्व रा. लतरा जि. भागलपूर (बिहार) अशी भामट्यांची नावे आहे. यापैकी दोघांना गावकऱ्यांनी पकडून बांधून ठेवले. लगेच पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार सोनाजी आमले, पीएसआय नरेंद्र मानकर, विशाल बोरकर, गुणवंत गोटे, सचिन राऊत, दीपक ढगे यांनी सावंगा येथे पोहोचून दोन भामट्यांना साहित्यासह ताब्यात घेतले.  त्यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. 

नागरिकांनी बिहारी टोळीपासून सावध राहावेसोने, चांदीचे दागिने चमकवून देण्याच्या बहाण्याने दागिने लुटणारी टोळी बिहारमधून जिल्ह्यात दाखल झाली आहे. पाण्यात तेजाब टाकून ते दागिने विरघळवितात नंतर तेजाब टाकलेले पाणी घेऊन पळ काढतात. त्यातून सोने व चांदी मिळवितात, अशी माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांना गंडविणारी ही टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा टोळीपासून सावध राहण्याचे आवाहन ठाणेदार सोनाजी आमले यांनी केले.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस