शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नगरपरिषद अंदाजपत्रकात अनाठायी खर्चाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:28 IST

नगरपरिषद स्थायी समिती सभेत सोमवारी प्रस्तावित अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वांनीच अनाठायी खर्च टाळून अत्यावश्यक कामांसाठी भरीव तरतूद करावी, अशा सूचना केल्या. विरोधी सदस्यांनी पालिकेकडे मोठ्या प्रमाणात कर्ज असताना शिलकीचे बजेट कसे सादर होऊ शकते, असाही प्रश्न उपस्थित केला.

ठळक मुद्देस्थायी समिती सभा : कर्ज असतानाही शिलकीचे बजेट कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषद स्थायी समिती सभेत सोमवारी प्रस्तावित अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वांनीच अनाठायी खर्च टाळून अत्यावश्यक कामांसाठी भरीव तरतूद करावी, अशा सूचना केल्या. विरोधी सदस्यांनी पालिकेकडे मोठ्या प्रमाणात कर्ज असताना शिलकीचे बजेट कसे सादर होऊ शकते, असाही प्रश्न उपस्थित केला.नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या अध्यक्षतेत समितीची सभा झाली. यावेळी बांधकाम सभापती विजय खडसे, शिक्षण सभापती अ‍ॅड. करूणा तेलंग, नियोजन सभापती शुभांगी हातगावकर, महिला बालकल्याण सभपाती पुष्पा राऊत यांच्यासह समिती सदस्य चंद्रशेखर चौधरी, मनोज मुधोळकर, लता ठोंबरे उपस्थित होत्या.पालिकेने प्रस्तावित अर्थसंकल्प हा ५२ कोटी ५२ लाखांच्या शिलकीचा असल्याचे सभेपुढे ठेवले. यावेळी प्रत्येक घटकावर झालेला खर्च आणि त्याची प्रत्यक्ष कामाची स्थिती याचे सखोल विवेचन सदस्यांनी केले. नगरपरिषदेची विविध प्रकरणे न्यायालयात जातात, त्यावर मोठा खर्च होऊनही निकाल पालिकेच्या बाजूने लागत नाही. यावर सर्वांनीच आक्षेप घेत पॅनलवर असलेल्या वकिलांना काढून टाकण्याचे आदेश दिले. असा ठराव सर्वसाधारण सभेत वर्षभरापूर्वी झाल्यानंतरही कोणतीच कारवाई का झाली नाही, याची विचारणा प्रशासनाला करण्यात आली. इतकेच नव्हेतर कचरा कंत्राटात केवळ वकिलांच्या चुकीमुळे संपूर्ण शहराला मनस्ताप सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षांनी नोंदविली.शहरातील लाईट व हातपंप दुरूस्ती खर्च, सार्वजनिक नळाच्या बिलापोटी पालिकेवर येणार भुर्दंड कसा थांबविता येऊ शकतो, यावर बांधकाम सभापतींनी सूचना केला. सध्या सुरू असलेल्या १७७ नळांपैकी १५० नळ त्वरित बंद करण्याचे निर्देश मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी दिले.शिक्षण सभापती अ‍ॅड़ करूणा तेलंग यानी शैक्षणिक बजेट वाढविण्याची मागणी केली. शाळा डिजिटल करणे, शाळांची डागडुजी, प्रसाधनगृहाच्या सुविधा नसल्याचे सांगितले. शहरातील वृक्षगणनेचाही मुद्दा चर्चेला आला. एकंदरच बजेटमध्ये प्रत्यक्ष खर्च आणि झालेली कामे यावर सदस्यांनी ताशेरे ओढले. नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यासंदर्भातही सूचना करण्यात आल्या. सदस्यांच्या सूचना लक्षात घेता फेरबदल करून सुधारित अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे.वराह पकडण्यापेक्षा ‘पिग फार्म’ सुरू कराशहरातील मोकाट कुत्रे आणि वराह पकडण्याच्या खर्चावर सदस्य लता ठोंबरे यांनी नेमके काम कुठे केले, असा प्रश्न उपस्थित केला. नगरपरिषदेने वराह पकडण्याऐवजी ‘पिग फार्म’ सुरू करावा, यातून नगरपरिषदेला उत्पन्न होईल आणि उरलेले अन्न, भाजीपाला या कचऱ्याची समस्या निकाली निघेल, असा उपाय चंद्रशेखर चौधरी यांनी सूचवला.नगरसेवकांच्या अभिप्रायाविना देयके नाहीनियोजन सभापती शुभांगी हातगावकर यांनी शहरातील उद्यानांची स्थिती आणि प्रत्यक्ष खर्च यावर आक्षेप घेतला. उद्याने उजाड होत असताना देयके कशी दिली जातात, याचा जाब विचारला. यावर चंद्रशेखर चौधरी यांनी स्थानिक नगरसेवकांचा अभिप्राय असल्याशिवाय कोणत्याच कामाचे देयक देऊ नये, अशी सूचना केली. याला समितीने मान्यता दिली.