शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नोटबंदीनंतरही शेतकऱ्यांवर अघोषित आर्थिक निर्बंध; अडत ‘ॲडव्हान्स’मध्ये परावर्तित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 11:13 IST

केंद्र शासनाने २०१७ मध्ये नोटबंदी केली. यावेळी चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. या स्थितीत कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला. व्यापाऱ्यांनी नगदी व्यवहार करण्याबाबत काही नियम होते.

- रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नोटबंदीच्या काळात आर्थिक व्यवहारावर निर्बंध होते. थेट खात्यातून व्यवहार करण्याच्या सूचना होत्या. या नियमाचा आडोसा घेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक नाकेबंदी केली आहे. नोटबंदी संपली मात्र ही नाकेबंदी अजूनही बाजार समित्यांमध्ये कायम आहे.

केंद्र शासनाने २०१७ मध्ये नोटबंदी केली. यावेळी चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. या स्थितीत कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला. व्यापाऱ्यांनी नगदी व्यवहार करण्याबाबत काही नियम होते. परिस्थिती रुळावर आल्यानंतर कॅश आणि कॅशलेस व्यवहारावर सरकारने भर दिला. शेतकऱ्यांच्या शेतमालास नगदी पैसे देताना कट्टी आकारण्याच्या सूचना नाहीत. केंद्र शासनाच्या धोरणाचा आधार घेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना चेक देणे सुरू केले आहे. मग तो कुठलाही शेतमाल असो नगदी पैसे टाळले जातात. आरटीजीएस करण्यास व्यापारी नकार देतात.

शेतमाल विकल्यानंतर पूर्वी शेतमालाचे थेट पैसे दिले जात होते. आता पाच ते १० हजार रुपयांपर्यंतची नगदी रक्कम दिली जाते. इतर पैशासाठी ५० पैशापासून ते दोन रुपयांपर्यंतची शेकडा कट्टी आकारली जाते. या पद्धतीनेही शेतकऱ्यांची लूट होते. हा प्रकार सर्वत्रच पाहायला मिळत आहे. याशिवाय शेतकऱ्यांकडून अडत न आकारण्याचा निर्णय झाला होता. यानंतरही व्यापारी इतर मार्गाने अडत वळती करीत आहेत. ॲडव्हान्स अथवा इतर प्रकारातून हे पैसे वळते केले जातात. 

कट्टीचा प्रकार गंभीर आहे. या विषयात शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास थेट कारवाई होईल. याशिवाय अडत आकारली जात असेल तर अशा अडत्यांवरही कारवाई होईल. याकरिता शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.-रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरी