शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीनंतरही शेतकऱ्यांवर अघोषित आर्थिक निर्बंध; अडत ‘ॲडव्हान्स’मध्ये परावर्तित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 11:13 IST

केंद्र शासनाने २०१७ मध्ये नोटबंदी केली. यावेळी चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. या स्थितीत कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला. व्यापाऱ्यांनी नगदी व्यवहार करण्याबाबत काही नियम होते.

- रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नोटबंदीच्या काळात आर्थिक व्यवहारावर निर्बंध होते. थेट खात्यातून व्यवहार करण्याच्या सूचना होत्या. या नियमाचा आडोसा घेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक नाकेबंदी केली आहे. नोटबंदी संपली मात्र ही नाकेबंदी अजूनही बाजार समित्यांमध्ये कायम आहे.

केंद्र शासनाने २०१७ मध्ये नोटबंदी केली. यावेळी चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. या स्थितीत कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला. व्यापाऱ्यांनी नगदी व्यवहार करण्याबाबत काही नियम होते. परिस्थिती रुळावर आल्यानंतर कॅश आणि कॅशलेस व्यवहारावर सरकारने भर दिला. शेतकऱ्यांच्या शेतमालास नगदी पैसे देताना कट्टी आकारण्याच्या सूचना नाहीत. केंद्र शासनाच्या धोरणाचा आधार घेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना चेक देणे सुरू केले आहे. मग तो कुठलाही शेतमाल असो नगदी पैसे टाळले जातात. आरटीजीएस करण्यास व्यापारी नकार देतात.

शेतमाल विकल्यानंतर पूर्वी शेतमालाचे थेट पैसे दिले जात होते. आता पाच ते १० हजार रुपयांपर्यंतची नगदी रक्कम दिली जाते. इतर पैशासाठी ५० पैशापासून ते दोन रुपयांपर्यंतची शेकडा कट्टी आकारली जाते. या पद्धतीनेही शेतकऱ्यांची लूट होते. हा प्रकार सर्वत्रच पाहायला मिळत आहे. याशिवाय शेतकऱ्यांकडून अडत न आकारण्याचा निर्णय झाला होता. यानंतरही व्यापारी इतर मार्गाने अडत वळती करीत आहेत. ॲडव्हान्स अथवा इतर प्रकारातून हे पैसे वळते केले जातात. 

कट्टीचा प्रकार गंभीर आहे. या विषयात शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास थेट कारवाई होईल. याशिवाय अडत आकारली जात असेल तर अशा अडत्यांवरही कारवाई होईल. याकरिता शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.-रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरी