शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

टंकलेखनाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 10:05 PM

दोन वर्षे मिळालेली मुदतवाढ संपल्याने मॅन्युअल टंकलेनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा कोर्स बंद झाल्यास लाखो विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित राहतील, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुदतवाढ मिळाल्याच्या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यात तीन लाख विद्यार्थ्यांनी हा कोर्स केला आहे.

ठळक मुद्देसंगणक टायपिंग नको : दिल्लीसह १२ राज्यात टाईपरायटरच, मुदतवाढीसाठी संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन वर्षे मिळालेली मुदतवाढ संपल्याने मॅन्युअल टंकलेनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा कोर्स बंद झाल्यास लाखो विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित राहतील, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुदतवाढ मिळाल्याच्या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यात तीन लाख विद्यार्थ्यांनी हा कोर्स केला आहे.संगणक टायपिंग सुरू करून मॅन्युअल टंकलेखन बंद करण्याचा निर्णय शासनाने नोव्हेंबर २०१७ मध्ये घेतला होता. त्यावेळी झालेल्या पाठपुराव्यामुळे दोन वर्षे मुदतवाढ मिळाली. संगणक टायपिंग विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना भुर्दंड बसणारी आहे, अशी बाजू मांडण्यात आली होती. त्यावेळी मिळालेली मुदतवाढ गरीब विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरली. संगणक (जीसीसी-टीबीसी) टायपिंग कोर्समध्ये समस्याही अधिक आहेत. या व इतर बाबींचा विचार करून मॅन्युअल टंकलेखन सुरू राहू द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.शासनाच्या पदभरतीमध्ये संगणक टायपिंग (जीसीबी-टीबीसी) कोर्सला संगणक अर्हता म्हणून मान्यता नाही. या प्रशिक्षणाला केवळ टायपिंग कोर्स म्हणून स्वीकारले जात आहे. अशावेळी अगाऊ शुल्क भरून प्रशिक्षण घेण्याचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिल्लीसह १२ राज्यात मॅन्युअल टंकलेखन सुरू आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, केरळ या राज्यात आजही हाच कोर्स सुरू आहे. महाराष्ट्रातही हाच कोर्स सुरू राहावा यासाठी संघर्ष समितीने लढा उभारला आहे.की-बोर्डद्वारे गैरप्रकारपरीक्षा केंद्रावरील अत्याधुनिक संगणक लॅबमध्ये की-बोर्ड पुरविण्याच्या माध्यमातून गैरप्रकार होत आहे. एकाच रांगेत संस्थाचालक आपले की-बोर्ड लाऊन आॅब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये सामूहिक कॉपी करत असल्याचा आरोप केला जात आहे. शासनाने कुणालाही जीसीसी-टीबीसी प्रशिक्षण सॉफ्टवेअर तयार करण्याची किंवा विक्रीची परवानगी दिलेली नाही. तरीही ते बाजारात उपलब्ध होत आहे. डुप्लिकेट परीक्षेचाही प्रकार वाढला आहे. टंकलेखन व संगणक टंकलेखन प्रशिक्षण संस्थेत इतर कोणताही कोर्च चालविण्यावर बंदी आहे. तरीही काही ठिकाणी ईटीएच व इतर कोर्स जीसीसी-टीबीसीच्या सेटवर चालविले जात आहे. या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.मॅन्युअल टंकलेखन कायमस्वरूपी सुरू राहावे यासाठी शिक्षणमंत्री आशिष शेलार, विनोद तावडे यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. हा कोर्स सुरू राहण्यासाठी प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन मिळाले.- दिनेश हरणे, अध्यक्षमॅन्युअल टंकलेखन आणि संगणक टंकलेखन संघर्ष समिती

टॅग्स :typewriterटाइपरायटर