शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

जिल्ह्याने दिल्या दोन महिला खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:19 IST

जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर अनेक खासदार संसदेत पोहोचले. काही बोलले, काही नुसतेच गेले आणि आले. पण एवढ्या वर्षात महिलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा विचारही राष्ट्रीय पक्षांच्या श्रेष्ठींनी केला नाही. दहा लाख २२ हजार ७६४ इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या आहे.

ठळक मुद्देदहा लाख महिला मतदार : मात्र मूळ यवतमाळच्या एकाही महिलेला संधी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर अनेक खासदार संसदेत पोहोचले. काही बोलले, काही नुसतेच गेले आणि आले. पण एवढ्या वर्षात महिलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा विचारही राष्ट्रीय पक्षांच्या श्रेष्ठींनी केला नाही. दहा लाख २२ हजार ७६४ इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या आहे. पण या दहा लाख महिलांमधून आजवरच्या लोकसभा निवडणुकीत दहा महिला उमेदवार पुढे येऊ शकलेल्या नाही. किंबहुना त्यांना पुढे येऊ दिले गेलेले नाही. भावना गवळी आणि सूर्यकांता पाटील ही दोन नावे महिला खासदार म्हणून सांगता येतील. मात्र, त्यांचे मूळगाव लक्षात घेतले तर जिल्ह्यातून आजवर महिला खासदार झाली नाही, हे वास्तव स्वीकारावेच लागेल.जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभाजित झाले आहेत. यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर आणि हिंगोली हे ते तीन लोकसभा मतदारसंघ. त्यापैकी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात भावना गवळींना तीन वेळा खासदारकी मिळाली. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन वेळा सूर्यकांता पाटील यांना खासदारकी मिळविता आली. मात्र या दोन्ही महिला खासदारांचे मूळ यवतमाळ जिल्ह्यात नाही. भावना गवळी वाशीम जिल्ह्यात तर सूर्यकांता पाटील नांदेडच्या रहिवासी आहेत. हा विचार करता यवतमाळ जिल्ह्यातील १० लाखांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या महिला मतदारांमधून आजवर एकही महिला खासदार होऊ शकलेली नाही.पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत विचार केल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा या राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील महिलेला लोकसभेची उमेदवारीच दिलेली नाही. (शिवसेनेच्या भावना गवळी हा अपवाद असला तरी गवळी जिल्ह्याबाहेरच्या रहिवासी ठरतात.) वणीपासून आर्णीपर्यंत आणि झरीपासून उमरखेडपर्यंत विस्तारलेल्या यवतमाळ जिल्ह्यात १० लाख २२ हजार ७६४ महिला मतदार आहेत. जिल्ह्यातल्या दारूविक्रीपासून, अवैध वरली मटक्यासारख्या साऱ्याच प्रश्नांशी त्यांची ओळख आहे. किंबहुना या समस्यांमुळे त्याच सर्वाधिक पीडित आहेत. दारूबंदीचा प्रश्न घेऊन हजारो महिला रस्त्यावर आवाज उठवित आहेत. पण लोकसभेच्या मैदानात त्यातून एखादीला तिकिट द्यावे, तिला संसदेत धाडण्यासाठी झटावे, अशी मानसिकता एकाही पक्षाने दाखविलेली नाही. मोजक्या पाच-सहा महिलांनी हिंमत करून अपक्ष उमेदवारी दाखल करून पाहिली. पण कोट्यवधीचे ‘बजेट’ असलेल्या निवडणुकांमध्ये त्यांची कोणी दखलही घेतली नाही. 

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळी