शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

जिल्ह्याने दिल्या दोन महिला खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:19 IST

जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर अनेक खासदार संसदेत पोहोचले. काही बोलले, काही नुसतेच गेले आणि आले. पण एवढ्या वर्षात महिलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा विचारही राष्ट्रीय पक्षांच्या श्रेष्ठींनी केला नाही. दहा लाख २२ हजार ७६४ इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या आहे.

ठळक मुद्देदहा लाख महिला मतदार : मात्र मूळ यवतमाळच्या एकाही महिलेला संधी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर अनेक खासदार संसदेत पोहोचले. काही बोलले, काही नुसतेच गेले आणि आले. पण एवढ्या वर्षात महिलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा विचारही राष्ट्रीय पक्षांच्या श्रेष्ठींनी केला नाही. दहा लाख २२ हजार ७६४ इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या आहे. पण या दहा लाख महिलांमधून आजवरच्या लोकसभा निवडणुकीत दहा महिला उमेदवार पुढे येऊ शकलेल्या नाही. किंबहुना त्यांना पुढे येऊ दिले गेलेले नाही. भावना गवळी आणि सूर्यकांता पाटील ही दोन नावे महिला खासदार म्हणून सांगता येतील. मात्र, त्यांचे मूळगाव लक्षात घेतले तर जिल्ह्यातून आजवर महिला खासदार झाली नाही, हे वास्तव स्वीकारावेच लागेल.जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभाजित झाले आहेत. यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर आणि हिंगोली हे ते तीन लोकसभा मतदारसंघ. त्यापैकी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात भावना गवळींना तीन वेळा खासदारकी मिळाली. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन वेळा सूर्यकांता पाटील यांना खासदारकी मिळविता आली. मात्र या दोन्ही महिला खासदारांचे मूळ यवतमाळ जिल्ह्यात नाही. भावना गवळी वाशीम जिल्ह्यात तर सूर्यकांता पाटील नांदेडच्या रहिवासी आहेत. हा विचार करता यवतमाळ जिल्ह्यातील १० लाखांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या महिला मतदारांमधून आजवर एकही महिला खासदार होऊ शकलेली नाही.पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत विचार केल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा या राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील महिलेला लोकसभेची उमेदवारीच दिलेली नाही. (शिवसेनेच्या भावना गवळी हा अपवाद असला तरी गवळी जिल्ह्याबाहेरच्या रहिवासी ठरतात.) वणीपासून आर्णीपर्यंत आणि झरीपासून उमरखेडपर्यंत विस्तारलेल्या यवतमाळ जिल्ह्यात १० लाख २२ हजार ७६४ महिला मतदार आहेत. जिल्ह्यातल्या दारूविक्रीपासून, अवैध वरली मटक्यासारख्या साऱ्याच प्रश्नांशी त्यांची ओळख आहे. किंबहुना या समस्यांमुळे त्याच सर्वाधिक पीडित आहेत. दारूबंदीचा प्रश्न घेऊन हजारो महिला रस्त्यावर आवाज उठवित आहेत. पण लोकसभेच्या मैदानात त्यातून एखादीला तिकिट द्यावे, तिला संसदेत धाडण्यासाठी झटावे, अशी मानसिकता एकाही पक्षाने दाखविलेली नाही. मोजक्या पाच-सहा महिलांनी हिंमत करून अपक्ष उमेदवारी दाखल करून पाहिली. पण कोट्यवधीचे ‘बजेट’ असलेल्या निवडणुकांमध्ये त्यांची कोणी दखलही घेतली नाही. 

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळी