शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

जिल्ह्याने दिल्या दोन महिला खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:19 IST

जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर अनेक खासदार संसदेत पोहोचले. काही बोलले, काही नुसतेच गेले आणि आले. पण एवढ्या वर्षात महिलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा विचारही राष्ट्रीय पक्षांच्या श्रेष्ठींनी केला नाही. दहा लाख २२ हजार ७६४ इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या आहे.

ठळक मुद्देदहा लाख महिला मतदार : मात्र मूळ यवतमाळच्या एकाही महिलेला संधी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर अनेक खासदार संसदेत पोहोचले. काही बोलले, काही नुसतेच गेले आणि आले. पण एवढ्या वर्षात महिलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा विचारही राष्ट्रीय पक्षांच्या श्रेष्ठींनी केला नाही. दहा लाख २२ हजार ७६४ इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या आहे. पण या दहा लाख महिलांमधून आजवरच्या लोकसभा निवडणुकीत दहा महिला उमेदवार पुढे येऊ शकलेल्या नाही. किंबहुना त्यांना पुढे येऊ दिले गेलेले नाही. भावना गवळी आणि सूर्यकांता पाटील ही दोन नावे महिला खासदार म्हणून सांगता येतील. मात्र, त्यांचे मूळगाव लक्षात घेतले तर जिल्ह्यातून आजवर महिला खासदार झाली नाही, हे वास्तव स्वीकारावेच लागेल.जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभाजित झाले आहेत. यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर आणि हिंगोली हे ते तीन लोकसभा मतदारसंघ. त्यापैकी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात भावना गवळींना तीन वेळा खासदारकी मिळाली. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन वेळा सूर्यकांता पाटील यांना खासदारकी मिळविता आली. मात्र या दोन्ही महिला खासदारांचे मूळ यवतमाळ जिल्ह्यात नाही. भावना गवळी वाशीम जिल्ह्यात तर सूर्यकांता पाटील नांदेडच्या रहिवासी आहेत. हा विचार करता यवतमाळ जिल्ह्यातील १० लाखांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या महिला मतदारांमधून आजवर एकही महिला खासदार होऊ शकलेली नाही.पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून २०१४ च्या निवडणुकीपर्यंत विचार केल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा या राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील महिलेला लोकसभेची उमेदवारीच दिलेली नाही. (शिवसेनेच्या भावना गवळी हा अपवाद असला तरी गवळी जिल्ह्याबाहेरच्या रहिवासी ठरतात.) वणीपासून आर्णीपर्यंत आणि झरीपासून उमरखेडपर्यंत विस्तारलेल्या यवतमाळ जिल्ह्यात १० लाख २२ हजार ७६४ महिला मतदार आहेत. जिल्ह्यातल्या दारूविक्रीपासून, अवैध वरली मटक्यासारख्या साऱ्याच प्रश्नांशी त्यांची ओळख आहे. किंबहुना या समस्यांमुळे त्याच सर्वाधिक पीडित आहेत. दारूबंदीचा प्रश्न घेऊन हजारो महिला रस्त्यावर आवाज उठवित आहेत. पण लोकसभेच्या मैदानात त्यातून एखादीला तिकिट द्यावे, तिला संसदेत धाडण्यासाठी झटावे, अशी मानसिकता एकाही पक्षाने दाखविलेली नाही. मोजक्या पाच-सहा महिलांनी हिंमत करून अपक्ष उमेदवारी दाखल करून पाहिली. पण कोट्यवधीचे ‘बजेट’ असलेल्या निवडणुकांमध्ये त्यांची कोणी दखलही घेतली नाही. 

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळी