शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

यवतमाळ शहरात दीड तासात दोन खून

By सुरेंद्र राऊत | Updated: April 4, 2023 19:05 IST

Yawatmal News यवतमाळात सोमवारी रात्री दीड तासाच्या फरकात खुनाच्या दोन घटना घडल्या. काही काळ पोलिसांचीही तारांबळ उडाली.

यवतमाळ : शहरासह जिल्ह्यातील खुनाची मालिका थांबण्यास तयार नाही. दिग्रसच्या विठोलीची घटना उघड झालेली नसताना यवतमाळात सोमवारी रात्री दीड तासाच्या फरकात खुनाच्या दोन घटना घडल्या. काही काळ पोलिसांचीही तारांबळ उडाली. दोन्ही गुन्ह्यातील प्रमुख आरोपींना रात्रीच पोलिसांनी अटक केली. मात्र या घटनांमुळे शहर हादरुन गेले आहे.

प्रवीण संदीप बरडे (३५) रा. नेताजीनगर यवतमाळ असे मृताचे नाव आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय प्रवीणला होता. यातूनच त्याचा आरोपी रजनीश उर्फ लाळ्या धर्मराज इंगळे (३१) रा. नेताजीनगर याच्याशी वाद होत होता. आजारी असल्याने प्रवीण वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वार्ड क्र. २४ मध्ये उपचार घेत होता. तर त्याची पत्नी वार्ड क्र. २५ मध्ये भरती होती. रुग्णालयात लाळ्या पोहोचला तेव्हा प्रवीणने त्याच्या कानशिलात लगावली. याचा राग धरत लाळ्याने त्याचा मित्र सुमेध उर्फ गोल्डन रमेश खडसे (२९) याला बोलावून घेतले. नंतर प्रकरण समेटाने मिटवू असे सांगून प्रवीणला रुग्णालयातून वाघापूर बायपास परिसरात आणले. तेथे प्रवीणच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करून त्याला जीवानिशी ठार केले, अशी तक्रार प्रवीणचे वडील संदीप नारायण बरडे यांनी लोहारा पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर काही तासातच आरोपी रजनीश उर्फ लाळ्या धनराज इंगळे याला लोहारा पोलिसांनी अटक केली. तर सुमेध उर्फ गोल्डन हा अजूनही पसार आहे. गुन्ह्याचा तपास लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे करीत आहे.

रात्री ९.३० वाजता वाघापूर बायपासवर खुनाची घटना घडली. त्यानंतर दीड तासातच विटभट्टी परिसरातील बेंडकीपुरा येथे जुन्या वादातून बेलफूल विक्री करणाऱ्या युवकाला चाकूने भोसकून ठार करण्यात आले. देवांशू सुरेश सावरकर (१९) असे मृताचे नाव आहे. देवांशू हा त्याच्या वडिलांसोबतच महादेव मंदिरासमोर बेलफूल विक्रीचा व्यवसाय करीत होता. सोमवारी रात्री १० वाजता तो दुचाकीने घराकडे जात असताना त्याला घराजवळ राहणाराच सोनू उर्फ शेख समीर शेख जमील (२०) हा भेटला. तेथून ते दोघेही परत गांधी चौकात आले. तेथून बेंडकीपुरा येथे परत गेले. या भागातील चिकनच्या दुकानासमोर उभे राहून दोघांच्या गप्पा सुरू होत्या. अचानकच त्यांच्यात वाद झाला. सोनू उर्फ शेख समीर याने जुना वाद उकरुन काढत धारदार चाकूने देवांशूच्या पोटात वार केले. देवांशू रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच सोनूने घटनास्थळावरून पळ काढला. देवांशू रस्त्यावर तडफडतोय याची माहिती परिसरातील व्यक्तीने त्याच्या आईला व वडिलांना दिली. रात्रीच्या जेवणाच्या तयारीत असणारे आईवडील घटनास्थळी धावून आले. त्यांनी देवांशूला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे आरोपी सोनू उर्फ शेख समीर याला दारव्हा येथून अटक केली. आरोपीला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहायक निरीक्षक सचिन लुले गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे.

तीन महिन्यात २१ जणांची हत्या

यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून सातत्याने खुनाचे सत्र सुरू आहे. ९० दिवसात २१ जणांची हत्या झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे उघड झाले. आरोपींना अटकही झाली. मात्र कुणाचा जीव घेण्यासाठी काहीही विचार केला जात नाही. सुडाची भावना अगदीच टोकाला पोहोचली आहे. क्षुल्लक कारणासाठी जीवानिशी मारण्याचा प्रकार वाढत चालला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी