शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

यवतमाळ शहरात दीड तासात दोन खून

By सुरेंद्र राऊत | Updated: April 4, 2023 19:05 IST

Yawatmal News यवतमाळात सोमवारी रात्री दीड तासाच्या फरकात खुनाच्या दोन घटना घडल्या. काही काळ पोलिसांचीही तारांबळ उडाली.

यवतमाळ : शहरासह जिल्ह्यातील खुनाची मालिका थांबण्यास तयार नाही. दिग्रसच्या विठोलीची घटना उघड झालेली नसताना यवतमाळात सोमवारी रात्री दीड तासाच्या फरकात खुनाच्या दोन घटना घडल्या. काही काळ पोलिसांचीही तारांबळ उडाली. दोन्ही गुन्ह्यातील प्रमुख आरोपींना रात्रीच पोलिसांनी अटक केली. मात्र या घटनांमुळे शहर हादरुन गेले आहे.

प्रवीण संदीप बरडे (३५) रा. नेताजीनगर यवतमाळ असे मृताचे नाव आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय प्रवीणला होता. यातूनच त्याचा आरोपी रजनीश उर्फ लाळ्या धर्मराज इंगळे (३१) रा. नेताजीनगर याच्याशी वाद होत होता. आजारी असल्याने प्रवीण वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वार्ड क्र. २४ मध्ये उपचार घेत होता. तर त्याची पत्नी वार्ड क्र. २५ मध्ये भरती होती. रुग्णालयात लाळ्या पोहोचला तेव्हा प्रवीणने त्याच्या कानशिलात लगावली. याचा राग धरत लाळ्याने त्याचा मित्र सुमेध उर्फ गोल्डन रमेश खडसे (२९) याला बोलावून घेतले. नंतर प्रकरण समेटाने मिटवू असे सांगून प्रवीणला रुग्णालयातून वाघापूर बायपास परिसरात आणले. तेथे प्रवीणच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करून त्याला जीवानिशी ठार केले, अशी तक्रार प्रवीणचे वडील संदीप नारायण बरडे यांनी लोहारा पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर काही तासातच आरोपी रजनीश उर्फ लाळ्या धनराज इंगळे याला लोहारा पोलिसांनी अटक केली. तर सुमेध उर्फ गोल्डन हा अजूनही पसार आहे. गुन्ह्याचा तपास लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे करीत आहे.

रात्री ९.३० वाजता वाघापूर बायपासवर खुनाची घटना घडली. त्यानंतर दीड तासातच विटभट्टी परिसरातील बेंडकीपुरा येथे जुन्या वादातून बेलफूल विक्री करणाऱ्या युवकाला चाकूने भोसकून ठार करण्यात आले. देवांशू सुरेश सावरकर (१९) असे मृताचे नाव आहे. देवांशू हा त्याच्या वडिलांसोबतच महादेव मंदिरासमोर बेलफूल विक्रीचा व्यवसाय करीत होता. सोमवारी रात्री १० वाजता तो दुचाकीने घराकडे जात असताना त्याला घराजवळ राहणाराच सोनू उर्फ शेख समीर शेख जमील (२०) हा भेटला. तेथून ते दोघेही परत गांधी चौकात आले. तेथून बेंडकीपुरा येथे परत गेले. या भागातील चिकनच्या दुकानासमोर उभे राहून दोघांच्या गप्पा सुरू होत्या. अचानकच त्यांच्यात वाद झाला. सोनू उर्फ शेख समीर याने जुना वाद उकरुन काढत धारदार चाकूने देवांशूच्या पोटात वार केले. देवांशू रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच सोनूने घटनास्थळावरून पळ काढला. देवांशू रस्त्यावर तडफडतोय याची माहिती परिसरातील व्यक्तीने त्याच्या आईला व वडिलांना दिली. रात्रीच्या जेवणाच्या तयारीत असणारे आईवडील घटनास्थळी धावून आले. त्यांनी देवांशूला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे आरोपी सोनू उर्फ शेख समीर याला दारव्हा येथून अटक केली. आरोपीला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहायक निरीक्षक सचिन लुले गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे.

तीन महिन्यात २१ जणांची हत्या

यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून सातत्याने खुनाचे सत्र सुरू आहे. ९० दिवसात २१ जणांची हत्या झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे उघड झाले. आरोपींना अटकही झाली. मात्र कुणाचा जीव घेण्यासाठी काहीही विचार केला जात नाही. सुडाची भावना अगदीच टोकाला पोहोचली आहे. क्षुल्लक कारणासाठी जीवानिशी मारण्याचा प्रकार वाढत चालला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी