शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जिल्ह्यात दोन आमदारांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:53 IST

जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात जिल्ह्याच्या राजकीय तिजोरीत मोठी भर पडली. काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अ‍ॅड. निलय नाईक यांच्या रुपाने दोन विधान परिषद सदस्य जिल्ह्याला लाभले. त्यातही हे दोघेही पुसदचे असल्याने पुन्हा एकदा पुसदचे पारडे जड झाले.

ठळक मुद्देराजकीय उपलब्धी : नेरमध्ये शिवसेना, पांढरकवडात ‘प्रहार’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात जिल्ह्याच्या राजकीय तिजोरीत मोठी भर पडली. काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अ‍ॅड. निलय नाईक यांच्या रुपाने दोन विधान परिषद सदस्य जिल्ह्याला लाभले. त्यातही हे दोघेही पुसदचे असल्याने पुन्हा एकदा पुसदचे पारडे जड झाले.जिल्ह्यात विधानसभा व विधान परिषदेच्या एकूण आमदारांची संख्या ११ (सात-चार) झाली आहे. नागपूर नंतर विदर्भातील हा सर्वात मोठा आकडा आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना मात्र आपली आमदारकी गमवावी लागली. या वर्षातच काँग्रेस व राष्ट्रवादीला नवे जिल्हाध्यक्षही मिळाले. राष्ट्रवादीने आमदार ख्वाजा बेग यांच्यावर तर काँग्रेसने आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदासाठी विश्वास दाखविला. या विश्वासाचा ते आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षासाठी नेमका किती फायदा करून घेतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. कारण आगामी निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढल्या जाणार आहेत. संध्याताई सव्वालाखे यांच्या रुपाने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याला अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीमध्ये स्थान मिळाले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने २०१८ हे वर्ष तयारीचे वर्ष ठरले आहे. या वर्षात सर्वच पक्षांनी राजकीय बांधणी व संघटनात्मक तडजोडींकडे अधिक लक्ष दिल्याचे दिसते. या तयारीवरच राजकीय पक्ष २०१९ मध्ये निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यातील निकालानंतरच कुणाची तयारी किती दमदार होती, हे स्पष्ट होईल.गेल्या वर्षभरात जिल्ह्यात नेर व पांढरकवडा नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या. नेरमध्ये शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली. मात्र त्यांचे गतवेळपेक्षा दोन जागांचे नुकसान झाले. तेथे काँग्रेस-राष्ट्रवादी दोन जागांनी प्लस झाली. पांढरकवडा नगरपरिषदेत अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षासह सत्तेसाठीचे बहुमत प्राप्त केले. या निकालाने प्रहारची आता आगामी निवडणुकांमध्येही अन्य राजकीय पक्षांकडून दखल घेतली जाणार आहे. प्रहारकडे उमेदवारीसाठीचा तिसरा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. प्रहारनेही जिल्ह्यात विधानसभेच्या वणी, आर्णी, यवतमाळ व राळेगाव या चार जागांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या वर्षभरात शिवसेना नेते संजय राठोड व भावना गवळी यांच्यातील पक्षांतर्गत भांडणे आणखी मोठ्या प्रमाणात उफाळून पुढे आली. यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक विभागला गेला. दोघांनी पुन्हा एकत्र यावे ही निष्ठावंत शिवसैनिकांची इच्छा असली तरी नेत्यांचा त्याला प्रतिसाद नाही. या भांडणांचा परिणाम आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पहायला मिळण्याची चिन्हे आहेत. दोन्ही नेते व त्यांचे समर्थक एकमेकांचा हिशेब चुकता करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या भांडणात पक्षाचे राजकीय नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुखांच्या उपस्थितीत समाज बांधवांचे केलेले शक्तीप्रदर्शन हा राजकीय हिशेबाच्याच तयारीचा एक भाग मानला जातो. यावर्षात शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचे पहिल्यांदाच ‘त्रिभाजन’ही शिवसैनिकांना पहायला मिळाले.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर आघाडीत काँग्रेसचा दावा असताना राष्ट्रवादीने या मतदारसंघावर आपला दावा सांगून आघाडीत जोरदार खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे संख्याबळ व पक्षबांधणीत फारसे अस्तित्व या मतदारसंघात नसताना केलेला हा दावा म्हणजे विधानसभेसाठी दबावाच्या खेळीचा भाग मानला जातो.काँग्रेसने या लोकसभा मतदारसंघात माणिकराव ठाकरेंना ‘तयारीला लागा’ असा आदेश दिल्लीतून दिल्याचे सांगितले जात असले तरी गत उमेदवार व अन्य नवीन चेहऱ्यांनीही अद्याप आशा सोडलेली नाही. उलट स्पर्धकांनी एकत्र येऊन उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत माणिकरावांपुढे आत्ताच आव्हान उभे केले आहे.जिल्ह्यात सात पैकी पाच जागा भाजपाकडे आहेत. त्यातील तिकीट वाटपात कुणाला डच्चू तर बसणार नाही ना? अशी हूरहूर कार्यकर्त्यांमध्ये पहायला मिळते. ‘सिटींग-गेटींग’चा निकष पाहता डच्चू देणे तेवढे सोपे नाही. तरीही सार्वजनिक व वैयक्तिक जीवनातील सर्वांच्या दृष्टीस पडणारी ‘वादग्रस्तता’ व त्यामुळे निवडून येण्याची कमी झालेली क्षमता पाहता एकाला डच्चू मिळण्याची शक्यता भाजपाच्या गोटात वर्तविली जात आहे.जिल्हा परिषद अस्थिर, नगरपालिकेत गोंधळगेली वर्षभर जिल्हा परिषदेतील काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपाच्या सत्तेची अस्थिरता पहायला मिळाली. निवडणुका तोंडावर आल्यानेच काँग्रेसने भाजपाशी युती तोडावी यासाठी मुंबईतून स्थानिक नेत्यांवर दबाव होता. मात्र अध्यक्षांच्या ‘गॉडफादर’ने हा दबाव झुगारुन युती कायम ठेवली. यवतमाळ नगरपरिषदेमध्ये सेना व भाजपातील अधिकाराचा गोंधळ वर्षभर कायम राहिला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा