शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

जिल्ह्यात दोन आमदारांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:53 IST

जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात जिल्ह्याच्या राजकीय तिजोरीत मोठी भर पडली. काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अ‍ॅड. निलय नाईक यांच्या रुपाने दोन विधान परिषद सदस्य जिल्ह्याला लाभले. त्यातही हे दोघेही पुसदचे असल्याने पुन्हा एकदा पुसदचे पारडे जड झाले.

ठळक मुद्देराजकीय उपलब्धी : नेरमध्ये शिवसेना, पांढरकवडात ‘प्रहार’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात जिल्ह्याच्या राजकीय तिजोरीत मोठी भर पडली. काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अ‍ॅड. निलय नाईक यांच्या रुपाने दोन विधान परिषद सदस्य जिल्ह्याला लाभले. त्यातही हे दोघेही पुसदचे असल्याने पुन्हा एकदा पुसदचे पारडे जड झाले.जिल्ह्यात विधानसभा व विधान परिषदेच्या एकूण आमदारांची संख्या ११ (सात-चार) झाली आहे. नागपूर नंतर विदर्भातील हा सर्वात मोठा आकडा आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना मात्र आपली आमदारकी गमवावी लागली. या वर्षातच काँग्रेस व राष्ट्रवादीला नवे जिल्हाध्यक्षही मिळाले. राष्ट्रवादीने आमदार ख्वाजा बेग यांच्यावर तर काँग्रेसने आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदासाठी विश्वास दाखविला. या विश्वासाचा ते आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षासाठी नेमका किती फायदा करून घेतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. कारण आगामी निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढल्या जाणार आहेत. संध्याताई सव्वालाखे यांच्या रुपाने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याला अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीमध्ये स्थान मिळाले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने २०१८ हे वर्ष तयारीचे वर्ष ठरले आहे. या वर्षात सर्वच पक्षांनी राजकीय बांधणी व संघटनात्मक तडजोडींकडे अधिक लक्ष दिल्याचे दिसते. या तयारीवरच राजकीय पक्ष २०१९ मध्ये निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यातील निकालानंतरच कुणाची तयारी किती दमदार होती, हे स्पष्ट होईल.गेल्या वर्षभरात जिल्ह्यात नेर व पांढरकवडा नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या. नेरमध्ये शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली. मात्र त्यांचे गतवेळपेक्षा दोन जागांचे नुकसान झाले. तेथे काँग्रेस-राष्ट्रवादी दोन जागांनी प्लस झाली. पांढरकवडा नगरपरिषदेत अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षासह सत्तेसाठीचे बहुमत प्राप्त केले. या निकालाने प्रहारची आता आगामी निवडणुकांमध्येही अन्य राजकीय पक्षांकडून दखल घेतली जाणार आहे. प्रहारकडे उमेदवारीसाठीचा तिसरा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. प्रहारनेही जिल्ह्यात विधानसभेच्या वणी, आर्णी, यवतमाळ व राळेगाव या चार जागांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या वर्षभरात शिवसेना नेते संजय राठोड व भावना गवळी यांच्यातील पक्षांतर्गत भांडणे आणखी मोठ्या प्रमाणात उफाळून पुढे आली. यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक विभागला गेला. दोघांनी पुन्हा एकत्र यावे ही निष्ठावंत शिवसैनिकांची इच्छा असली तरी नेत्यांचा त्याला प्रतिसाद नाही. या भांडणांचा परिणाम आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पहायला मिळण्याची चिन्हे आहेत. दोन्ही नेते व त्यांचे समर्थक एकमेकांचा हिशेब चुकता करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या भांडणात पक्षाचे राजकीय नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुखांच्या उपस्थितीत समाज बांधवांचे केलेले शक्तीप्रदर्शन हा राजकीय हिशेबाच्याच तयारीचा एक भाग मानला जातो. यावर्षात शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचे पहिल्यांदाच ‘त्रिभाजन’ही शिवसैनिकांना पहायला मिळाले.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर आघाडीत काँग्रेसचा दावा असताना राष्ट्रवादीने या मतदारसंघावर आपला दावा सांगून आघाडीत जोरदार खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे संख्याबळ व पक्षबांधणीत फारसे अस्तित्व या मतदारसंघात नसताना केलेला हा दावा म्हणजे विधानसभेसाठी दबावाच्या खेळीचा भाग मानला जातो.काँग्रेसने या लोकसभा मतदारसंघात माणिकराव ठाकरेंना ‘तयारीला लागा’ असा आदेश दिल्लीतून दिल्याचे सांगितले जात असले तरी गत उमेदवार व अन्य नवीन चेहऱ्यांनीही अद्याप आशा सोडलेली नाही. उलट स्पर्धकांनी एकत्र येऊन उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत माणिकरावांपुढे आत्ताच आव्हान उभे केले आहे.जिल्ह्यात सात पैकी पाच जागा भाजपाकडे आहेत. त्यातील तिकीट वाटपात कुणाला डच्चू तर बसणार नाही ना? अशी हूरहूर कार्यकर्त्यांमध्ये पहायला मिळते. ‘सिटींग-गेटींग’चा निकष पाहता डच्चू देणे तेवढे सोपे नाही. तरीही सार्वजनिक व वैयक्तिक जीवनातील सर्वांच्या दृष्टीस पडणारी ‘वादग्रस्तता’ व त्यामुळे निवडून येण्याची कमी झालेली क्षमता पाहता एकाला डच्चू मिळण्याची शक्यता भाजपाच्या गोटात वर्तविली जात आहे.जिल्हा परिषद अस्थिर, नगरपालिकेत गोंधळगेली वर्षभर जिल्हा परिषदेतील काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपाच्या सत्तेची अस्थिरता पहायला मिळाली. निवडणुका तोंडावर आल्यानेच काँग्रेसने भाजपाशी युती तोडावी यासाठी मुंबईतून स्थानिक नेत्यांवर दबाव होता. मात्र अध्यक्षांच्या ‘गॉडफादर’ने हा दबाव झुगारुन युती कायम ठेवली. यवतमाळ नगरपरिषदेमध्ये सेना व भाजपातील अधिकाराचा गोंधळ वर्षभर कायम राहिला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा